शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पिपरी पुनर्वसनवासीय महिलांचा निम्न वर्धा कार्यालयांवर घागर मोर्चा

By admin | Updated: April 30, 2016 02:19 IST

गावात पाण्याच्या थेंबाकरिता नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली असताना निम्न वर्धा विभागाकडून सहा वेळा पाठविण्यात येत असलेले पाण्याचे टँकर तीनच वेळा पाठविण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांना घेराव : सहाऐवजी आता तीनदाच येतात टँकरवर्धा : गावात पाण्याच्या थेंबाकरिता नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली असताना निम्न वर्धा विभागाकडून सहा वेळा पाठविण्यात येत असलेले पाण्याचे टँकर तीनच वेळा पाठविण्यात येत आहे. यामुळे संतप्त झालेल्या पिपरी पुनर्वसन येथील महिलांनी शुक्रवारी निम्न वर्धा विभागाच्या कार्यालयावर घागर मोर्चा नेला. यावेळी अधिकाऱ्यांना घेराव घालत गावात पाणी पुरविण्याची मागणी केली. तर अधिकाऱ्यांनी यावर लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने महिलांनी माघार घेतली. निम्न वर्धा धरणात जमिनी गेलेल्या काही गावांचे पुनर्वसन सालोड (हिरापूर) नजीकच्या पिपरी येथे करण्यात आले. येथेही सुविधा पुरविण्याकरिता प्रशासनाच्यावतीने दिरंगाई करण्यात आली. गावात पाण्यासह इतर सुविधांची वाणवा आहे तर भर उन्हाळ्यात येथे पाण्याकरिताही नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. गावातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीने तळ गाठला आहे. शिवाय पाणी पुरवठ्याच्या नळयोजनेची पाईपलाईन नादुरूस्त आहे. अशात गावात पाणी पुरविण्याकरिता दिवसात तीनच टँकर पाठविण्यात येत आहे. येथे पाण्याकरिता महिलांची भांडणे होत असल्याने टँकरचे पाणी विहिरीत टाकण्यात येत आहे. येथेही महिलांची भांडणे होत आहेतच. गावात पूर्वी प्रमाणे सहावेळा पाण्याचा टँकर पाठवा, अशी मागणी करीत येथील महिलांनी निम्न वर्धा कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला.यावर अधिकाऱ्यांनी गावातील पाणी समस्या निकाली काढण्याकरिता एक नवीन विहीर प्रस्तावित असून त्यावर निर्णय होणे बाकी आहे. तर नादुरूस्त असलेली पाईपलाईन दुरूस्त करण्याचाही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. यावर लवकरच काम सुरू होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांना महिलांना सांगितले. यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)