शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींची विचारसरणी आजही प्रासंगिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 05:00 IST

महात्मा गांधी यांची १५१ व्या जयंती निमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या गालिब सभागृहात 'विश्व सभ्यतेसाठी महात्मा गांधी यांची प्रासंगिकता' या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी केदार यांच्या हस्ते एकविसाव्या शतकातील आचार्य विनोबा भावेंची प्रासंगिकता या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

ठळक मुद्देसुनील केदार : सात देशांतील विचारवंतांनी मांडले विचार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधींचे विचार २१ व्या शतकातही प्रासंगिक आहे. गांधीजींच्या विचारातील साधेपणा, मानवता आणि अहिंसा संपूर्ण जगापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करण्याची गरज आहे. गांधी हा एक विचार आहे आणि केवळ गांधीजींच्या विचारांनीच मानवी आयुष्यात आणि समाजात बदल घडवून येऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.महात्मा गांधी यांची १५१ व्या जयंती निमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या गालिब सभागृहात 'विश्व सभ्यतेसाठी महात्मा गांधी यांची प्रासंगिकता' या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी केदार यांच्या हस्ते एकविसाव्या शतकातील आचार्य विनोबा भावेंची प्रासंगिकता या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ल होते. अतिथी म्हणून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, प्र.कुलगुरू प्रा. चंद्र्रकांत रागीट, प्रा.हनुमान प्रसाद शुक्ल, जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री उपस्थित होते. लंडन, दक्षिण आफ्रिका, उझबेकिस्तान, मॉरिशस, नेपाळ आणि लिथुआनियासारख्या देशांच्या अभ्यासकांनी वेबिनारमध्ये विचार मांडले.इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्लीचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी बीजभाषण देताना १५० वर्षांनंतरही संपूर्ण जग गांधींच्या विचारांनी प्रेरित असल्याचे सांगितले. गांधीजी त्यांचे काम आणि विचारांनी अजूनही प्रासंगिक आहेत. गांधी विचारच सध्याच्या आव्हानांना सकारात्मक आणि समाधानकारक असल्याचे ते म्हणाले.या कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून लंडनचे गांधीवादी विचारवंत, पद्मभूषण प्रा. भिखू पारेख यांनी जागतिक सभ्यतेसाठी गांधीजींच्या मूल्यांचे अनुसरण करण्याची आजच्या समाजाची गरज असल्याचे सांगितले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांनी वर्धा येथे गांधीजींच्या १४ वर्षांच्या कार्यकाळावर आधारित भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेच्या सहकार्याने प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.कुलगुरू प्रा. शुक्ल यांनी पालकमंत्री सुनील केदार यांना विद्यापीठाने प्रकाशित केलेली पुस्तके भेट दिलीत.गांधी पीस फाउंडेशन, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉ. पी व्ही. राजगोपाल म्हणाले की, तरुणांमध्ये अहिंसेची, गांधींची विचारसरणी रुजविण्याच्या दिशेने कार्य करण्याची गरज आहे. शैक्षणिक संस्थांना गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वांचा उपयोग प्रत्येक कामात कसा करायचा याचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.या कार्यक्रमाचे संचालन मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातील असोसिएट प्रोफेसर डॉ नमिता निंबाळकर आणि दूरस्थ शिक्षण संचालनालयाचे सहाय्यक प्रा. डॉ शंभू जोशी यांनी केले. आभार विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. चंद्रकांत रागीट यांनी केले. कार्यक्रमाचे सहसंयोजन डायस्पोरा विभागाचे सहायक प्रा. डॉ मुन्नालाल गुप्ता व तत्वज्ञान व संस्कृतीचे विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. सूर्यप्रकाश पांडे यांनी केले. कार्यक्रमात देश-विदेशातील विद्वान, शिक्षक आणि संशोधकांनी आॅनलाइन सहभाग घेतला.व महात्मा गांधीवर विचार मांडले.

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदारMahatma Gandhiमहात्मा गांधी