शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
3
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
4
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
5
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
6
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
8
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
9
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
10
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
11
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
12
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
13
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
14
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
15
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
16
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
17
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
18
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
19
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
20
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग

मुलींचीच सरशी

By admin | Updated: May 26, 2016 01:00 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी/मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला.

जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के : १३ हजार ८७९ विद्यार्थी उत्तीर्णवर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी/मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के लागला. गतवर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घसरली. गतवर्षी ८८.८६ टक्के एवढा निकाल होता. सतत तिसऱ्या वर्षी ही घसरण कायम आहे. यंदाही जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली असून पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींची आघाडी कायम राहिली. जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेत पहिला येण्याचा मान यंदा वर्धा येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेजच्या स्वराली विलास घोडखांदे या विद्यार्थिनीने पटकाविला. तिला ६५० पैकी ६२४ गुण (९६ टक्के) मिळाले. प्रियाली संजय गाठे ही जिल्ह्यातून दुसरी आली. ती वर्धा येथील गांधीग्राम विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला ६५० पैकी ६११ गुण (९४ टक्के) मिळाले. तृतीय स्थान कल्याणी ज्ञानेश्वर लोणकर हिने मिळविले असून ती वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात पहिली आली आहे. तीसुद्धा वर्धा येथील गो.से. वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला ६५० पैकी ६१० गुण (९३.८५ टक्के) मिळाले. नागपूर विभागाचा निकाल १ वाजता आॅनलाईन जाहीर होताच तो पाहण्यासाठी मुलांची धावपळ सुरू होती; पण स्मार्टफोनच्या जगात निकाल प्रत्येकाच्या हाती असल्याचे चित्र होते. ज्यांच्या स्मार्ट फोन नव्हते, ते सायबार कॅफेत गर्दी करताना दिसून आले.जिल्ह्यातील एकूण १३४ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतून एकूण १६ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता. यापैकी १६ हजार ६१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १३ हजार ८७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६ हजार ६४८ मुले तर ७ हजार २३१ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ७९.७२ टक्के तर मुलींची टक्केवारी ८७.३५ एवढी आहे.