शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

एकरी २५ हजारांची मदत द्या

By admin | Updated: November 30, 2014 23:11 IST

खरीप हंगामात पावसाच्या लंपडावामुळे हिंगणघाट- समुद्रपूर परिसरातील शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकांची दुबार-तिबार पेरणीला समोर जावे लागले. यामुळे बी-बीयाणे व रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना

तहसीलदारांना निवेदन : समुद्रपूर व हिंगणघाट येथील शेतकऱ्यांची मागणीहिंगणघाट : खरीप हंगामात पावसाच्या लंपडावामुळे हिंगणघाट- समुद्रपूर परिसरातील शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकांची दुबार-तिबार पेरणीला समोर जावे लागले. यामुळे बी-बीयाणे व रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना अतोनात खर्च करावा लागला. तसेच रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे एकरी २५ हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना देण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना केली.सोयाबीनचे संपूर्ण पीक यंदाच्या बेभरवशी पावसाने वाया गेले. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी केलेला खर्चही निघू शकला नाही. यामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. काही शोतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक न सवंगता सरळ शेतात गुरे सोडुन दिली. पीकांच्या या स्थितीमुळे शेतकऱ्यांची दिवाळीही अंधारमय गेली. कापसाची लागवडही दोन-तिनदा करण्यात आली. त्यालाही पुरेसे पाणी मिळाले नाही. अपुऱ्या पावसामुळे कपाशी पिकाच्या जमिनीमध्ये भेगा पडलेल्या आहे. पठारी भागातील कपाशीचे पीक तर सुकलेल्या अवस्थेत आहे. अशातच पडलेली थंडी व धुके यामुळे कपाशीवर मोठ्या प्रमाणात लाल्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. अगोदरच विदर्भातील शेतकऱ्यांचे नापिकीमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे लाल्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत म्हणून एकरी २५ हजार रूपये देण्याची मागणी रुपेश लाजुरकर यांच्या सहकार्याने समुद्रपूर व हिंगणघाट परिसरातील शेतकऱ्यांनी येथील तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली. तसेच मागण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांनाही पाठविण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)