शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडणाऱ्यांना सद्बुद्धी मिळो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 16:14 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडणाºयांना सद्बुद्धी मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना मंगळवारी सकाळी येथील गांधी आश्रमात पार पडलेल्या सर्वधर्म प्रार्थनेतून करण्यात आली.

ठळक मुद्देसेवाग्राम आश्रमात सर्वधर्म प्रार्थना १२ राज्यातील शिबिरार्थ्यांचा सहभाग

दिलीप चव्हाणसेवाग्राम (वर्धा) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडणाºयांना सद्बुद्धी मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना मंगळवारी सकाळी येथील गांधी आश्रमात पार पडलेल्या सर्वधर्म प्रार्थनेतून करण्यात आली. या सर्वधर्म प्रार्थनेला गांधीवादींसह सुजाण नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.महात्मा गांधी यांची हत्या १९४८ मध्ये करण्यात आली. गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून देशात नव्हे तर जगात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले. परंतु, भारत देशातीलच काही लोकांनी महात्मा गांधी यांच्याबाबतचा द्वेष मनात कायम ठेवून महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. हा प्रकार निंदनियच असल्याचा ठपका ठेवत त्या सर्वांना सद्बुद्धी मिळो यासाठी मंगळवारी सेवाग्राम आश्रमात सर्वधर्म प्रार्थना आयोजित करण्यात आली होती. महात्मा गांधी यांचे कार्य आणि त्यांचे विचार आजही तरुणांसह अनेकांना प्रेरणा देणारे असल्याचे मत यावेळी काही मान्यवरांनी मांडले. सर्वधर्म प्रार्थनेला बारा राज्यातील चाळीस शिबिरार्थ्यांसह शोभा कवाडकर, संगीता चव्हाण, प्रभा शहाणे, अश्विनी बघेल, नयी तालिम समितीचे कार्यालय मंत्री डॉ. शिवचरण ठाकुर, विजय धुमाळे आदींची उपस्थिती होती.बॉक्सतो प्रकार घृणास्पद - तौफीक मुलानीगांधीजींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गोळ्या मारण्याचा प्रकार हिंदू महासभेने केला. हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. बापूंना मारण्याचा प्रकार अनेकदा देशात झाला. अशा कृत्यांचा आम्ही निषेध करतो. आम्ही परमेश्वराकडे या व्यक्तींना सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना करतो, असे याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव तौफिक मुलानी म्हणाले.बॉक्सहा प्रकार अपमान करणाराच - कुसूम पांडेही घटना गांधीजींचा अपमान करणारीच आहे. शिवाय त्यांचे विचार व कायार्चा अपमान करणारी असून या देशातीलच लोकांनी असा निंदनिय प्रकार करावा ही शोकांतीका आहे. बापूंना देशच नव्हे तर संपूर्ण जग मानते. त्यांनी जे काही केले ते सर्व देश व मानव जातीसाठी केले. बापूंना लॉर्ड माऊंटबॅटन मानत होते; पण आपल्याच लोकांनी असे कृत्य करावे हे दुर्दैवच असल्याचे आश्रमच्या जेष्ठ कार्यकर्त्या कुसूम पांडे यांनी सांगितले.बॉक्सगांधी विचार कुणी संपवू शकत नाही - योगेंद्र पाटीलगांधीजींनी अहिंसेचा विचार या देशाला नव्हे तर जगाला दिला. त्यांनी सद्भावना निमार्नाचे काम केले. गांधीजींवर जिवंत असताना हल्ले झाले. त्यांचा खून करण्यात आला; पण आजही त्यांच्यावरील हल्ले थांबलेले नाही. बापूंच्या विचारांना कुणी संपवू शकत नाही. त्या निंदनिय काम करणाºयांना परमेश्वर सद्बुद्धी देवो, असे शिबिराचे आयोजक योगेंद्र पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSewagramसेवाग्राम