शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीवासीयांना स्थायी पट्टे द्या!

By admin | Updated: December 8, 2015 02:52 IST

झोपडपट्टीवासीयांना स्थायी पट्टे देण्यात यावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ.) च्यावतीने

वर्धा : झोपडपट्टीवासीयांना स्थायी पट्टे देण्यात यावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ.) च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन सादर केले. झोपडपट्टीवासीयांना स्थायी पट्टे देण्याच्या मागणीकरिता आतापर्यंत अनेक मोर्चे, धरणे व जेलभरो आंदोलन रिपाइंतर्फे करण्यात आले आहे. परसोडी (सिंदी रेल्वे), रोहणखेडा, कानगाव, गाडेगाव, ता. हिंगणघाट, वडार झोपडपट्टी (चितोडा), रोडा ता. वर्धा येथील झोपडपट्टीवासियांना न्याय देण्यात यावा तसेच झुडपी जमिनीचे शेत मजुरांना, कष्टकऱ्यांना वाटप करण्यात यावे, गवंडी बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये मानधान देण्यात यावे, अन्न सुरक्षा योजनेपासून शेतमजूर वंचित आहेत त्यांना त्वरीत लाभ देण्यात यावा आदी मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यांची पूर्तता करण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार शासकीय जमिनीवर सन २००० पर्यंत अतिक्रमण करून झोपडी बांधून राहत असलेल्यांना स्थायी पट्टे देण्यात यावे असा आदेश पारीत करण्यात आला आहे. असे असतानाही शासनांतर्गत आदेशाचे उल्लंघन होत आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात गरजु व गरीब नागरिकांनी शासकीय जागेवर झोपडी बांधून कुटुंबांनी जीवन जगणे सुरू केलेले आहे. त्यांच्या झोपड्यांचे वास्तव अतिक्रमण हे सन २००० पूर्वीचे आहे. यातील बहुतेक नागरिक हे बी.पी.एल. कार्डधारक व भटक्या आदिवासी जमातीतील आहेत. त्यांना राज्य शासनाच्या घरकुल योजनेतून घर मंजूर झाले. परंतु त्यांच्याजवळ स्थायी पट्टे नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात शासनातर्फे भूसंपादन करून गरजुंना प्लॉट वाटप केले. त्यापैकी बरेच प्लॉट हे वाटप न झाल्यामुळे खऱ्या लाभार्थींनाही त्या प्लॉटवर स्वत:ची घरे बांधता आलेली नाहीत. या सर्व गंभीर बाबींचा शासनाने विचार करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. धरणे आंदोलनात रिपाइंचे प्रकाश पाटील, अजय मेहरा, अ‍ॅड. राजेश थुल, विजय चन्ने, राजु खडतकर, देविदास भगत, महेंद्र मुनेंश्वर, सतीश इंगळे, रामचंद्र थुल, सुरेंद्र उगले, दिनेश तागसांडे, ऋषी ढोके, देवानंद कांबळे, मोहन वनकर, राजु वासेकर, सुभाष कांबळे, सुरेंद्र पुनवटकर, विजय नगराळे, सुखदेवे, तेलतुमडे, संजय वर्मा, प्रियदर्शना भेले, सुनंदा निशाने, जया मोटघरे, वंदना देशपांडे, शिला थुल, मुन्ना शेख, गवई, प्रशांत रामटेके आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)