शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

ध्येय निश्चिती व योग्य नियोजन हेच यशाचे गमक

By admin | Updated: December 5, 2015 09:08 IST

शिक्षण म्हणजे केवळ चांगले गूण मिळविणे अशी सर्वसामान्य व्याख्या प्रचलित आहे. त्यामुळे बहुतेक जण मार्क मिळण्यापुरताच अभ्यास करतात.

संदीप तामगाडगे : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व कार्यगौरव सोहळावर्धा : शिक्षण म्हणजे केवळ चांगले गूण मिळविणे अशी सर्वसामान्य व्याख्या प्रचलित आहे. त्यामुळे बहुतेक जण मार्क मिळण्यापुरताच अभ्यास करतात. तरंतु असे विद्यार्थी परीक्षांमध्ये भरपूर मार्का मिळवूनही पुढच्या आयुष्यात भरीव कामगिरी बजाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या ध्येयाने स्वत:ला वेडावून घ्या, झपाटून घ्या, मग अख्ख आयुष्य तुमचंच असेल, असे प्रतिपादन पोलीस उप महासंचालक संदीप तामगाडगे यांनी शुक्रवारी केले.न्यु आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज वर्धा येथे महाराष्ट्र राज्य कास्टाईल कर्मचारी कल्याण महासंघ, राष्ट्रीय संबुद्ध महिला संघटना वर्धा, आसमंत फाऊंडेशन, स्पार्क युथ सोशल फोरम, आदिवासी विकास कृती समिती वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रोप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी दत्ता मेघे इन्स्टिटयुट आॅफ मेडिकल सायंसेस, सावंगी(मेघे) वर्धाचे उपकुलगुरू डॉ. डॉ. वेदप्रकाश मिश्रा तर अतिथी म्हणून आयकर विभाग उपायुक्त डॉ. उपसेन बोरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कडवे उपस्थित होते. कुठलेही ध्येय प्राप्त करीत असताना अचूक ध्येयनिश्चिती फार महत्त्वाची असते. यातूनच अचूक नियोजन करून ध्येयापर्यंत पोहचता येते असे प्रतिपादन नागपूर येथील आयकर विभाग उपायुक्त डॉ. उपसेन बोरकर यांनी मार्गदर्शन करताना केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. मिश्रा म्हणाले, शाळेतील कामगिरीचा आयुष्यातील यशाशी संबंध नाही. जर तुमच्याकडे काही स्वप्न असेल आणि ते साकार करण्यासाठी मेहनतीच्या रुपात किंमत मोजण्याची तुमच्यात तयारी असेल तर कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनतीशिवाय यशाची व्याख्याच नसल्याचेही मिश्रा म्हणाले. प्रास्ताविकातून डॉ. प्रशांत कडवे यांनीही विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण विकासाकरिता आपण नेहमीच कटीबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संदीप पेटारे यांनी केले. आभार डॉ. मदन इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)