शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

सोयाबीनऐवजी शेतात फोफावलेय गाजरगवत

By admin | Updated: October 21, 2014 22:57 IST

यंदा सुरुवातीला उशिरा आलेला आणि त्यानंतर दडी मारून बसलेल्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे सोयाबीनची लागवड करायला विलंब झाला. अनेक शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली.

वर्धा : यंदा सुरुवातीला उशिरा आलेला आणि त्यानंतर दडी मारून बसलेल्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे सोयाबीनची लागवड करायला विलंब झाला. अनेक शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. अखेरपर्यंत पावसाने साथ न दिल्यामुळे शेतात बेसुमार गाजरगवत वाढले असून, पिकांची वाढ खुंटली आहे. परिणामी, पीक सवंगणेही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारे ठरत आहे.पवनार येथील शेतकरी गंगाधर पाहुणे यांच्याकडे पाच एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी आपल्या पाच एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली. यानंतर त्यांनी सोयाबीनच्या पिकावर दोन वेळा तणनाशकाची फवारणी केली; पण पिकांची वाढ न होता गाजरगवतच वाढत गेले. पावसाने दगा दिल्याने पिकांची वाढ खुंटली. सोयाबीनच्या झाडांची वाढच झाली नाही. त्यांना या पाच एकर शेतात लागवडीकरिता जवळपास ५० हजार रुपयांचा खर्च आला. सध्या पीक सवंगणीला आले असताना एकरी एक पोते सोयाबीनचा उतारा मिळेल, अशी शक्यता आहे. सोयाबीनच्या एक एकरातील सवंगणीकरिता सुमारे दीड हजार रुपयांची मजुरी द्यावी लागणार आहे़ मशीनद्वारे सोयाबीन काढण्याकरिता एकरामागे ३०० रुपये खर्च आहे़ हे सोयाबीन बाजारात नेण्याकरिताही वेगळ खर्च करावा लागणार आहे़ शिवाय तन काढण्याचा खर्चही करावा लागत आहे़ सध्या सोयाबीनला असलेला भाव पाहता हा खर्च न परवडणारा आहे़ यामुळभे शेतकरी शेतात गुरे चारत आहेत़ परिसरातील शेतकरी सुभाष भट, योगेश डगवार, रामेश्वर येरुणकर, गोविंद पाटील, गणपत हिंगे, अनिल आंबटकर, महादेव सहारे, श्रीधर भुजाडे, वसंत पाहुणे, सतीश अवचट अशा अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यांच्यावरही सोयाबीनची सवंगणी न करता गुरांना चराईकरिता शेत उपलब्ध करून देण्याची वेळ आली आहे. शासनाने या परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)