शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

अकरावी प्रवेशासाठी तुकड्या सज्ज

By admin | Updated: June 18, 2014 00:19 IST

दहावीचा निकाल लागताच अकरावी प्रवशाची धावपळ सुरू होते. बहुतांश प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तंत्रशिक्षणाकडे वळतात तर उर्वरित विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य व कला शाखेत अकरावीला प्रवेशित होतात.

वर्धा : दहावीचा निकाल लागताच अकरावी प्रवशाची धावपळ सुरू होते. बहुतांश प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तंत्रशिक्षणाकडे वळतात तर उर्वरित विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य व कला शाखेत अकरावीला प्रवेशित होतात. यावर्षी दहावीचे १५ हजार ३८३ नियमित व ७१० जुन्या अभ्यासक्रमातील असे १६ हजार ०९३ अकरावी आणि तंत्रशिक्षणामध्ये प्रवेश घेणार आहेत. यासाठी तंत्रशिक्षण वगळता तीनही शाखा मिळून जिल्ह्यात १५ हजार २३६ जागा उपलब्ध राहणार आहेत. जिल्ह्यात ११६ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांमध्ये २११ तुकड्या मंजूर आहेत. जिल्ह्यातील महाविद्यालयांत विज्ञान शाखेमध्ये ६० तुकड्या मंजूर असून ५ हजार ३०९ विद्यार्थी क्षमता आहे. कला शाखेच्या ११७ तुकड्यांमध्ये ७ हजार ४२० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. वाणिज्य शाखेच्या १६ तुकड्या असून १ हजार ११८ विद्यार्थी क्षमता तर वाणिज्य संयुक्तच्या १८ तुकड्या असून १ हजार ३९० विद्यार्थी क्षमता आहे. १६ हजार ९३ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता कला, विज्ञान व वाणिज्य शाखेच्या १५ हजार २३६ जागा असून जिल्ह्यातील पॉलीटेक्निक महाविद्यालयातील जागाही शिल्लक राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या तुलनेत मुबलक जागा असल्याने प्रवेशाकरिता धावपळ होणार नसल्याचे दिसते. उलट काही महाविद्यालयांना आपल्या तुकड्या टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळवावे लागतील, असेच आकड्यांवरून दिसून येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)