शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

गांधीजींची विचारसरणी आजही प्रासंगिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 05:00 IST

महात्मा गांधी यांची १५१ व्या जयंती निमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या गालिब सभागृहात 'विश्व सभ्यतेसाठी महात्मा गांधी यांची प्रासंगिकता' या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी केदार यांच्या हस्ते एकविसाव्या शतकातील आचार्य विनोबा भावेंची प्रासंगिकता या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

ठळक मुद्देसुनील केदार : सात देशांतील विचारवंतांनी मांडले विचार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधींचे विचार २१ व्या शतकातही प्रासंगिक आहे. गांधीजींच्या विचारातील साधेपणा, मानवता आणि अहिंसा संपूर्ण जगापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करण्याची गरज आहे. गांधी हा एक विचार आहे आणि केवळ गांधीजींच्या विचारांनीच मानवी आयुष्यात आणि समाजात बदल घडवून येऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.महात्मा गांधी यांची १५१ व्या जयंती निमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या गालिब सभागृहात 'विश्व सभ्यतेसाठी महात्मा गांधी यांची प्रासंगिकता' या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी केदार यांच्या हस्ते एकविसाव्या शतकातील आचार्य विनोबा भावेंची प्रासंगिकता या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ल होते. अतिथी म्हणून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, प्र.कुलगुरू प्रा. चंद्र्रकांत रागीट, प्रा.हनुमान प्रसाद शुक्ल, जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री उपस्थित होते. लंडन, दक्षिण आफ्रिका, उझबेकिस्तान, मॉरिशस, नेपाळ आणि लिथुआनियासारख्या देशांच्या अभ्यासकांनी वेबिनारमध्ये विचार मांडले.इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्लीचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी बीजभाषण देताना १५० वर्षांनंतरही संपूर्ण जग गांधींच्या विचारांनी प्रेरित असल्याचे सांगितले. गांधीजी त्यांचे काम आणि विचारांनी अजूनही प्रासंगिक आहेत. गांधी विचारच सध्याच्या आव्हानांना सकारात्मक आणि समाधानकारक असल्याचे ते म्हणाले.या कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून लंडनचे गांधीवादी विचारवंत, पद्मभूषण प्रा. भिखू पारेख यांनी जागतिक सभ्यतेसाठी गांधीजींच्या मूल्यांचे अनुसरण करण्याची आजच्या समाजाची गरज असल्याचे सांगितले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांनी वर्धा येथे गांधीजींच्या १४ वर्षांच्या कार्यकाळावर आधारित भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेच्या सहकार्याने प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.कुलगुरू प्रा. शुक्ल यांनी पालकमंत्री सुनील केदार यांना विद्यापीठाने प्रकाशित केलेली पुस्तके भेट दिलीत.गांधी पीस फाउंडेशन, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉ. पी व्ही. राजगोपाल म्हणाले की, तरुणांमध्ये अहिंसेची, गांधींची विचारसरणी रुजविण्याच्या दिशेने कार्य करण्याची गरज आहे. शैक्षणिक संस्थांना गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वांचा उपयोग प्रत्येक कामात कसा करायचा याचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.या कार्यक्रमाचे संचालन मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातील असोसिएट प्रोफेसर डॉ नमिता निंबाळकर आणि दूरस्थ शिक्षण संचालनालयाचे सहाय्यक प्रा. डॉ शंभू जोशी यांनी केले. आभार विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. चंद्रकांत रागीट यांनी केले. कार्यक्रमाचे सहसंयोजन डायस्पोरा विभागाचे सहायक प्रा. डॉ मुन्नालाल गुप्ता व तत्वज्ञान व संस्कृतीचे विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. सूर्यप्रकाश पांडे यांनी केले. कार्यक्रमात देश-विदेशातील विद्वान, शिक्षक आणि संशोधकांनी आॅनलाइन सहभाग घेतला.व महात्मा गांधीवर विचार मांडले.

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदारMahatma Gandhiमहात्मा गांधी