शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

सोयाबीनऐवजी शेतात फोफावलेय गाजरगवत

By admin | Updated: October 21, 2014 22:57 IST

यंदा सुरुवातीला उशिरा आलेला आणि त्यानंतर दडी मारून बसलेल्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे सोयाबीनची लागवड करायला विलंब झाला. अनेक शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली.

वर्धा : यंदा सुरुवातीला उशिरा आलेला आणि त्यानंतर दडी मारून बसलेल्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे सोयाबीनची लागवड करायला विलंब झाला. अनेक शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. अखेरपर्यंत पावसाने साथ न दिल्यामुळे शेतात बेसुमार गाजरगवत वाढले असून, पिकांची वाढ खुंटली आहे. परिणामी, पीक सवंगणेही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारे ठरत आहे.पवनार येथील शेतकरी गंगाधर पाहुणे यांच्याकडे पाच एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी आपल्या पाच एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली. यानंतर त्यांनी सोयाबीनच्या पिकावर दोन वेळा तणनाशकाची फवारणी केली; पण पिकांची वाढ न होता गाजरगवतच वाढत गेले. पावसाने दगा दिल्याने पिकांची वाढ खुंटली. सोयाबीनच्या झाडांची वाढच झाली नाही. त्यांना या पाच एकर शेतात लागवडीकरिता जवळपास ५० हजार रुपयांचा खर्च आला. सध्या पीक सवंगणीला आले असताना एकरी एक पोते सोयाबीनचा उतारा मिळेल, अशी शक्यता आहे. सोयाबीनच्या एक एकरातील सवंगणीकरिता सुमारे दीड हजार रुपयांची मजुरी द्यावी लागणार आहे़ मशीनद्वारे सोयाबीन काढण्याकरिता एकरामागे ३०० रुपये खर्च आहे़ हे सोयाबीन बाजारात नेण्याकरिताही वेगळ खर्च करावा लागणार आहे़ शिवाय तन काढण्याचा खर्चही करावा लागत आहे़ सध्या सोयाबीनला असलेला भाव पाहता हा खर्च न परवडणारा आहे़ यामुळभे शेतकरी शेतात गुरे चारत आहेत़ परिसरातील शेतकरी सुभाष भट, योगेश डगवार, रामेश्वर येरुणकर, गोविंद पाटील, गणपत हिंगे, अनिल आंबटकर, महादेव सहारे, श्रीधर भुजाडे, वसंत पाहुणे, सतीश अवचट अशा अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यांच्यावरही सोयाबीनची सवंगणी न करता गुरांना चराईकरिता शेत उपलब्ध करून देण्याची वेळ आली आहे. शासनाने या परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)