शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

मुलीने परस्पर विकली वडिलांची शेती

By admin | Updated: April 11, 2016 02:20 IST

वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन मुलीने परस्परच विकली. यासाठी वडिलांच्या जागेवर दुसऱ्याच व्यक्तीला उभे केले तर दलालाची मध्यस्थी स्वीकारण्यात आली.

पाच जणांवर गुन्हे दाखल : खरेदीदार नागपूरचा रहिवासीदेवळी : वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन मुलीने परस्परच विकली. यासाठी वडिलांच्या जागेवर दुसऱ्याच व्यक्तीला उभे केले तर दलालाची मध्यस्थी स्वीकारण्यात आली. हा प्रकार उघड होताच तक्रारीवरून पाच जणांवर शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती अशी की, महादेव डोमाजी कामडी यांच्या नावे मौजा चिकणी येथे शेत सर्व्हे क्र. २३४/२ आराजी ०.८१ हेक्टर जमीन आहे. सदर जमीन मुलगी शोभा रामेश्वर साटोणे रा. पवनार हिने परस्पर विकली. विक्री प्रसंगी वडिलांऐवजी दुसऱ्या व्यक्तीला उभे केले. दलालाच्या मदतीने सदर शेताची विक्री करण्यात आले. ही बाबत पोलीस तपासात उघड होताच गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी दिली.महादेव कामडी यांचा मृत्यू झाल्यानंतर नरेश महादेव कामडी शेत नावे करण्यासाठी पटवाऱ्याकडे गेले. यावेळी शेत सिद्धार्थ जगदीश तितुरकर (४५) रा. रमाईनगर नागपूर यांना विकल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे नरेश कामडी यांना धक्काच बसला. त्यांनी विक्रीपत्राची प्रत सहायक निबंधक कार्यालयातून प्राप्त केली. सदर विक्रीपत्रावर महादेव कामडीऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो दिसला. वडील स्वाक्षरी करीत होते; पण विक्री पत्रावर अंगठा लावला होता. यावरून ही विक्री बनावट असल्याचे आढळून आले. यामुळे नरेश यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. पोलिसांच्या तपासात पवनार येथे राहणारी मुलगी शोभा रामेश्वर साटोणे हिने पाच व्यक्तींच्या मदतीने वडिलांचे शेत विकल्याचे उघड झाले. यात नागपूर येथील शेत घेणारा सिद्धार्थ जगदीश तितुरकर, दलाल विनोद ईश्वर फुलकर रा. हिंगणघाट, सिमा वसंत कांबळे रा. मोहननगर वर्धा, मुलगी शोभा रामेश्वर साटोणे रा. पवनार, गजानन राघोराव शिंदे रा. हिंगणघाट व मन्साराम उईके रा. सावंद (जि.वर्धा) यांचा समावेश आहे. या सर्वांवर भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपींनी मिळून महादेव कामडी यांचे शेत १८ आॅक्टोबर २०१४ मध्ये सिद्धार्थ तितुरकर याला विकले; पण शेताचा कब्जा दिला नव्हता. यामुळे शेताची विक्री झाली नसल्याचे कुणालाही माहिती नव्हते. कायदेशीर कार्यवाही करण्यास अडचण जाऊ नये म्हणून तितुरकर यांनी शेतावर कब्जा घेण्यास विलंब केला. याबाबत नरेश कामडी यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तपासात हा प्रकार उघडकीस आला. यातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहितीही पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदणे यांनी दिली.(प्रतिनिधी)