शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

वैकल्पिक वाद निवारण कक्षातून जनतेला न्याय द्या

By admin | Updated: January 18, 2016 02:16 IST

वैकल्पिक वाद निवारण कक्षातून (न्याय सेवा सदन) अधिकाधिक दावे, प्रकरणे निकाली काढण्यास मदतच होणार आहे.

वासंती नाईक : न्याय सेवा सदन नवीन इमारतीचे उद्घाटनवर्धा : वैकल्पिक वाद निवारण कक्षातून (न्याय सेवा सदन) अधिकाधिक दावे, प्रकरणे निकाली काढण्यास मदतच होणार आहे. नवीन न्याय सेवा सदन या वास्तूच्या माध्यमातून या कार्याला अधिक गती मिळेल, असे प्रतिपादन नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा वर्धा जिल्हा पालक न्यायमूर्ती वासंती नाईक यांनी केले. जिल्हा न्यायालय परिसरात न्याय सेवा सदन नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संध्या द्वा. रायकर होत्या. तर व्यासपीठावर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष प्र. म. देशपांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सु.ना. राजूरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संध्या रायकर यांनी वर्धा जिल्ह्यातील न्याय सेवेचे महत्त्व विषद केले. यामध्ये त्यांनी स्वांतत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत अविरतपणे न्यायदानाचे कार्य सुरू असल्याचे सांगून जिल्ह्यातील ऐतिहासीक महत्त्वही विषद केले. लोकन्यायालय, विधी सेवा प्राधिकरण, मध्यस्थी केंद्रांच्या माध्यमातून अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली, असे यावेळी सांगितले. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. नवीन इमारतीच्या कोनशीलेचे अनावरण न्यायमूर्ती नाईक यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण वास्तूची पाहणी केली. स्वागत गीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश चांदेकर, कोटंबकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा सरकारी अभियोक्ता अनुराधा सबाने, जिल्हा पोलीस उपअधीक्षक आर.जी. किल्लेकर, अभियंता गुज्जेवार, विधी सेवा प्राधिकरणाचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पुलगाव, समुद्रपूर विधीज्ञ सेवा मंडळाचे पदाधिकारी, न्यायालयीन अधिकारी, उपस्थित होते. संचालन न्यायाधीश देशपांडे यांनी केले तर आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सु.ना. राजूरकर यांनी मानले. (प्रतिनिधी)वैकल्पिक न्याय निवारण ही संकल्पना प्राचीनच वैकल्पिक न्याय निवारण ही संकल्पना पूर्व काळापासून चालू असून तिला आता व्यापक स्वरूप प्राप्त झालेले आहे. या नवीन इमारतीतून अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यासाठी यंत्रणा सज्ज झालेली आहे. वैकल्पिक वाद निवारण कक्षातून आपसी तडजोडीने मिटणारी प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे ही निकाली निघतील. न्यायालयीन प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी दावेदार, प्रतिवादी यांना मध्यस्थांमार्फत त्यांचे महत्त्व पटवून दिल्यास तेही प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी पुढे येतात, असे सांगून त्यांनी वैकल्पिक वाद निवारण कक्ष, कक्षाची संकल्पना, प्रक्रिया, मध्यस्थाची भूमिका आदी विषयांवर सविस्तर मांडणी करून प्रत्येक व्यक्तीला वेळेत न्याय सेवा मिळेल, असा विश्वास न्यायमूर्ती नाईक यांनी व्यक्त केला.