शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

पुलगाव दुर्घटनेतील जवानांना शहिदांचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:49 IST

पुलगाव येथील दारूगोळा भांडारात झालेल्या दुर्घटनेत १९ जवान शहीद झाले होते. त्यांना शहिदांचा दर्जा बहाल करून त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय सोई सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी खा. रामदास तडस यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली. खा. तडस लोकसभेत बोलताना म्हणाले की, पुलगाव येथे लष्कराचे देशातील सर्वात मोठे दारुगोळा भांडार आहे.

ठळक मुद्देतडस यांची लोकसभेत शून्य प्रहरात मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पुलगाव येथील दारूगोळा भांडारात झालेल्या दुर्घटनेत १९ जवान शहीद झाले होते. त्यांना शहिदांचा दर्जा बहाल करून त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय सोई सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी खा. रामदास तडस यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली. खा. तडस लोकसभेत बोलताना म्हणाले की, पुलगाव येथे लष्कराचे देशातील सर्वात मोठे दारुगोळा भांडार आहे.हा परिसर २८ किलोमीटरचा आहे. आशिया खंडातील दुसरं सर्वात मोठं शस्त्रास्त्र भांडार म्हणून त्याची ओळख आहे. पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला ३१ मे २०१६ च्या मध्यरात्री अचानक आग लागून झालेल्या भीषण स्फोटांमध्ये १९ जवानांना प्राण गमवावे लागले. ही आग विझवताना आगीत ले. कर्नल आर.एस.पवार आणि मेजर मनोज या वरिष्ठ अधिकाऱ्यांंसह ६ जवान व अग्निशमन विभागातील १३ जवानांना प्राण गमवावे लागले. या आगीमध्ये शहीद झालेल्या जवानांना शहीदांचा दर्जा देण्यात यावा या करिता खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत शून्य काळात प्रश्न उपस्थित करून केंद्रशासनाचे लक्ष वेधले.अग्निशमन विभागातील जवानांना राष्ट्रपती फायर अवार्ड प्रदान करण्यात आला असुन शहीद झालेल्या जवानांना शहीदांचा दर्जा देण्यात यावा, तसेच परिवारातील एका सदस्याला अनुकंपाच्या आधारावर सरकारी नोकरी देण्यात यावी व परिवाराला युद्धातील शहीदांना ज्या सोयी सुविधा देण्यात येतात त्या सर्व सरकारी सुविधा देण्यात याव्या अशी मागणी खा. तडस यांनी केली.सीएसआर फंडातून परिसरात विकास कामे सक्तीची कराकेंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाच्या दिशानिर्देशानुसार सीएसआरकरिता पात्र कंपनीला आपल्या सामाजिक दायित्वातून विविध सात विषयावर निधी देण्याचा अधिकार असतो. सदर निधीचे वाटप करीत असतांना ज्या जिल्ह्यात, परिसरात व विभागामध्ये कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्या परिसरावर सीएसआर अंतर्गत निधी खर्च करण्याकरिता कंपन्यांनी अनिवार्य आहे. सीएसआरचा पहिला अधिकार हा स्थानिक परिसरालाच आहे ,असे उत्तर वाणिज्य राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला दिले.सीएसआर या सामाजिक दायित्वातून खर्च करण्यात येणाºया निधीसंदर्भात खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न संख्या १२२ अंतर्गत मुद्दा उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या पुरवणी प्रश्नांवर केंद्रीय वाणिज्य मंत्री यांनी लोकसभेत उत्तर दिले. ज्या कंपन्या सीएसआर निधी योग्य रीतीने खर्च करीत नाही. अशा कंपन्यांवर सीएसआर नियम अंतर्गत नमुद असलेल्या तरतुदीप्रमाणे वेळोवेळी कार्यवाही केली जाते, असे त्यांनी सांगितले.वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात यावर्षी मोठया प्रमाणात पाणी समस्या उद्भवलेली असून परिसरातील व नागपूर विभागातील कंपन्यांनी पाणी विषयाकरिता आपले योगदान द्यावे अशी प्रमुख मागणी देखील खा. तडस यांनी केली. वाणिज्य राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी वर्धा लोकसभा मतदार संघातील सीएसआर विषयी सर्व विषय प्राधान्याने सोडविण्याकरिता वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने मदत करण्यात येईल असे त्यांनी खा. तडस यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात सांगितले.