शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सोयाबीनऐवजी शेतात फोफावलेय गाजरगवत

By admin | Updated: October 21, 2014 22:57 IST

यंदा सुरुवातीला उशिरा आलेला आणि त्यानंतर दडी मारून बसलेल्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे सोयाबीनची लागवड करायला विलंब झाला. अनेक शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली.

वर्धा : यंदा सुरुवातीला उशिरा आलेला आणि त्यानंतर दडी मारून बसलेल्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे सोयाबीनची लागवड करायला विलंब झाला. अनेक शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. अखेरपर्यंत पावसाने साथ न दिल्यामुळे शेतात बेसुमार गाजरगवत वाढले असून, पिकांची वाढ खुंटली आहे. परिणामी, पीक सवंगणेही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारे ठरत आहे.पवनार येथील शेतकरी गंगाधर पाहुणे यांच्याकडे पाच एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी आपल्या पाच एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली. यानंतर त्यांनी सोयाबीनच्या पिकावर दोन वेळा तणनाशकाची फवारणी केली; पण पिकांची वाढ न होता गाजरगवतच वाढत गेले. पावसाने दगा दिल्याने पिकांची वाढ खुंटली. सोयाबीनच्या झाडांची वाढच झाली नाही. त्यांना या पाच एकर शेतात लागवडीकरिता जवळपास ५० हजार रुपयांचा खर्च आला. सध्या पीक सवंगणीला आले असताना एकरी एक पोते सोयाबीनचा उतारा मिळेल, अशी शक्यता आहे. सोयाबीनच्या एक एकरातील सवंगणीकरिता सुमारे दीड हजार रुपयांची मजुरी द्यावी लागणार आहे़ मशीनद्वारे सोयाबीन काढण्याकरिता एकरामागे ३०० रुपये खर्च आहे़ हे सोयाबीन बाजारात नेण्याकरिताही वेगळ खर्च करावा लागणार आहे़ शिवाय तन काढण्याचा खर्चही करावा लागत आहे़ सध्या सोयाबीनला असलेला भाव पाहता हा खर्च न परवडणारा आहे़ यामुळभे शेतकरी शेतात गुरे चारत आहेत़ परिसरातील शेतकरी सुभाष भट, योगेश डगवार, रामेश्वर येरुणकर, गोविंद पाटील, गणपत हिंगे, अनिल आंबटकर, महादेव सहारे, श्रीधर भुजाडे, वसंत पाहुणे, सतीश अवचट अशा अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यांच्यावरही सोयाबीनची सवंगणी न करता गुरांना चराईकरिता शेत उपलब्ध करून देण्याची वेळ आली आहे. शासनाने या परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)