शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांना अनुदानावर शेतीकुंपण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 23:49 IST

तालुक्यातील जंगलव्याप्त भागातील शेतकऱ्यांची महाकाळी येथे बैठक पार पाडली. या बैठकीत शेतकºयांची पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट घालून चर्चा करण्याचे आश्वासन माजी आमदार दादाराव केचे यांनी दिले होते.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी दिले आदेश : दादाराव केचे यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी मांडल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील जंगलव्याप्त भागातील शेतकऱ्यांची महाकाळी येथे बैठक पार पाडली. या बैठकीत शेतकºयांची पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट घालून चर्चा करण्याचे आश्वासन माजी आमदार दादाराव केचे यांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी वर्ध्यात सर्व शेतकऱ्यांची पालकमंत्र्यांशी भेट घालून दिली असता शेतकऱ्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले. पालकमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा करीत जंगलव्याप्त भागातील शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर शेती कुंपण द्या, असे आदेश जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक यांना दिले.आर्वी तालुक्यातील बोरगाव (गोंडी), सुसुंद, हेटी, सहेली, डबलीपूर, मासोद, काचनुर, महाकाळी, दहेगाव (गोंडी) व लादगड येथील शेतकरी जंगली श्वापदामुळे त्रस्त झाले आहे. एकीकडे निसर्गाचा प्रकोप तर दुसरीकडे जंगली श्वापदांचा उपद्रव यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. शेतीची पेरणी ते काढणीपर्यंत शेतकºयांना जंगलीप्राणी सळो की पळो करुन सोडत आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत पिकांना वाचविण्याकरिता चोविस तास शेतात राहावे लागते. परिणामी प्रपंच प्रभावित झाला असून परिवारीक समारंभालाही उपस्थित राहता येत नाही. मुलाबाळांनाही शेतात रखवाली करिता जावे लागत असल्याने त्यांच्याही शिक्षणावर पाणी सोडले जात आहे. कर्ज व उसणवारी पैसे घेऊन पेरलेल्या शेतात पीक वर आले की एक तर निसर्ग किंवा जंगली श्वापदामुळे नष्ट होते. त्यामुळे आता मुला-मुलींचा विवाह, आरोग्य व शिक्षणाचा खर्च क सा करावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जागली करताना शेतकºयांच्या जीवालाही धोका संभावत आहे. या विविध प्रश्नांना शेतकºयांच्या बैठकीत वाचा फोडण्यात आली. त्यामुळे माजी आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वात या सर्व शेतकºयांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकºयांनी आपली समस्या मांडत विविध मागणीचे निवेदन दिले. त्यावर पालकमंत्र्यांत्री ‘शेतकºयांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यास शासन कटिबद्ध असून महाराष्ट्र शासनाची तिजोरी सदैव शेतकºयांकरीता उघडी आहे’ असे सांगत शेतकºयांच्या सक्रीय सहभागाने शेताच्या कुंपनासहीत वन विभागामार्फत जंगल सिमांना कुंपन करण्यात येईल. तसेच ७५ टक्के अनुदानावर शेतकºयांना शेत कुंपन उपलब्ध करुन द्यावे, असे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व उप वनसंरक्षक शर्मा यांना दिले. यावेळी माजी आमदार दादाराव के चे यांच्यासह पंचायत समिती सदस्य नितीन अरबट, सहेलीचे माजी सरपंच नरेश तेलंग, विशाल सहाकारी संस्था खरांगणाचे अध्यक्ष मेघराज पेठे, लादगडचे सरपंच शिवशंकर ठाकरे, प्रविण घोळे, काचपूरचे उपसरपंच वाळेकर, बाबाराव कामळे, दहेगाव (गोंडी) चे सरपंच पुरुषोत्तम भड आणि परिसरातील शेतकºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार