शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

न्यायपालिकेवर विश्वासाकरिता त्वरित न्याय मिळावा

By admin | Updated: April 4, 2017 01:18 IST

लोकशाहीच्या तीन स्तंभापैकी न्यायपालिका हा महत्त्वाचा स्तंभ आहे. जनतेचा न्यायपालिकेवर विश्वास निर्माण करण्यासाठी शीघ्र व त्वरित न्याय मिळणे गरजेचे आहे.

वासंती नाईक : जिल्हा सत्र न्यायालयाचे उद्घाटन हिंगणघाट : लोकशाहीच्या तीन स्तंभापैकी न्यायपालिका हा महत्त्वाचा स्तंभ आहे. जनतेचा न्यायपालिकेवर विश्वास निर्माण करण्यासाठी शीघ्र व त्वरित न्याय मिळणे गरजेचे आहे. व तोच उद्देश ठेऊन आज हिंगणघाट सारख्या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालयाचे उदघाटन होत आहे, यामुळे न्याय इच्छुक जनतेचे समाधान होईल, असे मत मुबंई उंचच न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती व वर्धा जिल्ह्याच्या पालक न्यायाधीश वासंती नाईक यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. येथे नव्याने निर्मित जिल्हा सत्र न्यायालय व वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. न्यायाधीश नाईक यांनी आज येथे निर्माण होत असलेले न्यायालय हे न्याय लोकांच्या द्वारी या कायद्याच्या संकल्पनेला योग्य न्याय देईल व त्यासाठी येथील वकिलवर्ग अधिक जबाबदारीने वागतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश संध्या रायकर होत्या.हिंगणघाटला मिळाले जिल्हा न्यायालय हिंगणघाट : येथील दिवाणी न्यायालयाच्या परिसरात सकाळी ८ वाजता या नवीन न्यायालयाचा उदघाटन सोहळा पार पडला. अनेक वर्षांपासून संघर्ष करीत असलेल्या हिंगणघाटकरांना कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळाला. व्यासपीठावर हिंगणघाट बार रुमचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक काकडे, नवनियुक्त जिल्हा दिवाणी न्यायाधीश संजय खोंगल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अतिथीच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. प्रास्ताविक अ‍ॅड. काकडे यांनी केले. संचालन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर राजूरकर यांनी केले. येथे हे न्यायालय व्हावे यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणारे आमदार समीर कुणावार याचे स्वागत ज्येष्ठ अ‍ॅड. आर. एल. सुटे यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा दिवाणी न्यायाधीश संजय खोंगल यांनी मानले.कार्यक्रमाला दिवाणी न्यायाधीश अमोल सुर्वे, अनिरुद्ध चांदेकर, नेरकर, गराड, माजी आमदार राजू तिमांडे, ज्येष्ठ सहकार नेते अ‍ॅड. सुधीर कोठारी, ज्येष्ठ वकील चंद्रकांत देशपांडे, मुरलीमनोहर व्यास, जयस्वाल, डब्ल्यू. डी. जवादे यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.कार्यक्रमाला अ‍ॅड. हेमंत बोंडे, आर. एल. सुटे, रवी मद्यलवार, अक्षय वाशीमकर, स्वप्नील धारकर, देवगिरकर, गजुभाऊ हिंगमीरे, रमेश थुल, प्रिया शेंडे, प्रतिभा बोरीकर, अर्शी अहमद, विनोद राजपुरीया, एस. डी. मून, बंडूभाऊ ढेकरे आदींनी सहकार्य केले. उदघाटन कार्यक्रमानंतर निसर्गवेध मित्र मंडळाच्यावतीने न्यायमूर्ती वासंती नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अ‍ॅड. सागर हेमके यांनी हे वृक्ष उपलब्ध करून दिले.(तालुका प्रतिनिधी)