शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान द्या

By admin | Updated: November 8, 2014 22:42 IST

विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पेरेरचनेनुसार शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान द्यावे व त्यामध्ये शेतीची मर्यादा किमान चार हेक्टर ठेवावी. शेतकऱ्यांना २० टक्के अग्रीम बोनस

रामदास तडस यांचे केंद्र व राज्य सरकारला साकडेवर्धा : विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पेरेरचनेनुसार शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान द्यावे व त्यामध्ये शेतीची मर्यादा किमान चार हेक्टर ठेवावी. शेतकऱ्यांना २० टक्के अग्रीम बोनस देवून केंद्र सरकारच्या हमीभावामध्ये वाढ करावी, अशी कळकळीची मागणी खा. रामदास तडस यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे.यासोबतच शेतकऱ्यांचे थकीत असलेल्या कर्जाचे दहा टप्पे पाडावे व ते बिनव्याजी असावे आणि शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वेगळा विचार करून त्यांची शेती सिंचनाखाली आणण्याकरिता प्रयत्न करण्यात यावे, त्याकरिता अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे. शेतीची आणेवारी काढताना ५० पैशाच्या आत असावी, कारण सोयाबीनचे एकरी उत्पन्न १ क्विंटल असून कापसाचे एकरी उत्पन्न ५० किलोच्या घरात आहे. गाव पातळीवर पेरे आढावा घेवून आणेवारी घ्यावी. पावसावर आधारीत पीक विमा योजना असल्याने ग्रामपंचायतीमध्ये पाऊस मोजण्याचे यंत्र असावे, क्रॉप इन्शुरन्स गाव स्तरावर लागू करावी, अशी मागणीही तडस यांनी केली आहे.ऊस उत्पादकांना ज्या प्रकारे खतासाठी सबसिडी मिळते त्याप्रमाणे कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांनाही सबसिडी देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. या सर्व बाबीकडे शासनाने लक्ष पुरविल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. विदर्भातील पूर्ण खासदार व आमदारांनी सुद्धा या मागण्या लावून धरल्यास सरकारकडून निश्चितच विदर्भातील शेतकऱ्यांना फायदा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.(जिल्हा प्रतिनिधी)