शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या

By admin | Updated: January 7, 2017 00:58 IST

विद्यमान राज्य सरकराच्या दोन वर्षांच्या काळात तब्बल ६ हजार २३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

समता परिषदेचे धरणे आंदोलन वर्धा : विद्यमान राज्य सरकराच्या दोन वर्षांच्या काळात तब्बल ६ हजार २३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पीक विमा कंपन्यांच्या दबावाखाली जिल्ह्यातील आणेवारी ८० पैशाच्यावर दाखविण्याचा विक्रम शासकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतीवरील कर्जाची वसुली करण्यासाठी बँकांचा तगादा शेतकऱ्यांच्या मागे लागणार आहे. शेतकऱ्यांंना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, उत्पादन कर्जाच्या दीडपट भावाचा किमान हमीभाव जाहीर करावा आणि लँड पुलींगची अधिसुचना रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समता परिषदेने धरणे आंदोलन केले. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांंची शेतीवाडी जप्ती करून, लिलाव करून, बँकांकडून कर्जवसुली करणार आहे. नागपूर-मुंबई समृद्धी हायवेत वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची १० हजार एकर सुपीक शेतजमिन जाणार आहे. शेतकऱ्यांचे ३२ हजार कोटी रूपयाचे कर्ज माफ करावे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले. निवासी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी निवेद्न स्वीकारले. महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे आणि कार्यकर्ते व शेतकरी आंदोलनात सहभागी होते. तसेच ज्यांच्या शेतजमिनी या महामार्गात जात आहे, अशी जिल्ह्यामधील शेतकरी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी धरणे आंदोलन मंडपाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ना. अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारूलता टोकस, माजी मंत्री रणजित कांबळे, वर्धेचे माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, प्रवीण हिवरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबन तायडे, गिरीष पांडव, किसान अधिकार अभियानाचे अविनाश काकडे, बाळा जगताप यांनी भेटी देवून शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना जिल्हा संघटक विनय डहाके, जिल्हा अध्यक्ष निळकंठ पिसे, संयोजक निळकंठ राऊत, महिला जिल्हा अध्यक्ष कविता मुंगले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)