शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

अतिक्रमणधारकांना घरपट्टे द्या

By admin | Updated: April 8, 2017 00:34 IST

नजीकच्या सिंदी (मेघे) भागातील समतानगर येथील अतिक्रमण धारकांना तात्काळ घर पट्टे देण्यात यावे,

आंदोलन : मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन वर्धा : नजीकच्या सिंदी (मेघे) भागातील समतानगर येथील अतिक्रमण धारकांना तात्काळ घर पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी शुक्रवारी स्थानिक पोस्ट आॅफिस चौक भागातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने समतानगर येथील रहिवासी सहभागी झाले होते. निवेदनातून सिंदी (मेघे) भागातील अतिक्रमण करून राहत असलेल्या ३५ कुटुंबियांना अद्यापही जमिनीचे स्थायी पट्टे देण्यात आलेले नाही. जमिनिचे स्थायी पट्टे न देण्यात आल्याने त्यांना विविध शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. एक महिन्यांपूर्वी सदर समस्या निकाली निघावी म्हणून निवेदन देण्यात आले होते. परंतु, अद्यापही कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप करीत तात्काळ सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवदनातून करण्यात आली आहे. सुरूवातीला निवेदन देण्यात आले त्यावेळी तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्याकडून दोन ते तीन दिवसांत समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे सांगण्यात आले होेते. परंतु, नंतर विचारणा केली असता अतिक्रमण धारकांनी सादर केलेले आवश्यक कागदपत्रेच कार्यालयातून गहाळ असल्याचे तसेच नव्याने आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे सांगण्यात आले. तहसील कार्यालयातून समतानगरातील नागरिकांनी सादर केलेले कागदपत्रे गहाळ होणे ही निंदनीय बाब असल्याचा आरोप करीत याचा युवा परिवर्तन की आवाज निषेध करीत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. सदर प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच समतानगर येथील अतिक्रमण धारकांना तात्काळ जमिनीचे पट्टे देण्यासाठी शुक्रवारी स्थानिक पोस्ट आॅफिस चौकातून मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा दुपारी १ वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयावर धडकला. तहसील कार्यालयात आंदोलनकर्त्यांचे म्हणणे नायब तहसीलदार डी.एन. राऊत यांनी जाणून घेतले. तसेच त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदनही स्वीकारले. आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर जोरदार नारेबाजीही केली. सकारात्क चर्चेअंती संतप्त आंदोलनकर्ते शांत झाले. आंदोलनात निहाल पांडे, पलाश उमाटे, राहुल मिश्रा, गौरव वानखेडे, हेमंत भोसले, शैलेश गिरी, धरम शेंडे, सुरज गायकवाड, साहिल नाडे, प्रतिक कामडी, अर्चना वैरागडे, वैशाली पाटील, गीता डोंगरे यांच्यासह समतानगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी) समतानगर भागातील ३५ अतिक्रमण धारकांनी आवश्यक कागदपत्रे संलग्न करून जमिनीचे स्थायी पट्टे मिळण्याबाबत तहसील कार्यालयात आवेदन सादर केले आहे. परंतु, सदर कागदपत्रेच गहाळ असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत असून तात्काळ समतानगर येथील नागरिकांना जमिनीचे स्थायी पट्टे देण्यात यावे, अशी मागणी आज आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केली. मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.