शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
3
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
4
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
5
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
6
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
7
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
8
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
9
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
10
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
11
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
12
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
13
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
14
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
15
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
17
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
18
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
19
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
20
'या' कंपनीचा शेअर २३९० वरून ५९ रुपयांवर घसरला; सेबीने केलेली कारवाई, आता नवी माहिती समोर

वृक्षारोपणासह संगोपनाला महत्त्व द्या

By admin | Updated: May 31, 2017 00:41 IST

५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात यंदा ९ लाख वृक्ष लावण्यात येत आहेत.

शैलेश नवाल : यंदाच्या पावसाळ्यात नऊ लाख रोपटी लावणार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात यंदा ९ लाख वृक्ष लावण्यात येत आहेत. या वृक्षांच्या रोपणासह त्यांच्या संगोपणाची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. जिल्ह्यात वृक्षलागवड कमी झाली तरी चालेल; पण लावण्यात आलेले वृक्ष जगविण्यासाठी नागरिकांसह स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून केले. जिल्हाधिकारी नवाल पुढे म्हणाले, ४ जूनला वर्धा शहरात वृक्षलागवडीसाठी महाश्रमदान होणार आहे. यात नागरिकांसह स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत. गत वर्षी लावण्यात आलेले ९३ टक्के वृक्ष वनविभागाने नागरिकांच्या सहकार्याने जगविले आहे. इतर विभागाची टक्केवारी ७७ आहे. यंदा वृक्ष लागवडी सोबतच चारा लागवड करून शिवार हिरवे ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना विशेष सहकार्यही मिळणार आहे. शासकीय व महसूल विभागाच्या जमिनीवर वृक्षारोपण करून ते जगविण्याची इच्छा असणाऱ्यांना शासकीय जागेवर विंधन विहीर व संरक्षण भिंत तसेच कुंपण तयार करून दिले जाणार आहे. याकरिता आतापर्यंत ८ ते ९ जणांचे आवेदन प्राप्त झाले आहेत. या उपक्रमात ग्रीन आर्मीच्या ३२ हजार सदस्यांचेही सहकार्य घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. ग्रीन वर्धा करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन हनुमान टेकडीवर व कमळ तलाव परिसरात १५ हजार वृक्ष, पुलगाव सिएडी कॅम्प परिसरात २० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन आहे. नदी, नाला, तलाव असलेल्या एकूण २५० कि.मी.च्या भागात २ लाख बांबुचे वृक्ष लावण्यात येत आहे. केवळ खड्डे खोदून वृक्ष लावले, असे न होऊ देता नागरिकांसह सामाजिक संघटनांनी व शासकीय विभागाने प्रत्यक्षात वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे. जिल्ह्यात झाडांसह चारायुक्त शिवार तयार करावयाचा आहे. वृक्षारोप कमी झाले तरी चालेल; पण लावलेले प्रत्येक झाड जगविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे, असे जिल्हाधिकारी नवाल म्हणाले. या पत्रपरिषदेला उपवनसंरक्षक दिगंबर पगार, पोलीस उपअधीक्षक (गृह) रवींद्र किल्लेकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा साबळे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, पिपल्स फॉर अ‍ॅनिमल्सचे आशीष गोस्वामी आदींची उपस्थिती होती.