शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या

By admin | Updated: January 7, 2017 00:58 IST

विद्यमान राज्य सरकराच्या दोन वर्षांच्या काळात तब्बल ६ हजार २३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

समता परिषदेचे धरणे आंदोलन वर्धा : विद्यमान राज्य सरकराच्या दोन वर्षांच्या काळात तब्बल ६ हजार २३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पीक विमा कंपन्यांच्या दबावाखाली जिल्ह्यातील आणेवारी ८० पैशाच्यावर दाखविण्याचा विक्रम शासकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतीवरील कर्जाची वसुली करण्यासाठी बँकांचा तगादा शेतकऱ्यांच्या मागे लागणार आहे. शेतकऱ्यांंना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, उत्पादन कर्जाच्या दीडपट भावाचा किमान हमीभाव जाहीर करावा आणि लँड पुलींगची अधिसुचना रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समता परिषदेने धरणे आंदोलन केले. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांंची शेतीवाडी जप्ती करून, लिलाव करून, बँकांकडून कर्जवसुली करणार आहे. नागपूर-मुंबई समृद्धी हायवेत वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची १० हजार एकर सुपीक शेतजमिन जाणार आहे. शेतकऱ्यांचे ३२ हजार कोटी रूपयाचे कर्ज माफ करावे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले. निवासी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी निवेद्न स्वीकारले. महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे आणि कार्यकर्ते व शेतकरी आंदोलनात सहभागी होते. तसेच ज्यांच्या शेतजमिनी या महामार्गात जात आहे, अशी जिल्ह्यामधील शेतकरी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी धरणे आंदोलन मंडपाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ना. अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारूलता टोकस, माजी मंत्री रणजित कांबळे, वर्धेचे माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, प्रवीण हिवरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबन तायडे, गिरीष पांडव, किसान अधिकार अभियानाचे अविनाश काकडे, बाळा जगताप यांनी भेटी देवून शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना जिल्हा संघटक विनय डहाके, जिल्हा अध्यक्ष निळकंठ पिसे, संयोजक निळकंठ राऊत, महिला जिल्हा अध्यक्ष कविता मुंगले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)