शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

एकरी २५ हजारांची मदत द्या

By admin | Updated: November 30, 2014 23:11 IST

खरीप हंगामात पावसाच्या लंपडावामुळे हिंगणघाट- समुद्रपूर परिसरातील शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकांची दुबार-तिबार पेरणीला समोर जावे लागले. यामुळे बी-बीयाणे व रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना

तहसीलदारांना निवेदन : समुद्रपूर व हिंगणघाट येथील शेतकऱ्यांची मागणीहिंगणघाट : खरीप हंगामात पावसाच्या लंपडावामुळे हिंगणघाट- समुद्रपूर परिसरातील शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकांची दुबार-तिबार पेरणीला समोर जावे लागले. यामुळे बी-बीयाणे व रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना अतोनात खर्च करावा लागला. तसेच रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे एकरी २५ हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना देण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना केली.सोयाबीनचे संपूर्ण पीक यंदाच्या बेभरवशी पावसाने वाया गेले. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी केलेला खर्चही निघू शकला नाही. यामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. काही शोतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक न सवंगता सरळ शेतात गुरे सोडुन दिली. पीकांच्या या स्थितीमुळे शेतकऱ्यांची दिवाळीही अंधारमय गेली. कापसाची लागवडही दोन-तिनदा करण्यात आली. त्यालाही पुरेसे पाणी मिळाले नाही. अपुऱ्या पावसामुळे कपाशी पिकाच्या जमिनीमध्ये भेगा पडलेल्या आहे. पठारी भागातील कपाशीचे पीक तर सुकलेल्या अवस्थेत आहे. अशातच पडलेली थंडी व धुके यामुळे कपाशीवर मोठ्या प्रमाणात लाल्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. अगोदरच विदर्भातील शेतकऱ्यांचे नापिकीमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे लाल्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत म्हणून एकरी २५ हजार रूपये देण्याची मागणी रुपेश लाजुरकर यांच्या सहकार्याने समुद्रपूर व हिंगणघाट परिसरातील शेतकऱ्यांनी येथील तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली. तसेच मागण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांनाही पाठविण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)