शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

गांधीजींनी महिलांना नेतृत्वाची संधी दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:25 IST

सर्वोदय आणि गांधी संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधीत्व वाढले पाहिजे. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे संधी मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देशोभा शिराढोणकर : स्त्री व युवाशक्ती, समस्या आणि समाधान यावर चर्चासत्र

ऑनलाईन लोकमतसेवाग्राम : सर्वोदय आणि गांधी संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधीत्व वाढले पाहिजे. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे संधी मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे. आपण सतत गांधीजींच्या विचार व कार्यावर बोलतो; पण गांधीजींनी महिलांना पुढे करून नेतृत्व करण्याची संधी दिल्याने स्वातंत्र्य आंदोलनाला वेगळीच दिशा व धार मिळाली. यामुळे महिला, युवतींना स्थान व संधी दिली पाहिजे, असे मत शोभा शिराढोणकर यांनी व्यक्त केले.सेवाग्राम आश्रम परिसरात गांधीजींच्या १५० व्या जयंती अभियानांतर्गत ४७ वे अखिल भारतीय सर्वोदय समाज संमेलन सुरू आहे. यात शनिवारी सकाळी ‘स्त्री व युवा शक्ती, समस्या व समाधान’ यावर चर्चासत्र पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या.आशा यांनी गांधी विचार पूढे न्यायचा असेल तर याची सुरुवात स्वत:पासून करावी लागेल. तरच जग बदलेल. उत्तराखंडात विकासाच्या नावावर आमच्या गावात आमचे सरकार याची प्रकर्षाने गरज आहे. ओरियाचे मधुसूदन म्हणाले की, चांगली कविता, पोवाडे शिकून शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद वाढविण्यासाठी उपयोगी पडेल. आपण राष्ट्रवादांची चर्चा करतो; पण शेजाºयांशी आपली वागणूक व संबंध कसे आहेत यावर विचार, कृती करण्याची गरज आहे. उषा संतकन्या म्हणाल्या की, आपण ध्येय बाळगून पूढे गेलो पाहिजे. ‘माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी’ हे घोषवाक्य मनात बाळगावे, असे सांगितले.सारंग रघाटाटे म्हणाले की, आजच्या परिस्थितीत प्रत्येकाच्या हातात मोबाईल नसून प्रत्येक मोबाईलच्या हातात माणूस आहे. अदिती पटनायक यांनी भारत युवकांचा देश आहे. लोकसंख्येचे रूपांतर शक्तीमध्ये व्हावे. युवक, युवतींना कागदी शिक्षणापेक्षा रोजगाराभिमूख शिक्षण मिळावे. गांधीजींचे तत्वज्ञान जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगात आणावे, असे सांगितले. नयनताराचे बसंत पांडे यांनीही चर्चासत्रामध्ये सहभाग नोंदविला.१५० कार्यक्रमत्रिपुरामध्ये गांधी १५० अभियान अंतर्गत १५० कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. गांधी विचारांचा प्रसार व प्रचार करण्यात येणार आहे. तेथील लोकांना विकास काय आहे, हे माहिती नाही. इतका तो भाग मागास आहे, असे त्रिपुराचे देवाशिष यांनी सांगितले.