शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमालाला योग्य आधारभूत किंमत मिळावी

By admin | Updated: November 8, 2014 01:36 IST

नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतीमालास योग्य हमीभाव मिळालाच पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांचा पेरणी प्रक्रियेपासून केलेला खर्चही निघणार नाही.

श्रेया केने वर्धानैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतीमालास योग्य हमीभाव मिळालाच पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांचा पेरणी प्रक्रियेपासून केलेला खर्चही निघणार नाही. यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढतच जाईल. पुढील वर्षीच्या पेरणीकरिता त्याला नव्याने कर्ज घ्यावे लागेल. हे दुष्टचक्र संपविण्याकरिता शेतीमालास योग्य भाव देणे गरजेचे झाले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, व्याजदरात सवलत देवून ही समस्या आटोक्यात येणार नसून याकरिता शासनस्तरावर ठोस पावले उचलण्याची गरज आहे, असे मत हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ सोबत झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. यावर्षी पावसाने दिलेला दगा, शेतकऱ्यांवर ओढवलेले दुबार, तिबार पेरणीचे संकट, बोगस बियाणे, एकरी घटलेले उत्पन्नाचे प्रमाण आणि यामुळे शेतीमालाची कवडीमोल भावात करावी लागणारी विक्री यामुळे विदर्भातील कोरडवाहू शेतकरी पिचलेला आहे. शेतकऱ्यांना या स्थितीत आधार देण्यासाठी शासनाकडून धोरणात्मक मदतीची गरज आहे. शीघ्रतम आणि दीर्घतम असे धोरण आखायला हवे. हिंगणघाट बाजार समिती सोयाबीनची मोठी पेठ आहे. या खालोखाल तुर, कपाशी यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. यावर प्रकाश टाकताना कोठारी यांनी बाजार समितीकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. शेतीमाल घेवून येणाऱ्या शेतकऱ्यास १ रूपयात जेवण आणि निवास व्यवस्था मिळते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास शिक्षणास अर्थसहाय्य केले जाते. पीक तारण योजना, वार्षिक सोडतीत लाखांवर बक्षीस शेतकऱ्यांना दिले जात असल्याने येथे अधिक आवक होत असावी, असा विश्वास व्यक्त केला. या उपाययोजना सर्वत्र राबविणे आवश्यक आहे. यंदाचे साल शेतकऱ्यांकरिता अत्यंत बिकट आहे. पिकांची कापणी करणेही परवडेनासे झाले असून शासनाने केवळ कर्जमाफी न करता शेतीमालास आधारभूत किंमत दिली पाहिजे. तसेच बियाणे, खते यात सबसिडी द्यावी, कपाशीला किमान ६ हजार रूपये प्रति क्विंटल दर मिळावा. सत्ताधाऱ्यांनी अशी घोषणा केली असून त्याच्या अंमलबजावणी प्रतीक्षा आहे. आजच्या स्थितीत ८० टक्के शेतकऱ्यांना तुटीचा सामना करावा लागणार असून आतापासूनच शासनाने ठोस निर्णय घेवून शेतकरी हिताचे धोरण राबविल्यास त्यांचेही दिवस पालटणार, अशी आशा करता येईल.