शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीवासीयांना स्थायी पट्टे द्या!

By admin | Updated: December 8, 2015 02:52 IST

झोपडपट्टीवासीयांना स्थायी पट्टे देण्यात यावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ.) च्यावतीने

वर्धा : झोपडपट्टीवासीयांना स्थायी पट्टे देण्यात यावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ.) च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन सादर केले. झोपडपट्टीवासीयांना स्थायी पट्टे देण्याच्या मागणीकरिता आतापर्यंत अनेक मोर्चे, धरणे व जेलभरो आंदोलन रिपाइंतर्फे करण्यात आले आहे. परसोडी (सिंदी रेल्वे), रोहणखेडा, कानगाव, गाडेगाव, ता. हिंगणघाट, वडार झोपडपट्टी (चितोडा), रोडा ता. वर्धा येथील झोपडपट्टीवासियांना न्याय देण्यात यावा तसेच झुडपी जमिनीचे शेत मजुरांना, कष्टकऱ्यांना वाटप करण्यात यावे, गवंडी बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये मानधान देण्यात यावे, अन्न सुरक्षा योजनेपासून शेतमजूर वंचित आहेत त्यांना त्वरीत लाभ देण्यात यावा आदी मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यांची पूर्तता करण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार शासकीय जमिनीवर सन २००० पर्यंत अतिक्रमण करून झोपडी बांधून राहत असलेल्यांना स्थायी पट्टे देण्यात यावे असा आदेश पारीत करण्यात आला आहे. असे असतानाही शासनांतर्गत आदेशाचे उल्लंघन होत आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात गरजु व गरीब नागरिकांनी शासकीय जागेवर झोपडी बांधून कुटुंबांनी जीवन जगणे सुरू केलेले आहे. त्यांच्या झोपड्यांचे वास्तव अतिक्रमण हे सन २००० पूर्वीचे आहे. यातील बहुतेक नागरिक हे बी.पी.एल. कार्डधारक व भटक्या आदिवासी जमातीतील आहेत. त्यांना राज्य शासनाच्या घरकुल योजनेतून घर मंजूर झाले. परंतु त्यांच्याजवळ स्थायी पट्टे नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात शासनातर्फे भूसंपादन करून गरजुंना प्लॉट वाटप केले. त्यापैकी बरेच प्लॉट हे वाटप न झाल्यामुळे खऱ्या लाभार्थींनाही त्या प्लॉटवर स्वत:ची घरे बांधता आलेली नाहीत. या सर्व गंभीर बाबींचा शासनाने विचार करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. धरणे आंदोलनात रिपाइंचे प्रकाश पाटील, अजय मेहरा, अ‍ॅड. राजेश थुल, विजय चन्ने, राजु खडतकर, देविदास भगत, महेंद्र मुनेंश्वर, सतीश इंगळे, रामचंद्र थुल, सुरेंद्र उगले, दिनेश तागसांडे, ऋषी ढोके, देवानंद कांबळे, मोहन वनकर, राजु वासेकर, सुभाष कांबळे, सुरेंद्र पुनवटकर, विजय नगराळे, सुखदेवे, तेलतुमडे, संजय वर्मा, प्रियदर्शना भेले, सुनंदा निशाने, जया मोटघरे, वंदना देशपांडे, शिला थुल, मुन्ना शेख, गवई, प्रशांत रामटेके आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)