शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

सर्पदंशाने मृत्यू होणाऱ्या कुटुंबीयांना मदत मिळावी

By admin | Updated: November 28, 2015 03:04 IST

वाघ व तत्सम प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना शासनाच्यावतीने मदत मिळते.

वर्धा : वाघ व तत्सम प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना शासनाच्यावतीने मदत मिळते. त्याच प्रमाणे सर्पदंशाने मृत्यू झालेल्यांच्या अप्तांना शासनाची मदत मिळावी, अशी मागणी विदर्भ सर्प मित्र मंडळाचे संस्थापक सर्प अभ्यासक गजेंद्र सुरकार यांच्यासह सदस्यांनी खा. रामदास तडस यांना निवेदनातून केली. शिवाय या विषयावर चर्चाही करण्यात आली. संपूर्ण भारतात विविध राज्यात एक वन्य जीव असलेल्या व इतर वन्यजीवाप्रमाणे वन्यजीव संरक्षण सूचित अनुसूची १ व अनुसूची २ मध्ये असलेल्या विषारी साप या वन्य जीवाच्या दंशाने अनेकांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक शेतकरी, शेतमजूर, रस्त्याच्या, बांध वस्तीच्या, जंगलतोड करणारे मजूर वन विभागात रोजंदारी करणाऱ्या मजुरांचा समावेश आहे. मात्र त्यांच्या वारसांना किंवा कुटुंबांना वनखाते विभागाकडून, सरकारकडून, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री सहायता कोषमधून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही. वन्यजीव संरक्षण सूचित अनुसूची एक व अनुसूची २ मध्ये असलेल्या अस्वल, वाघ, सिंह, बिबट, हत्ती व तत्सम प्राण्याच्या हल्ल्यात जायबंदी वा मृत्यू झाल्यास ताबडतोब आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्रात तर आठ लाख रुपये दिले जाते. परंतु विषारी सर्पदंशाने मृत्यू झाल्यास आर्थिक मदत दिली जात नाही. माणूस जंगलात शिरतो किंवा जंगलाशेजारी राहतो. त्या परिस्थितीत वन्यप्राणी हल्ला करतात. विषारी साप शेतात कामाच्या जागी, घरात दंश करतात. साप व इतर प्राणी एकाच अनुसूचीमध्ये असूनसुध्दा हा भेदभाव केला जातो. त्याबद्दल केंद्र शासनाने पुढाकार घेऊन निर्णय घ्यावा तसेच राज्य सरकारला निर्देश द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.लोकसभेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात शून्य प्रहरात हा प्रश्न लावून धरून वनमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन खा. तडस यांनी दिले. यावेळी मंगेश शेंडे, मयूर राऊत, नरेंद्र कांबळे, सुनील ढाले, प्रकाश कांबळे उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दादाराव केचे उपस्थित होते.(प्रतिनिधी)