शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Ganesh Chaturthi 2018; आर्वी शहरात २७५ वर्षांपूर्वी निघाली जमिनीतून गणपतीची मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 11:23 IST

शहरातील गणपती वॉर्ड येथील स्व. शेठ बिसनदास राठी यांनी आपल्या घरासमोरील खाली जागेत २७५ वर्षांपूर्वी विहिरीचे खोदकाम सुरू केले होते. काही अंतरावरच गणपतीची हुबेहुब मूर्ती निघाली.

ठळक मुद्देविहिरीच्या खोदकामातून मिळाली मूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील गणपती वॉर्ड येथील स्व. शेठ बिसनदास राठी यांनी आपल्या घरासमोरील खाली जागेत २७५ वर्षांपूर्वी विहिरीचे खोदकाम सुरू केले होते. काही अंतरावरच गणपतीची हुबेहुब मूर्ती निघाली. यामुळे विहिरीचे बांधकाम बंद करून तेथे मंदिराचे बांधकाम करून मूर्तीची स्थापना करण्यात आली.तेव्हापासून आजपर्यंत तेथे दररोज सकाळ सायंकाळ, पूजा अर्चा केली जात आहे. अत्यंत जुने असलेले गणपती मंदिर आर्वी शहर व परिसरात प्रसिद्ध आहे. मंदिराचे द्वार भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून सकाळी ८ ते १२ व सायंकाळी ६ ते ९ या वेळेत उघडले जाते. याच वेळेत सर्व भाविक दर्शन घेऊन पूजा अर्चा करतात. या मंदिराची स्थापना सन १७७५ ते १८०० दरम्यान जवळपास ३०० वर्षांपूर्वी स्व. बिसनदास राठी यांच्याहस्ते करण्यात आली होती. दरवर्षी गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यासाठी गणपती मंदिरासमोर तथा मंदिराला दिव्यांची आरास केली जाते. वर्षांतून दोन वेळा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दरम्यान ५६ भोग कार्यक्रम घेऊन संपूर्ण आर्वी शहरातील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.बिसनदास राठी याच्यानंतर त्यांचे पुत्र गोपालदास राठी, त्यानंतर त्यांचे पुत्र विठ्ठलदास राठी आणि सध्यास्थितीत सुधीर आणि अशोक राठी या जागेचे मालक म्हणून देखरेख करीत आहे. या मंदिरात १७५० रोजी प्रथम पुजारी म्हणून किसन पंडीत रावत, त्यानंतर भानू महाराज उर्फ फुलचंद सटोळ, त्यानंतर सत्यनारायण पुरोहित तर सध्या सागर पुरोहित हे पुजारी म्हणून काम पाहत आहेत.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८