शहरं
Join us  
Trending Stories
1
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
2
इंडिया आघाडीत मानापमान नाट्य? बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार; कारण काय दिले?
3
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
4
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; हिंदाल्कोमध्ये तेजी, मारुतीचे शेअर्स घसरले
6
“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?
7
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?
8
मनसेची भाजपासोबत युती तुटली? अभिजित पानसेंनी स्पष्ट शब्दांत विचारले, आमदार म्हणून काय केले?
9
Sovereign Gold Bond Scheme: सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर, तरीही सॉवरेन गोल्ड बॉन्डची मागणी वाढली; कारण काय?
10
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
11
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
13
सावरकरांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रणदीपने सेल्युलर जेलला दिली भेट, म्हणाला - "त्यांची कहाणी म्हणजे.."
14
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
15
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
16
राखी सावंतवर रुग्णालयात हल्ला? Ex Husband रितेश सिंहचा दावा; सध्या ती कुठेय?
17
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
18
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
19
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
20
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक

गांधींच्या भूमीत 'शिक्षणाची वारी'.. मात्र, त्यांच्याच नावाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 10:51 AM

देशभरात महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी होत असताना वर्धा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात मात्र व्यासपीठावर गांधीजींचा फोटोचा विसर आयोजकांना पडल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देशेतकरी नेत्यांचा रोष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: देशभरात महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी होत असताना वर्धा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात मात्र व्यासपीठावर गांधीजींचा फोटोचा विसर आयोजकांना पडल्याचे दिसून आले.वर्धा जिल्ह्यात शालेय शिक्षणमंत्र्यांचा महत्वाकांक्षी असा 'शिक्षणाची वारी' उपक्रम राबवला जात आहे. परंतु, ज्या स्थळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ते स्थळ महात्मा गांधीच्या नावाने प्रसिद्ध आहे. गांधींजींचे महात्म्य सांगणारा जगातील सगळ्यात मोठा चरखा या परिसरात आहे. मात्र, कार्यक्रमात कोठेही गांधीजींचा फोटोही लावण्यात आला नव्हता. त्यामुळे गांधींच्याच भूमीत गांधीजींचा विसर पडलेला पहायला मिळाले.शासनाच्या वतीने १५० व्या गांधीजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ध्यातसुद्धा शिक्षणाची वारी नावाने शालेय शिक्षण मंत्र्यांचा महत्वाकांक्षी उपक्रम राबिवला जात आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले.मात्र, कार्यक्रम पत्रिकेवर उपक्रम स्थळाचा पत्ता लिहिताना 'हुतात्मा स्मारकासमोरील मैदान' असा उल्लेख करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर कार्यक्रम स्थळी किंवा दिपप्रज्वलन स्थळी गांधीजींचा फोटोही लावण्यात आला नव्हता.या प्रकारामुळे आयोजकांवर टीका होत आहे. सोशल मिडियावरही याबाबत चर्चा रंगली आहे.शिक्षणाच्या वारीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. आज अनेक शाळांना शासनाच्या मदतीची गरज आहे. मात्र, शासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. ही बाब मनाला खटकणारी आहे, असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी यावेळी व्यक्त केले.गांधीजींच्या विचारांनी प्रभावित सेवाग्राम आश्रम परिसरात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्य स्तरीय शिक्षण प्रदर्शन 3/4/5/6 जानेवारी 2019 ला आयोजित केले आहे. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या परिसरात व व्यासपीठावर राज्यातील मंत्री, मुख्यमंत्री व अन्य भाजप नेत्यांची मोठमोठी फोटो बैनर/फ्लैक्स दिसत आहे. पण गांधीजींचा एक तरी फोटो किमान मंचावर, गेटवर, परिसरात लावण्याचे सौजन्य या लोकांना दाखवता आलेलं नाही हे विशेष आहे.गांधीजींची १५० वी जयंतीचा कार्यक्रम करत असलेल्या शासन- प्रशासनाला महात्मा गांधीजींच्या जागेवर गांधीजींचाच विसर पडला , यावरून या भाजपा प्रणित लोकांच्या ओठात एक आणि पोटात एक हे सहज लक्षात येते.अविनाश काकडे,शेतकरी नेते

 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी