शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

मातंग समाजाला आठ टक्के आरक्षणाचा लाभ द्या

By admin | Updated: August 26, 2014 00:10 IST

कुठल्याही शुभ-अशुभ कार्यात पाठीशी असणारा मातंग समाज आज विकासाच्या बाबतीत कोसो दूर आहे. आधूनिक काळाने त्यांच्या इदरनिर्वाहाने पारंपरिक माध्यम हिसकावून

मागणी : नोकरीसाठी बेरोजगारांची भटकंतीतळेगाव (श्या.) : कुठल्याही शुभ-अशुभ कार्यात पाठीशी असणारा मातंग समाज आज विकासाच्या बाबतीत कोसो दूर आहे. आधूनिक काळाने त्यांच्या इदरनिर्वाहाने पारंपरिक माध्यम हिसकावून घेतल्याने समाजाला आठ टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी समाजबांधवांच्या वतीने केली जात आहे. ब्रिटिश काळापासून हा समाज पाच राज्यांमध्ये विखुरलेला आहे. लग्न, मुंजी यांसारख्या शुभप्रसंगी तसेच मय्यतीसारख्या दु:खाच्या प्रसंगी मातंग समाज बॅन्ड वाजवून आपला उदरनिर्वाह करीत आहे. आजही याच व्यवसायावर हा समाज जीवन जगत असला तरी आधुनिकतेमुळे त्यांचा हा रोजगार हिरावला जात आहे. हा समाज शिक्षणात बराच माघारलेला आहे. त्यातच अत्यंत कमी आरक्षण असल्याने समाजातील बेरोजगारांचा नोकरीत टिकाव लागत नाही. पूर्वी केवळ मातंग समाजच बॅन्ड वाजवीत होता. परंतु आज इतरांनीही बॅन्ड पथके तयार करी केली आहेत. पोलीस बॅन्डमध्ये दाखल व्हायचे असेल तर आधी संगीताची पदवी मिळवा असा गृहखात्याचा आदेश आहे. विशेषत: संगीताची पदवी मिळविली तर कुठला समाज बांधव हातात बॅन्ड घेईल असा प्रश्न समाज बांधव उपस्थित करीत आहे. इंग्रजांच्या काळात मातंग समाजाशिवाय कुणीही बॅन्ड वाजवीत नव्हते. तेव्हा कुठली संगीत विषयाची परीक्षाही नव्हती. जन्मापासूनच मातंग समाजातील मुले आपल्या आजुबाजुला व घरात बॅन्ड ऐकत असतात. जन्मजात संगीत अवगत असलेल्याब समाजाला आता नोकरीसाठी संगीत विषयाची परीक्षा द्यावी लागेल का, तसेच शाळेमध्ये बॅन्ड वाजविणे शिकविले जाते का असे अनेक प्रश्न या समाजातील बेरोजगार युवक उपस्थित केले आहे. ब्रिटिशकालीन १९३५ चा अनुसूचित जातीचा कायदा करण्यात आल्याने त्यात अ, ब, क, ड असे वर्गीकरण केले नाही. त्यामुळे हा समाज अद्यापही दारिद्रयातच आहे. त्यामुळे आठ टक्के आरक्षण मिळणे हा मुलभूत हक्क आणि आवश्यकता असल्याची भावना समाजातील नागरिक व्यक्त करीत आहे. अखील भारतीय मातंग संघाच्या वतीने १४ वर्षे संघर्ष करून क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज आयोग लागू करण्याची मागणी शासन दरबारी आहे. स्वतंत्र समाज आयोग लागू करण्यासाठी प्रशासनाशी हा समाज दोन हात करीत आहे. परंतु समाजाला वेतन, जमीन, उत्पन्न, पुनर्वसन, आरक्षण आणि उपजीविकेचे कोणतेच साधन नाही. शासनाकडे जमिनी नसल्याने वनखात्याच्या जमिनी देणे गरजेचे आहे. मातंग समाजाला विधान परिषद, राज्यसभेवर नेतृत्वाची संधी नसून मंत्री केवळ आश्वासन देत असल्याचा आरोप होत आहे. या समाजातील राजकीय आधार घेऊन पुढे आलेल्या नेत्यांचे म्हणणे आहे. मातंग समाजाची प्रत्येक गावात आजही वेगळी वस्ती आहे. मग आरक्षण वेगळे का नाही असा सवालही समाजबांधव उपस्थित करीत आहे.(वार्ताहर)