शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

‘स्कील इंडिया’तून रोजगारक्षम व्हा!

By admin | Updated: November 21, 2015 02:35 IST

स्कील इंडिया योजनेच्या माध्यमातून बारावीनंतर शिक्षण सोडलेल्या युवकांनी कौशल्य प्रशिक्षण घेवून आपला व्यवसाय सुरू करा.

मुकेश माकेजानी : जनजागृती कार्यक्रमांतर्गत विविध योजनांची माहितीवर्धा : स्कील इंडिया योजनेच्या माध्यमातून बारावीनंतर शिक्षण सोडलेल्या युवकांनी कौशल्य प्रशिक्षण घेवून आपला व्यवसाय सुरू करा. या प्रशिक्षणाच्या जोरावर बेरोजगारीवर मात करा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक मुकेश माकेजानी यांनी केले.भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रसिद्धी संचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा प्रशासन व जिल्हा अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा तालुक्यातील तिगाव येथे आयोजित केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या जनजागरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक महेश डोईजर, जिल्हा अग्रणी बँकेचे अशोक गवई, वायफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साबळे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी संजय तिवारी, सरपंच शीतल मसराम, उपसरपंच साधू रपाते आदी उपस्थित होते.माकेजानी म्हणाले, युवकांच्या कौशल्य विकासासाठी नव्याने उद्योग व कौशल्य विकास मंत्रालयाची निर्मिती केली आहे. या माध्यमातून नॅशनल स्कील मिशन आणि नॅशनल स्कील डेव्हलपमेंट पॉलिसी तयार करण्यात आली आहे. या अंतर्गत शैक्षणिक पात्रतेच्या आधारे युवकांचा विकास केला जाणार असल्याचेही माकेजानी यांनी सांगितले. प्रारंभी क्षेत्रीय प्रचार अधिकारी सतीश घोडके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. केंद्र शासनाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयामार्फत राज्यामध्ये विविध ठिकाणी केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी कार्यक्रम घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. साबळे यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ विषयी मार्गदर्शन केले. मुलींच्या फक्त जन्माचेच स्वागत न करता ती पुढे चांगली शिकली पाहिजे असे ते म्हणाले. स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक महेश डोईजर यांनी स्वच्छता व वैयक्तिक शौचालयाचे महत्व सांगून गावात ज्या कुटुंबाचे बेस लाईन सर्व्हेमध्ये नाव आहे, अशा कुटुंबांना त्यांनी शौचालय बांधल्यानंतर अनुदान मिळेल असे सांगितले. या निमित्ताने तिगाव गावामध्ये ग्रामस्थ, युवक महिला व मुलांची प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचार फेरीमध्ये सुमारे १५० जणांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत यावर घोषणा दिल्या. संत गाडगेबाबा सांस्कृतिक कला मंचने यावेळी पथनाट्यातून स्वच्छ भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ यावर जनजागृती केली.ग्रामस्थांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येऊन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सुरेश दुधे यांनी केले. क्षेत्रीय प्रचार अधिकारी संजय तिवारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा लाभ गावातील सुमारे ४०० ग्रामस्थांनी घेतला. यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रभारी अधिकारी सुनिता लोखंडे, मनोज राऊत, अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्य सेवक, ग्रामसेवक व्ही.एन. फुलझेले, जि.प. उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक आदींना यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.(शहर प्रतिनिधी)