शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

मुलींचीच सरशी

By admin | Updated: May 26, 2016 01:00 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी/मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला.

जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के : १३ हजार ८७९ विद्यार्थी उत्तीर्णवर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी/मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के लागला. गतवर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घसरली. गतवर्षी ८८.८६ टक्के एवढा निकाल होता. सतत तिसऱ्या वर्षी ही घसरण कायम आहे. यंदाही जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली असून पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींची आघाडी कायम राहिली. जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेत पहिला येण्याचा मान यंदा वर्धा येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेजच्या स्वराली विलास घोडखांदे या विद्यार्थिनीने पटकाविला. तिला ६५० पैकी ६२४ गुण (९६ टक्के) मिळाले. प्रियाली संजय गाठे ही जिल्ह्यातून दुसरी आली. ती वर्धा येथील गांधीग्राम विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला ६५० पैकी ६११ गुण (९४ टक्के) मिळाले. तृतीय स्थान कल्याणी ज्ञानेश्वर लोणकर हिने मिळविले असून ती वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात पहिली आली आहे. तीसुद्धा वर्धा येथील गो.से. वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला ६५० पैकी ६१० गुण (९३.८५ टक्के) मिळाले. नागपूर विभागाचा निकाल १ वाजता आॅनलाईन जाहीर होताच तो पाहण्यासाठी मुलांची धावपळ सुरू होती; पण स्मार्टफोनच्या जगात निकाल प्रत्येकाच्या हाती असल्याचे चित्र होते. ज्यांच्या स्मार्ट फोन नव्हते, ते सायबार कॅफेत गर्दी करताना दिसून आले.जिल्ह्यातील एकूण १३४ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतून एकूण १६ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता. यापैकी १६ हजार ६१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १३ हजार ८७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६ हजार ६४८ मुले तर ७ हजार २३१ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ७९.७२ टक्के तर मुलींची टक्केवारी ८७.३५ एवढी आहे.