शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडणाऱ्यांना सद्बुद्धी मिळो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 16:14 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडणाºयांना सद्बुद्धी मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना मंगळवारी सकाळी येथील गांधी आश्रमात पार पडलेल्या सर्वधर्म प्रार्थनेतून करण्यात आली.

ठळक मुद्देसेवाग्राम आश्रमात सर्वधर्म प्रार्थना १२ राज्यातील शिबिरार्थ्यांचा सहभाग

दिलीप चव्हाणसेवाग्राम (वर्धा) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडणाºयांना सद्बुद्धी मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना मंगळवारी सकाळी येथील गांधी आश्रमात पार पडलेल्या सर्वधर्म प्रार्थनेतून करण्यात आली. या सर्वधर्म प्रार्थनेला गांधीवादींसह सुजाण नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.महात्मा गांधी यांची हत्या १९४८ मध्ये करण्यात आली. गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून देशात नव्हे तर जगात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले. परंतु, भारत देशातीलच काही लोकांनी महात्मा गांधी यांच्याबाबतचा द्वेष मनात कायम ठेवून महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. हा प्रकार निंदनियच असल्याचा ठपका ठेवत त्या सर्वांना सद्बुद्धी मिळो यासाठी मंगळवारी सेवाग्राम आश्रमात सर्वधर्म प्रार्थना आयोजित करण्यात आली होती. महात्मा गांधी यांचे कार्य आणि त्यांचे विचार आजही तरुणांसह अनेकांना प्रेरणा देणारे असल्याचे मत यावेळी काही मान्यवरांनी मांडले. सर्वधर्म प्रार्थनेला बारा राज्यातील चाळीस शिबिरार्थ्यांसह शोभा कवाडकर, संगीता चव्हाण, प्रभा शहाणे, अश्विनी बघेल, नयी तालिम समितीचे कार्यालय मंत्री डॉ. शिवचरण ठाकुर, विजय धुमाळे आदींची उपस्थिती होती.बॉक्सतो प्रकार घृणास्पद - तौफीक मुलानीगांधीजींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गोळ्या मारण्याचा प्रकार हिंदू महासभेने केला. हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. बापूंना मारण्याचा प्रकार अनेकदा देशात झाला. अशा कृत्यांचा आम्ही निषेध करतो. आम्ही परमेश्वराकडे या व्यक्तींना सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना करतो, असे याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव तौफिक मुलानी म्हणाले.बॉक्सहा प्रकार अपमान करणाराच - कुसूम पांडेही घटना गांधीजींचा अपमान करणारीच आहे. शिवाय त्यांचे विचार व कायार्चा अपमान करणारी असून या देशातीलच लोकांनी असा निंदनिय प्रकार करावा ही शोकांतीका आहे. बापूंना देशच नव्हे तर संपूर्ण जग मानते. त्यांनी जे काही केले ते सर्व देश व मानव जातीसाठी केले. बापूंना लॉर्ड माऊंटबॅटन मानत होते; पण आपल्याच लोकांनी असे कृत्य करावे हे दुर्दैवच असल्याचे आश्रमच्या जेष्ठ कार्यकर्त्या कुसूम पांडे यांनी सांगितले.बॉक्सगांधी विचार कुणी संपवू शकत नाही - योगेंद्र पाटीलगांधीजींनी अहिंसेचा विचार या देशाला नव्हे तर जगाला दिला. त्यांनी सद्भावना निमार्नाचे काम केले. गांधीजींवर जिवंत असताना हल्ले झाले. त्यांचा खून करण्यात आला; पण आजही त्यांच्यावरील हल्ले थांबलेले नाही. बापूंच्या विचारांना कुणी संपवू शकत नाही. त्या निंदनिय काम करणाºयांना परमेश्वर सद्बुद्धी देवो, असे शिबिराचे आयोजक योगेंद्र पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSewagramसेवाग्राम