शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

रेशीम शेतीसाठी केंद्राकडून निधी मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:51 IST

राज्यात मोठ्या प्रमाणावर रेशीम लागवड करण्यात येते. तुती लागवड करण्यासाठी ५ एकराच्या मर्यादेत प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राच्या अनुदान वाटपासाठी ५ कोटी रूपये मिळाले एकूण ३३ कोटी रूपयाची गरज अनुदान वाटपासाठी आहे. त्यामुळे ३३ कोटी रूपये केंद्र सरकारकडून पाठपुरावा करून राज्य सरकारने मिळविणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देअर्थमंत्र्यांना साकडे : प्रशांत इंगळे तिगावकर यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात मोठ्या प्रमाणावर रेशीम लागवड करण्यात येते. तुती लागवड करण्यासाठी ५ एकराच्या मर्यादेत प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राच्या अनुदान वाटपासाठी ५ कोटी रूपये मिळाले एकूण ३३ कोटी रूपयाची गरज अनुदान वाटपासाठी आहे. त्यामुळे ३३ कोटी रूपये केंद्र सरकारकडून पाठपुरावा करून राज्य सरकारने मिळविणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्यांची फसवणूक होईल व तुती उत्पादक शेतकरी नाउमेद होईल. याचा परिणाम रेशीम शेतीवरही होईल असे कृषी मुल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांनी म्हटले आहे.याबाबत त्यांनी राज्याचे अर्थ नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, वस्त्रोद्योग व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे.पारंपारिक पिकांऐवजी पूरक व्यवसाय म्हणून राज्यातील असंख्य शेतकरी रेशीम शेतीकडे वळाले आहेत. जे शेतकरी मनरेगाच्या निकर्षात बसत नाहीत अशांसाठी केंद्र सरकारने सिल्क समग्र योजना आखली. यातून पाच एकरापर्यंत लागवडीसाठी अनुदान मिळेल असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले.यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दोन ते पाच एकरांपर्यंत तुती लागवड केली. शिवाय इतर खर्चसुध्दा केला.अनुदान मिळावे यासाठी प्रस्ताव तयार केले. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या शेतकऱ्यांची पायपीट सुरू आहे. लागवडीपूर्वी झालेल्या बैठकांमध्ये शेतकऱ्यांना तुती लागवडीचे एकरी ३७,५०० रूपये अनुदान मिळेल असे सांगण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांनी एक ते पाच एकरांपर्यंत लागवड केली. मात्र आता अनुदान मिळण्याची वेळ आली तेव्हा एकरापर्यंत अनुदान मिळेल, असे धोरण स्वीकारण्यात आल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून ३३ कोटीचे अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणीे प्रशांत इंगळे तिगावकर यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.