शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

गिरड परिसराला गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:17 IST

सर्वत्र पावसाची प्रतीक्षा असताना रविवारी गिरडसह परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली.

ठळक मुद्देकापसाचे पीक जमीनदोस्त : वादळी वाºयासह पावसाचा मारा

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : सर्वत्र पावसाची प्रतीक्षा असताना रविवारी गिरडसह परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली. यावेळी झालेल्या गाररपिटीमुळे कपाशीचे पीक जमिनदोस्त झाल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे.गत १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकºयांच्या नजरा आकाशाकडे होत्या. शेतातील उभे पीक कसे वाचवावे हिच चिंता शेतकºयांना भेडसावत असताना गिरड परिसरात रविवारी दुपारी वादळीवाºयासह पाऊस व गारपिटाने हजेरी लावली.रविवारी गिरड, मोहगांव, आर्वी, तावी, शिवणफळ येदलाब येथे मुसळधार पाऊस झाला. या गावांमध्ये शेतातून पाणी निघाल्याने नाले तुंडुब भरून गेले. मात्र या गावां व्यतिरिक्त तालुक्यात कुठेही पाऊस पडला नसल्याचे सांगण्यात येते. वादळीवाºयासह झालेल्या पावसामुळे व गारपिटामुळे शेतकºयांचे बºयापैकी नुकसान झाले आहे. रविवारच्या पाऊस व गारपिटामुळे कपाशी, सोयाबीन व तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पोलीस ठाण्यातील झाड उन्मळून पडलेया वादळी वाºयामुळे अने झाडे उन्मळून पडली. यात गिरड येथील पोलीस ठाण्यातील ५० वर्षांपूर्वीचे जुने गुलमोहराचे झाड उन्मळून पडले. यासह परिसरात १० ते १५ जागची मोठमोठाली झाडे वादळामुळे पडल्याचे सांगण्यात येते. झालेल्या वादळीवाºयासह गारपिटामुळे कुठलीही जीवीत हाणी झाली नसली तरी शेतकºयांची चिंता वाढविली आहे. या पावसाने गिरड, चोरविवारा, भनगापुर, नान्ही, बोथली शिवणफळ, आर्वी या शिवारातील शेतकºयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येते.ुदमदार पावसामुळे चिकणी (जा.) परिसरातील पिकांना संजीवनीचिकणी (जामणी)- दिवसभर अंगाला चटके देणारे ऊन होते. परंतु, सूर्यणारायण मावळतीला जात असताना अचानक वातावरणात बदल झाला. काळ्या ढगांनी आकाशात एकच गर्दी करून परिसरात दमदार पावसाने हजेरी दिली. या भागातील शेतकºयांसह नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती. सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे परिसरातील कपाशी, तूर, सोयाबीन व विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांना संजीवनी मिळाली आहे.विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळलासेवाग्राम- दिवसभर वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक व शेतकरी त्रस्त असताना सायंकाळी आकाशात एकच गर्दी करून विजांच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटात परिसरात पावसाच्या सरी झाल्या. पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. विविध पीकही पाण्याअभावी माना टाकत होती. पाऊस न झाल्यास जनावरांच्या चाºयासह पाण्याचा प्रश्न भेडसावेल असे बोलले जात असताना परिसरात पाऊस झाला. अजूनही या भागातील विहिरी व जलायशांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नसल्याचे वास्तव आहे. या भागातील शेतकºयांसह नागरिकांना काळ्या ढगातून जोरदार पाऊस होईल, अशी आशा आहे. इतके असले तरी सोमवारी झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.