शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

पिपरी पुनर्वसनवासीय महिलांचा निम्न वर्धा कार्यालयांवर घागर मोर्चा

By admin | Updated: April 30, 2016 02:19 IST

गावात पाण्याच्या थेंबाकरिता नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली असताना निम्न वर्धा विभागाकडून सहा वेळा पाठविण्यात येत असलेले पाण्याचे टँकर तीनच वेळा पाठविण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांना घेराव : सहाऐवजी आता तीनदाच येतात टँकरवर्धा : गावात पाण्याच्या थेंबाकरिता नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली असताना निम्न वर्धा विभागाकडून सहा वेळा पाठविण्यात येत असलेले पाण्याचे टँकर तीनच वेळा पाठविण्यात येत आहे. यामुळे संतप्त झालेल्या पिपरी पुनर्वसन येथील महिलांनी शुक्रवारी निम्न वर्धा विभागाच्या कार्यालयावर घागर मोर्चा नेला. यावेळी अधिकाऱ्यांना घेराव घालत गावात पाणी पुरविण्याची मागणी केली. तर अधिकाऱ्यांनी यावर लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने महिलांनी माघार घेतली. निम्न वर्धा धरणात जमिनी गेलेल्या काही गावांचे पुनर्वसन सालोड (हिरापूर) नजीकच्या पिपरी येथे करण्यात आले. येथेही सुविधा पुरविण्याकरिता प्रशासनाच्यावतीने दिरंगाई करण्यात आली. गावात पाण्यासह इतर सुविधांची वाणवा आहे तर भर उन्हाळ्यात येथे पाण्याकरिताही नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. गावातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीने तळ गाठला आहे. शिवाय पाणी पुरवठ्याच्या नळयोजनेची पाईपलाईन नादुरूस्त आहे. अशात गावात पाणी पुरविण्याकरिता दिवसात तीनच टँकर पाठविण्यात येत आहे. येथे पाण्याकरिता महिलांची भांडणे होत असल्याने टँकरचे पाणी विहिरीत टाकण्यात येत आहे. येथेही महिलांची भांडणे होत आहेतच. गावात पूर्वी प्रमाणे सहावेळा पाण्याचा टँकर पाठवा, अशी मागणी करीत येथील महिलांनी निम्न वर्धा कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला.यावर अधिकाऱ्यांनी गावातील पाणी समस्या निकाली काढण्याकरिता एक नवीन विहीर प्रस्तावित असून त्यावर निर्णय होणे बाकी आहे. तर नादुरूस्त असलेली पाईपलाईन दुरूस्त करण्याचाही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. यावर लवकरच काम सुरू होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांना महिलांना सांगितले. यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)