शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

‘स्कील इंडिया’तून रोजगारक्षम व्हा!

By admin | Updated: November 21, 2015 02:35 IST

स्कील इंडिया योजनेच्या माध्यमातून बारावीनंतर शिक्षण सोडलेल्या युवकांनी कौशल्य प्रशिक्षण घेवून आपला व्यवसाय सुरू करा.

मुकेश माकेजानी : जनजागृती कार्यक्रमांतर्गत विविध योजनांची माहितीवर्धा : स्कील इंडिया योजनेच्या माध्यमातून बारावीनंतर शिक्षण सोडलेल्या युवकांनी कौशल्य प्रशिक्षण घेवून आपला व्यवसाय सुरू करा. या प्रशिक्षणाच्या जोरावर बेरोजगारीवर मात करा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक मुकेश माकेजानी यांनी केले.भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रसिद्धी संचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा प्रशासन व जिल्हा अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा तालुक्यातील तिगाव येथे आयोजित केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या जनजागरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक महेश डोईजर, जिल्हा अग्रणी बँकेचे अशोक गवई, वायफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साबळे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी संजय तिवारी, सरपंच शीतल मसराम, उपसरपंच साधू रपाते आदी उपस्थित होते.माकेजानी म्हणाले, युवकांच्या कौशल्य विकासासाठी नव्याने उद्योग व कौशल्य विकास मंत्रालयाची निर्मिती केली आहे. या माध्यमातून नॅशनल स्कील मिशन आणि नॅशनल स्कील डेव्हलपमेंट पॉलिसी तयार करण्यात आली आहे. या अंतर्गत शैक्षणिक पात्रतेच्या आधारे युवकांचा विकास केला जाणार असल्याचेही माकेजानी यांनी सांगितले. प्रारंभी क्षेत्रीय प्रचार अधिकारी सतीश घोडके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. केंद्र शासनाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयामार्फत राज्यामध्ये विविध ठिकाणी केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी कार्यक्रम घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. साबळे यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ विषयी मार्गदर्शन केले. मुलींच्या फक्त जन्माचेच स्वागत न करता ती पुढे चांगली शिकली पाहिजे असे ते म्हणाले. स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक महेश डोईजर यांनी स्वच्छता व वैयक्तिक शौचालयाचे महत्व सांगून गावात ज्या कुटुंबाचे बेस लाईन सर्व्हेमध्ये नाव आहे, अशा कुटुंबांना त्यांनी शौचालय बांधल्यानंतर अनुदान मिळेल असे सांगितले. या निमित्ताने तिगाव गावामध्ये ग्रामस्थ, युवक महिला व मुलांची प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचार फेरीमध्ये सुमारे १५० जणांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत यावर घोषणा दिल्या. संत गाडगेबाबा सांस्कृतिक कला मंचने यावेळी पथनाट्यातून स्वच्छ भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ यावर जनजागृती केली.ग्रामस्थांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येऊन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सुरेश दुधे यांनी केले. क्षेत्रीय प्रचार अधिकारी संजय तिवारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा लाभ गावातील सुमारे ४०० ग्रामस्थांनी घेतला. यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रभारी अधिकारी सुनिता लोखंडे, मनोज राऊत, अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्य सेवक, ग्रामसेवक व्ही.एन. फुलझेले, जि.प. उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक आदींना यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.(शहर प्रतिनिधी)