शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
3
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
4
ट्रेन सुटली तरीही वेस्ट जत नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
5
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
6
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
7
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
8
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
9
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
10
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
11
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
12
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
13
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
14
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
15
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
16
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
17
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
18
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
19
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
20
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!

अतिवृष्टीत खचलेल्या विहिरीच्या दुरूस्तीकरिता दीड लाख मिळणार

By admin | Updated: July 29, 2015 02:03 IST

अतिवृष्टी व पुरात खचलेल्या सिंचन विहिरीच्या दुरूस्तीकरिता शासनाच्यावतीने कुठलेही अनुदान दिले जात नव्हते.

वर्धा : अतिवृष्टी व पुरात खचलेल्या सिंचन विहिरीच्या दुरूस्तीकरिता शासनाच्यावतीने कुठलेही अनुदान दिले जात नव्हते. आता या विहिरींच्या दुरूस्तीकरिता १.५० लाख रुपये देण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. तसे आदेशही आले आहेत. यामुळे आत्महत्याग्रस्त वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. ही सर्व कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टीत अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी खचल्या. त्यांची कुठलीही पाहणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत नव्हती. शिवाय त्याच्या दुरूस्तीकरिता अनुदानही देण्यात येत नव्हते. यावर शेतकऱ्यांनी आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधले. यामुळे शासनाने नवे आदेश जारी करीत अशा विहिरींच्या दुरूस्तीकरिता १.५० लाख रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. याकरिता विविध प्रवर्गाचे निकष ठेवण्यात आले आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार असलेल्या या कामाकरिता खचलेल्या विहिरींचे सामूहिक पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या सर्वेक्षणाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ देण्याचे आदेशात उल्लेखित आहे. तलाठी, कृषी अधिकारी व तांत्रिक अधिकाऱ्याच्या उपस्थितीत पंचनामा करून १५ दिवसात ते जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावयाचे आहे. अहवाल प्राप्त होताच जिल्हाधिकाऱ्यांनी खचलेल्या विहिरींचे काम अनुज्ञेय असलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करावयाची आहे. कामाला मंजुरी मिळण्याकरिता सातबारावर विहिरीची नोंद अनिवार्य आहे. अर्जासोबत सातबाऱ्यावर विहिरीची नोंद नसेल तर अुनदान मिळणार नसल्याचे या आदेशात नमूद आहे. ही कामे सहा महिन्यांच्या आत पूर्ण करणे अनिवार्य आहे.शासनाच्या या आदेशाने जिल्ह्यातील नादुरूस्त विहिरी दुरूस्त होणे सोपे झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. शेतात विहिरी असून अतिवृष्टीने त्या खचल्या असून सिंचन करणे शेतकऱ्यांना अडचणीचे जात होते. आता त्यांना ते सोपे जाणार आहे. याबाबत भाजपचे जिल्हा महासचिव नेते मिलिंद भेंडे यांनी आंदोलन केले होते.(प्रतिनिधी)