शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपणासह संगोपनाला महत्त्व द्या

By admin | Updated: May 31, 2017 00:41 IST

५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात यंदा ९ लाख वृक्ष लावण्यात येत आहेत.

शैलेश नवाल : यंदाच्या पावसाळ्यात नऊ लाख रोपटी लावणार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात यंदा ९ लाख वृक्ष लावण्यात येत आहेत. या वृक्षांच्या रोपणासह त्यांच्या संगोपणाची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. जिल्ह्यात वृक्षलागवड कमी झाली तरी चालेल; पण लावण्यात आलेले वृक्ष जगविण्यासाठी नागरिकांसह स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून केले. जिल्हाधिकारी नवाल पुढे म्हणाले, ४ जूनला वर्धा शहरात वृक्षलागवडीसाठी महाश्रमदान होणार आहे. यात नागरिकांसह स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत. गत वर्षी लावण्यात आलेले ९३ टक्के वृक्ष वनविभागाने नागरिकांच्या सहकार्याने जगविले आहे. इतर विभागाची टक्केवारी ७७ आहे. यंदा वृक्ष लागवडी सोबतच चारा लागवड करून शिवार हिरवे ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना विशेष सहकार्यही मिळणार आहे. शासकीय व महसूल विभागाच्या जमिनीवर वृक्षारोपण करून ते जगविण्याची इच्छा असणाऱ्यांना शासकीय जागेवर विंधन विहीर व संरक्षण भिंत तसेच कुंपण तयार करून दिले जाणार आहे. याकरिता आतापर्यंत ८ ते ९ जणांचे आवेदन प्राप्त झाले आहेत. या उपक्रमात ग्रीन आर्मीच्या ३२ हजार सदस्यांचेही सहकार्य घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. ग्रीन वर्धा करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन हनुमान टेकडीवर व कमळ तलाव परिसरात १५ हजार वृक्ष, पुलगाव सिएडी कॅम्प परिसरात २० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन आहे. नदी, नाला, तलाव असलेल्या एकूण २५० कि.मी.च्या भागात २ लाख बांबुचे वृक्ष लावण्यात येत आहे. केवळ खड्डे खोदून वृक्ष लावले, असे न होऊ देता नागरिकांसह सामाजिक संघटनांनी व शासकीय विभागाने प्रत्यक्षात वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे. जिल्ह्यात झाडांसह चारायुक्त शिवार तयार करावयाचा आहे. वृक्षारोप कमी झाले तरी चालेल; पण लावलेले प्रत्येक झाड जगविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे, असे जिल्हाधिकारी नवाल म्हणाले. या पत्रपरिषदेला उपवनसंरक्षक दिगंबर पगार, पोलीस उपअधीक्षक (गृह) रवींद्र किल्लेकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा साबळे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, पिपल्स फॉर अ‍ॅनिमल्सचे आशीष गोस्वामी आदींची उपस्थिती होती.