शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना ५० लाख द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

या परिषदेला प्रशांत गावंडे, चंद्रशेखर डोईफोडे, रवी पाटील अरबट, संगीता मालोड, हितेश महल्ले, महेश पेंदे, रामचंद्र बारंगे, अनिल पेंदाम, विजय गाखरे, अमोल घागरे, योगेश दलाल, शंकर बारंगे, उत्तम चोपडे, श्रीधर धामणकर, किशोर उकंडे, केशव भक्ते, बाबा शेखार, बापुराव कडवे, मनोहर पठाडे यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

ठळक मुद्देविविध ठराव पारित : शेत जागर मंचची जंगल परिषद

लोकमत न्यूज नेटवर्ककन्नमवारग्राम : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकरी, शेतमजूर यांच्या कुटुंबीयांना ५० लाख आर्थिक मदत देण्यात यावी, शासनाने जंगलव्याप्त क्षेत्रात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी काटेरी कुंपण निशुल्क करून द्यावे, असे ठराव बांगडापूर येथे पार पडलेल्या शेत जागर मंचाच्या जंगल परिषदेत पारित करण्यात आले.या परिषदेला प्रशांत गावंडे, चंद्रशेखर डोईफोडे, रवी पाटील अरबट, संगीता मालोड, हितेश महल्ले, महेश पेंदे, रामचंद्र बारंगे, अनिल पेंदाम, विजय गाखरे, अमोल घागरे, योगेश दलाल, शंकर बारंगे, उत्तम चोपडे, श्रीधर धामणकर, किशोर उकंडे, केशव भक्ते, बाबा शेखार, बापुराव कडवे, मनोहर पठाडे यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. या सभेमध्ये अकोला येथील कार्यकर्ते प्रशांत गावंडे यांनी जंगल परिषदेच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. आज शेतकरी पेरणीपासून शेतमाल निघेपर्यंत शेतात रात्री जागतो. परंतु जंगलात रोही, डुकर, हरिण, वाघ आदी वन्य प्राण्याच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान होत आहे. वनविभाग पंचनामा करून इतर कागदपत्राची पुर्तता केल्यावरही नाममात्र मदत हातात ठेवतात. त्यामुळे या परिसरातील अर्धी अधिक जमीन पडीत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची व्यथा शासनापर्यंत पोहचावी या येथे जंगल परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे गावंडे यांनी सांगितले. सदर जंगल परिषदेची सांगता शेतकºयांनी आणलेल्या शिदोºयामधील अन्नग्रहण करून अभिनव पध्दतीने करण्यात आली. या परिषदेला कन्नमवारग्राम, हेटीकुंडी, सावळी, आगरगाव, बोरी, धर्ती, नांदोरा (हेटी), सिंदीविहीरी, आंभोरा आदी गावातील शेतकरी, शेतमजुर उपस्थित होते. या जागरण परिषदेचे कुणीही अध्यक्ष नाही, कुणीही सदस्य होवू शकता व आपल्या परिसरातील जनतेला सोबत घेवून आपणच आपले प्रश्न सोडवावे असेही आवाहन करण्यात आले. जंगल व्याप्त भागात वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे दिवसाला वीज पुरवठा देण्यात यावा अशी मागणी परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली.जागर परिषदेचे काम हे अकोला जिल्ह्यात सुरू झाले. आज संपूर्ण राज्यात या परिषदेचे काम सुरू होत आहे. कुणाकडून वर्गणीसुद्धा घेतली जात नाही. सर्वसामान्य माणसाचे प्रमुख प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कार्य करीत आहोत. या संघटनेत कोणतेही पद नाही.- रवी पाटील (अरबट),अकोला.

टॅग्स :Tigerवाघ