शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.ना हायटेक होण्याची वाट

By admin | Updated: July 7, 2015 01:41 IST

केंद्रातील मोदी सरकार सध्या गाजावाजा करीत डिजिटल इंडिया सप्ताह साजरा करीत आहे.

ब्रॉड बँडचे भिजत घोंगडे : वर्ष लोटूनही कामे अद्याप खोळंबलेलीचखरांगणा(मो.) : केंद्रातील मोदी सरकार सध्या गाजावाजा करीत डिजिटल इंडिया सप्ताह साजरा करीत आहे. परंतु देशाचे आधारस्तंभ असलेली गावे आणि तेथील ग्रामपंचायती मात्र हायटेक करण्याकरिता आप्टीकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉड बँड इंटरनेट कनेक्टीव्हिीटीने जोडण्याचे काम वर्षाचा कालावधी लोटूनही पूर्णत्वास गेलेले नाही. जिह्यातही हेच चित्र निदर्शनास येते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गतिमान भारताचे स्वप्न साकारताना ग्रामीण जनताही त्यापासून वंचित राहु नये व शासनाचा कारभारही पारदर्शक व लोकाभिमुख व्हावा या उद्देशाने युपीएच्या काळातच केंद्र शासनाने डिजीटल इंडियाच्या कार्यक्रमाचा पाया रोवला व नॅशनल आप्टीकल फायबर नेटवर्कद्वारे भारतातील अडीच लाख ग्रामपंचायती इ-गव्हर्नन्स कनेक्टीव्हिटीने जोडण्याचा प्रकल्प हाती घेतला. भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमीटेड कंपनी स्थापन करून ही कंपनी राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करण्यात आली.केंद्र शासनाच्या या निर्णयाच्या तीन वर्षे आधीच महाराष्ट्र शासनाने राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती इ- संग्राम योजनेंतर्गत संगणीकृत करून इ- गव्हरनेस-इ-पंचायतसारखे कार्यक्रम राबविणे सुरू केले व इंटरनेटद्वारे ब्रॉड बँड ने जोडण्याचा प्रकल्प हाती घेतला. आप्टीकल फायबर्स केबल टाकण्याचे काम सुरू केले. जिल्ह्यातही ग्रामीण व शहरी भागात रस्त्यांच्या व राजमार्गाच्या बाजूला खड्डे व पाच फुट खोलीच्या लांब नाल्या खोदण्यात आल्या. दोन चार महिन्यानंतर त्यात केसींग पाईप टाकण्यात आले. दरम्यानच्या खोदून ठेवलेल्या नाल्यामुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी मार्ग उखडले. ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन तुटल्या. काही ठिकाणी आजही धोकादायक खड्डे अस्तित्वात आहेत. त्यावर सहा-सात महिने उलटले तरी फायबर केबल टाकण्यात आलेली नाही. सर्व कामे कासवगतीने सुरू आहेत.कोट्यावधीची तरतूद असूनही कंत्राटदाराकडून करून घेण्यात येणाऱ्या या कामाचे घोडे कुठे अडले हे कळावयास मार्ग नाही. ग्रामीण जनता मात्र ग्रामपंचायत डिजीटल तंत्रज्ञानाने हायटेक केव्हा होईल याची वाट पाहात आहे.(वार्ताहर)नाल्यांमुळे रस्त्यांचे नुकसानजिल्ह्यातही ग्रामीण व शहरी भागात रस्त्याच्या व राजमार्गाच्या बाजूला खड्डे व पाच फुट खोलीच्या लांब नाल्या खोदण्यात आल्या. दोन-चार महिन्यानंतर त्यात केसिंग पाईप टाकण्यात आले.दरम्यानच्या खोदून ठेवलेल्या नाल्यामुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी मार्ग उखडले. ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन तुटल्या. काही ठिकाणी आजही धोकादायक खड्डे अस्तित्वात आहेत. एवढा प्रकार घडूूनही अद्याप वायर टाकण्याचे काम पूर्णत्वास गेलेले नाही.