शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

मृत्यूस जबाबदार इसमाला अटक करा

By admin | Updated: December 14, 2015 02:02 IST

देवळी तालुक्यातील चिंचाळा येथील शेतकरी कवडू महेशगौरी यांचा २ नोव्हेंबर रोजी वीज प्रवाहित शेताच्या कुंपणाचा धक्का लागल्याने मृत्यू झाला.

विजेच्या धक्क्याने मृत्यू प्रकरण : पोलीस अधीक्षकांना निवेदनातून साकडेवर्धा : देवळी तालुक्यातील चिंचाळा येथील शेतकरी कवडू महेशगौरी यांचा २ नोव्हेंबर रोजी वीज प्रवाहित शेताच्या कुंपणाचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. या प्रकरणात तक्रार करूनही कारवाई करण्यात आली नाही. पोलीस अधीक्षकांनी चौकशी करीत रामदास शिवरकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मृतकाचा मुलगा कुणाल याने निवेदनातून केली आहे.चिंचाळा येथील महेशगौरी व शिवरकर यांचे शेत लागून आहे. २ नोव्हेंबर रोजी कवडू महेशगौरी हे सकाळी शेतात ओलितासाठी गेले होते. धुऱ्यावर शौचास गेले असता कवडू यांना तारेचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शिवरकर यांनी शेताला तारेचे कुंपण करून वीज प्रवाहित केली होती. याबाबत देवळी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला; पण शिवरकर यास अटक केली नाही. आई-वडील दोघांचाही मृत्यू झाल्याने कुणाल व कुटुंब निराधार झाले आहे. यातील शिवरकर हे धमकावणी करीत असल्याचेही कुणाल याने निवेदनात नमूद केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी अधीक्षकांना निवेदनातून केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)