शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
2
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
3
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
4
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
5
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
6
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
7
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
8
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
9
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
10
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
11
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
12
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
13
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
14
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
15
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
16
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
17
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
18
सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश
19
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
20
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन

वैकल्पिक वाद निवारण कक्षातून जनतेला न्याय द्या

By admin | Updated: January 18, 2016 02:16 IST

वैकल्पिक वाद निवारण कक्षातून (न्याय सेवा सदन) अधिकाधिक दावे, प्रकरणे निकाली काढण्यास मदतच होणार आहे.

वासंती नाईक : न्याय सेवा सदन नवीन इमारतीचे उद्घाटनवर्धा : वैकल्पिक वाद निवारण कक्षातून (न्याय सेवा सदन) अधिकाधिक दावे, प्रकरणे निकाली काढण्यास मदतच होणार आहे. नवीन न्याय सेवा सदन या वास्तूच्या माध्यमातून या कार्याला अधिक गती मिळेल, असे प्रतिपादन नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा वर्धा जिल्हा पालक न्यायमूर्ती वासंती नाईक यांनी केले. जिल्हा न्यायालय परिसरात न्याय सेवा सदन नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संध्या द्वा. रायकर होत्या. तर व्यासपीठावर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष प्र. म. देशपांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सु.ना. राजूरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संध्या रायकर यांनी वर्धा जिल्ह्यातील न्याय सेवेचे महत्त्व विषद केले. यामध्ये त्यांनी स्वांतत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत अविरतपणे न्यायदानाचे कार्य सुरू असल्याचे सांगून जिल्ह्यातील ऐतिहासीक महत्त्वही विषद केले. लोकन्यायालय, विधी सेवा प्राधिकरण, मध्यस्थी केंद्रांच्या माध्यमातून अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली, असे यावेळी सांगितले. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. नवीन इमारतीच्या कोनशीलेचे अनावरण न्यायमूर्ती नाईक यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण वास्तूची पाहणी केली. स्वागत गीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश चांदेकर, कोटंबकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा सरकारी अभियोक्ता अनुराधा सबाने, जिल्हा पोलीस उपअधीक्षक आर.जी. किल्लेकर, अभियंता गुज्जेवार, विधी सेवा प्राधिकरणाचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पुलगाव, समुद्रपूर विधीज्ञ सेवा मंडळाचे पदाधिकारी, न्यायालयीन अधिकारी, उपस्थित होते. संचालन न्यायाधीश देशपांडे यांनी केले तर आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सु.ना. राजूरकर यांनी मानले. (प्रतिनिधी)वैकल्पिक न्याय निवारण ही संकल्पना प्राचीनच वैकल्पिक न्याय निवारण ही संकल्पना पूर्व काळापासून चालू असून तिला आता व्यापक स्वरूप प्राप्त झालेले आहे. या नवीन इमारतीतून अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यासाठी यंत्रणा सज्ज झालेली आहे. वैकल्पिक वाद निवारण कक्षातून आपसी तडजोडीने मिटणारी प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे ही निकाली निघतील. न्यायालयीन प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी दावेदार, प्रतिवादी यांना मध्यस्थांमार्फत त्यांचे महत्त्व पटवून दिल्यास तेही प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी पुढे येतात, असे सांगून त्यांनी वैकल्पिक वाद निवारण कक्ष, कक्षाची संकल्पना, प्रक्रिया, मध्यस्थाची भूमिका आदी विषयांवर सविस्तर मांडणी करून प्रत्येक व्यक्तीला वेळेत न्याय सेवा मिळेल, असा विश्वास न्यायमूर्ती नाईक यांनी व्यक्त केला.