शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुलीने परस्पर विकली वडिलांची शेती

By admin | Updated: April 11, 2016 02:20 IST

वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन मुलीने परस्परच विकली. यासाठी वडिलांच्या जागेवर दुसऱ्याच व्यक्तीला उभे केले तर दलालाची मध्यस्थी स्वीकारण्यात आली.

पाच जणांवर गुन्हे दाखल : खरेदीदार नागपूरचा रहिवासीदेवळी : वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन मुलीने परस्परच विकली. यासाठी वडिलांच्या जागेवर दुसऱ्याच व्यक्तीला उभे केले तर दलालाची मध्यस्थी स्वीकारण्यात आली. हा प्रकार उघड होताच तक्रारीवरून पाच जणांवर शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती अशी की, महादेव डोमाजी कामडी यांच्या नावे मौजा चिकणी येथे शेत सर्व्हे क्र. २३४/२ आराजी ०.८१ हेक्टर जमीन आहे. सदर जमीन मुलगी शोभा रामेश्वर साटोणे रा. पवनार हिने परस्पर विकली. विक्री प्रसंगी वडिलांऐवजी दुसऱ्या व्यक्तीला उभे केले. दलालाच्या मदतीने सदर शेताची विक्री करण्यात आले. ही बाबत पोलीस तपासात उघड होताच गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी दिली.महादेव कामडी यांचा मृत्यू झाल्यानंतर नरेश महादेव कामडी शेत नावे करण्यासाठी पटवाऱ्याकडे गेले. यावेळी शेत सिद्धार्थ जगदीश तितुरकर (४५) रा. रमाईनगर नागपूर यांना विकल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे नरेश कामडी यांना धक्काच बसला. त्यांनी विक्रीपत्राची प्रत सहायक निबंधक कार्यालयातून प्राप्त केली. सदर विक्रीपत्रावर महादेव कामडीऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो दिसला. वडील स्वाक्षरी करीत होते; पण विक्री पत्रावर अंगठा लावला होता. यावरून ही विक्री बनावट असल्याचे आढळून आले. यामुळे नरेश यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. पोलिसांच्या तपासात पवनार येथे राहणारी मुलगी शोभा रामेश्वर साटोणे हिने पाच व्यक्तींच्या मदतीने वडिलांचे शेत विकल्याचे उघड झाले. यात नागपूर येथील शेत घेणारा सिद्धार्थ जगदीश तितुरकर, दलाल विनोद ईश्वर फुलकर रा. हिंगणघाट, सिमा वसंत कांबळे रा. मोहननगर वर्धा, मुलगी शोभा रामेश्वर साटोणे रा. पवनार, गजानन राघोराव शिंदे रा. हिंगणघाट व मन्साराम उईके रा. सावंद (जि.वर्धा) यांचा समावेश आहे. या सर्वांवर भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपींनी मिळून महादेव कामडी यांचे शेत १८ आॅक्टोबर २०१४ मध्ये सिद्धार्थ तितुरकर याला विकले; पण शेताचा कब्जा दिला नव्हता. यामुळे शेताची विक्री झाली नसल्याचे कुणालाही माहिती नव्हते. कायदेशीर कार्यवाही करण्यास अडचण जाऊ नये म्हणून तितुरकर यांनी शेतावर कब्जा घेण्यास विलंब केला. याबाबत नरेश कामडी यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तपासात हा प्रकार उघडकीस आला. यातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहितीही पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदणे यांनी दिली.(प्रतिनिधी)