शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनऐवजी शेतात फोफावलेय गाजरगवत

By admin | Updated: October 21, 2014 22:57 IST

यंदा सुरुवातीला उशिरा आलेला आणि त्यानंतर दडी मारून बसलेल्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे सोयाबीनची लागवड करायला विलंब झाला. अनेक शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली.

वर्धा : यंदा सुरुवातीला उशिरा आलेला आणि त्यानंतर दडी मारून बसलेल्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे सोयाबीनची लागवड करायला विलंब झाला. अनेक शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. अखेरपर्यंत पावसाने साथ न दिल्यामुळे शेतात बेसुमार गाजरगवत वाढले असून, पिकांची वाढ खुंटली आहे. परिणामी, पीक सवंगणेही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारे ठरत आहे.पवनार येथील शेतकरी गंगाधर पाहुणे यांच्याकडे पाच एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी आपल्या पाच एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली. यानंतर त्यांनी सोयाबीनच्या पिकावर दोन वेळा तणनाशकाची फवारणी केली; पण पिकांची वाढ न होता गाजरगवतच वाढत गेले. पावसाने दगा दिल्याने पिकांची वाढ खुंटली. सोयाबीनच्या झाडांची वाढच झाली नाही. त्यांना या पाच एकर शेतात लागवडीकरिता जवळपास ५० हजार रुपयांचा खर्च आला. सध्या पीक सवंगणीला आले असताना एकरी एक पोते सोयाबीनचा उतारा मिळेल, अशी शक्यता आहे. सोयाबीनच्या एक एकरातील सवंगणीकरिता सुमारे दीड हजार रुपयांची मजुरी द्यावी लागणार आहे़ मशीनद्वारे सोयाबीन काढण्याकरिता एकरामागे ३०० रुपये खर्च आहे़ हे सोयाबीन बाजारात नेण्याकरिताही वेगळ खर्च करावा लागणार आहे़ शिवाय तन काढण्याचा खर्चही करावा लागत आहे़ सध्या सोयाबीनला असलेला भाव पाहता हा खर्च न परवडणारा आहे़ यामुळभे शेतकरी शेतात गुरे चारत आहेत़ परिसरातील शेतकरी सुभाष भट, योगेश डगवार, रामेश्वर येरुणकर, गोविंद पाटील, गणपत हिंगे, अनिल आंबटकर, महादेव सहारे, श्रीधर भुजाडे, वसंत पाहुणे, सतीश अवचट अशा अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यांच्यावरही सोयाबीनची सवंगणी न करता गुरांना चराईकरिता शेत उपलब्ध करून देण्याची वेळ आली आहे. शासनाने या परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)