शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:02 IST

समृद्धी महामार्गात स्मार्ट न्यू सिटीसाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू होत आहे. यासाठी पुन्हा लँड पुलींगचे तुणतुणे शासन वाजवित आहे. त्याचा विरोध करून स्मार्ट सिटीमध्ये जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार भावाच्या पाचपट रक्कम मिळावी.

ठळक मुद्देम. फुले समता परिषदेची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समृद्धी महामार्गात स्मार्ट न्यू सिटीसाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू होत आहे. यासाठी पुन्हा लँड पुलींगचे तुणतुणे शासन वाजवित आहे. त्याचा विरोध करून स्मार्ट सिटीमध्ये जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार भावाच्या पाचपट रक्कम मिळावी. विहीर व विद्युत मोटरपंप असलेली शेतजमीन उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करीत कायद्यातील तरतुदीनुसार बाजार भावाच्या १० ते २० पट भाव द्यावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेने केले. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.याबाबत सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांना म. फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, समृद्धी महामार्ग प्रकल्प बाधित संघर्ष समितीचे अ‍ॅड. महेंद्र धोटे, शेतकरी व कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले. राज्य शासनाचा तुकडे बंदीचा ‘फ्रगंट अ‍ॅक्ट’ कायदा आहे. यात शेतजमिनीचे दोन एकरच्या आत तुकडे पाडता येत नाही. असे असताना शासन पुरस्कृत समृद्धी महामार्गात थेट खरेदी पद्धतीने जमीन खरेदी करताना दोन एकरच्या आतील तुकडे तसेच ठेवून शेतकºयांची शेतजमीन खरेदी केली. हे कायद्यानुसार नियमबाह्य आहे. अशा तुकड्यांच्या जमिनीवर शेतकरी काहीही करू शकत नाही. या तुकड्यांना महसूल विभागाची मान्यता नसल्याने त्याचा आर्थिक लाभही शेतकºयांना मिळू शकत नाही. यामुळे हे जे दोन एकरच्या आत शेतजमिनीचे उरलेले तुकडे आहे, ते समृद्धी महामार्ग प्राधिकरणाने त्याच किंमतीत खरेदी करावे. अन्यथा जिल्हाधिकाºयांनी तुकडे बंदीचा कायदा मोडल्याने या समृद्धी महामार्ग प्राधिकरणाला दंड आकारावा. त्यांनी केलेल्या शेती खरेदी अवैध घोषित कराव्या, अशी मागणी करण्यात आली.समृद्धी महामार्गात शेतजमीन गेल्याने विस्थापित शेतकºयांनाही विस्थापितांची भरपाई समृद्धी महामार्ग प्राधिकरणने द्यावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली. या मागण्या मान्य न झाल्यास शेतकºयांना सोबत घेऊन जिल्ह्यात मोठे आंदोलन उभारण्यात येईल, अशा इशारा महात्मा फुले समता परिषद व समृद्धी महामार्ग संघर्ष समितीने संयुक्त निवेदनातून दिला आहे.जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ पिसे, समृद्धी महामार्ग संघर्ष समितीचे अ‍ॅड. महेंद्र धोटे, निळकंठ राऊत, केशव तितरे, संजय भगत, केशव तितरे, जयंत मानकर, कवडू बुरंगे, राजेंद्र झिले, सय्यद अफसर, रोशन इसापडे, दिलीप वंजारी, श्रीकांत वंजारी, राजकुमार मुघडे, लुकेश सावरकर, गोविंद मेहरे, हुमाँयू इकबाल सय्यद, जयवंत कनेरी, भरत चौधरी, सुनील सावध, म्हस्के, कुबडे व शेतकरी उपस्थित होते.ओलिताच्या जमिनीस १० ते २० पट दर गरजेचेशेतात विहिरींचे बांधकाम केलेले असेल आणि विद्युत पंपाद्वारे शेतपिकांचे सिंचन केले जात असेल तर तशी जमीन खरेदी करताना बाजार भावापेक्षा १० ते २० पट मोबदला दिला गेला पाहिजे, असे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. या निर्णयाचा आदर करीत शेतकऱ्यांना मोबदला देणे गरजेचे असल्याचे मतही म. फुले समता परिषदेने नमूद केले.