शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

ग्रा.पं.ना हायटेक होण्याची वाट

By admin | Updated: July 7, 2015 01:41 IST

केंद्रातील मोदी सरकार सध्या गाजावाजा करीत डिजिटल इंडिया सप्ताह साजरा करीत आहे.

ब्रॉड बँडचे भिजत घोंगडे : वर्ष लोटूनही कामे अद्याप खोळंबलेलीचखरांगणा(मो.) : केंद्रातील मोदी सरकार सध्या गाजावाजा करीत डिजिटल इंडिया सप्ताह साजरा करीत आहे. परंतु देशाचे आधारस्तंभ असलेली गावे आणि तेथील ग्रामपंचायती मात्र हायटेक करण्याकरिता आप्टीकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉड बँड इंटरनेट कनेक्टीव्हिीटीने जोडण्याचे काम वर्षाचा कालावधी लोटूनही पूर्णत्वास गेलेले नाही. जिह्यातही हेच चित्र निदर्शनास येते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गतिमान भारताचे स्वप्न साकारताना ग्रामीण जनताही त्यापासून वंचित राहु नये व शासनाचा कारभारही पारदर्शक व लोकाभिमुख व्हावा या उद्देशाने युपीएच्या काळातच केंद्र शासनाने डिजीटल इंडियाच्या कार्यक्रमाचा पाया रोवला व नॅशनल आप्टीकल फायबर नेटवर्कद्वारे भारतातील अडीच लाख ग्रामपंचायती इ-गव्हर्नन्स कनेक्टीव्हिटीने जोडण्याचा प्रकल्प हाती घेतला. भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमीटेड कंपनी स्थापन करून ही कंपनी राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करण्यात आली.केंद्र शासनाच्या या निर्णयाच्या तीन वर्षे आधीच महाराष्ट्र शासनाने राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती इ- संग्राम योजनेंतर्गत संगणीकृत करून इ- गव्हरनेस-इ-पंचायतसारखे कार्यक्रम राबविणे सुरू केले व इंटरनेटद्वारे ब्रॉड बँड ने जोडण्याचा प्रकल्प हाती घेतला. आप्टीकल फायबर्स केबल टाकण्याचे काम सुरू केले. जिल्ह्यातही ग्रामीण व शहरी भागात रस्त्यांच्या व राजमार्गाच्या बाजूला खड्डे व पाच फुट खोलीच्या लांब नाल्या खोदण्यात आल्या. दोन चार महिन्यानंतर त्यात केसींग पाईप टाकण्यात आले. दरम्यानच्या खोदून ठेवलेल्या नाल्यामुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी मार्ग उखडले. ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन तुटल्या. काही ठिकाणी आजही धोकादायक खड्डे अस्तित्वात आहेत. त्यावर सहा-सात महिने उलटले तरी फायबर केबल टाकण्यात आलेली नाही. सर्व कामे कासवगतीने सुरू आहेत.कोट्यावधीची तरतूद असूनही कंत्राटदाराकडून करून घेण्यात येणाऱ्या या कामाचे घोडे कुठे अडले हे कळावयास मार्ग नाही. ग्रामीण जनता मात्र ग्रामपंचायत डिजीटल तंत्रज्ञानाने हायटेक केव्हा होईल याची वाट पाहात आहे.(वार्ताहर)नाल्यांमुळे रस्त्यांचे नुकसानजिल्ह्यातही ग्रामीण व शहरी भागात रस्त्याच्या व राजमार्गाच्या बाजूला खड्डे व पाच फुट खोलीच्या लांब नाल्या खोदण्यात आल्या. दोन-चार महिन्यानंतर त्यात केसिंग पाईप टाकण्यात आले.दरम्यानच्या खोदून ठेवलेल्या नाल्यामुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी मार्ग उखडले. ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन तुटल्या. काही ठिकाणी आजही धोकादायक खड्डे अस्तित्वात आहेत. एवढा प्रकार घडूूनही अद्याप वायर टाकण्याचे काम पूर्णत्वास गेलेले नाही.