शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

गिरड परिसराला गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:17 IST

सर्वत्र पावसाची प्रतीक्षा असताना रविवारी गिरडसह परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली.

ठळक मुद्देकापसाचे पीक जमीनदोस्त : वादळी वाºयासह पावसाचा मारा

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : सर्वत्र पावसाची प्रतीक्षा असताना रविवारी गिरडसह परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली. यावेळी झालेल्या गाररपिटीमुळे कपाशीचे पीक जमिनदोस्त झाल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे.गत १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकºयांच्या नजरा आकाशाकडे होत्या. शेतातील उभे पीक कसे वाचवावे हिच चिंता शेतकºयांना भेडसावत असताना गिरड परिसरात रविवारी दुपारी वादळीवाºयासह पाऊस व गारपिटाने हजेरी लावली.रविवारी गिरड, मोहगांव, आर्वी, तावी, शिवणफळ येदलाब येथे मुसळधार पाऊस झाला. या गावांमध्ये शेतातून पाणी निघाल्याने नाले तुंडुब भरून गेले. मात्र या गावां व्यतिरिक्त तालुक्यात कुठेही पाऊस पडला नसल्याचे सांगण्यात येते. वादळीवाºयासह झालेल्या पावसामुळे व गारपिटामुळे शेतकºयांचे बºयापैकी नुकसान झाले आहे. रविवारच्या पाऊस व गारपिटामुळे कपाशी, सोयाबीन व तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पोलीस ठाण्यातील झाड उन्मळून पडलेया वादळी वाºयामुळे अने झाडे उन्मळून पडली. यात गिरड येथील पोलीस ठाण्यातील ५० वर्षांपूर्वीचे जुने गुलमोहराचे झाड उन्मळून पडले. यासह परिसरात १० ते १५ जागची मोठमोठाली झाडे वादळामुळे पडल्याचे सांगण्यात येते. झालेल्या वादळीवाºयासह गारपिटामुळे कुठलीही जीवीत हाणी झाली नसली तरी शेतकºयांची चिंता वाढविली आहे. या पावसाने गिरड, चोरविवारा, भनगापुर, नान्ही, बोथली शिवणफळ, आर्वी या शिवारातील शेतकºयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येते.ुदमदार पावसामुळे चिकणी (जा.) परिसरातील पिकांना संजीवनीचिकणी (जामणी)- दिवसभर अंगाला चटके देणारे ऊन होते. परंतु, सूर्यणारायण मावळतीला जात असताना अचानक वातावरणात बदल झाला. काळ्या ढगांनी आकाशात एकच गर्दी करून परिसरात दमदार पावसाने हजेरी दिली. या भागातील शेतकºयांसह नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती. सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे परिसरातील कपाशी, तूर, सोयाबीन व विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांना संजीवनी मिळाली आहे.विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळलासेवाग्राम- दिवसभर वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक व शेतकरी त्रस्त असताना सायंकाळी आकाशात एकच गर्दी करून विजांच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटात परिसरात पावसाच्या सरी झाल्या. पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. विविध पीकही पाण्याअभावी माना टाकत होती. पाऊस न झाल्यास जनावरांच्या चाºयासह पाण्याचा प्रश्न भेडसावेल असे बोलले जात असताना परिसरात पाऊस झाला. अजूनही या भागातील विहिरी व जलायशांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नसल्याचे वास्तव आहे. या भागातील शेतकºयांसह नागरिकांना काळ्या ढगातून जोरदार पाऊस होईल, अशी आशा आहे. इतके असले तरी सोमवारी झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.