शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

रेशीम शेतीसाठी केंद्राकडून निधी मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:51 IST

राज्यात मोठ्या प्रमाणावर रेशीम लागवड करण्यात येते. तुती लागवड करण्यासाठी ५ एकराच्या मर्यादेत प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राच्या अनुदान वाटपासाठी ५ कोटी रूपये मिळाले एकूण ३३ कोटी रूपयाची गरज अनुदान वाटपासाठी आहे. त्यामुळे ३३ कोटी रूपये केंद्र सरकारकडून पाठपुरावा करून राज्य सरकारने मिळविणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देअर्थमंत्र्यांना साकडे : प्रशांत इंगळे तिगावकर यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात मोठ्या प्रमाणावर रेशीम लागवड करण्यात येते. तुती लागवड करण्यासाठी ५ एकराच्या मर्यादेत प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राच्या अनुदान वाटपासाठी ५ कोटी रूपये मिळाले एकूण ३३ कोटी रूपयाची गरज अनुदान वाटपासाठी आहे. त्यामुळे ३३ कोटी रूपये केंद्र सरकारकडून पाठपुरावा करून राज्य सरकारने मिळविणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्यांची फसवणूक होईल व तुती उत्पादक शेतकरी नाउमेद होईल. याचा परिणाम रेशीम शेतीवरही होईल असे कृषी मुल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांनी म्हटले आहे.याबाबत त्यांनी राज्याचे अर्थ नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, वस्त्रोद्योग व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे.पारंपारिक पिकांऐवजी पूरक व्यवसाय म्हणून राज्यातील असंख्य शेतकरी रेशीम शेतीकडे वळाले आहेत. जे शेतकरी मनरेगाच्या निकर्षात बसत नाहीत अशांसाठी केंद्र सरकारने सिल्क समग्र योजना आखली. यातून पाच एकरापर्यंत लागवडीसाठी अनुदान मिळेल असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले.यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दोन ते पाच एकरांपर्यंत तुती लागवड केली. शिवाय इतर खर्चसुध्दा केला.अनुदान मिळावे यासाठी प्रस्ताव तयार केले. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या शेतकऱ्यांची पायपीट सुरू आहे. लागवडीपूर्वी झालेल्या बैठकांमध्ये शेतकऱ्यांना तुती लागवडीचे एकरी ३७,५०० रूपये अनुदान मिळेल असे सांगण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांनी एक ते पाच एकरांपर्यंत लागवड केली. मात्र आता अनुदान मिळण्याची वेळ आली तेव्हा एकरापर्यंत अनुदान मिळेल, असे धोरण स्वीकारण्यात आल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून ३३ कोटीचे अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणीे प्रशांत इंगळे तिगावकर यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.