शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

गांधीजींनी महिलांना नेतृत्वाची संधी दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:25 IST

सर्वोदय आणि गांधी संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधीत्व वाढले पाहिजे. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे संधी मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देशोभा शिराढोणकर : स्त्री व युवाशक्ती, समस्या आणि समाधान यावर चर्चासत्र

ऑनलाईन लोकमतसेवाग्राम : सर्वोदय आणि गांधी संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधीत्व वाढले पाहिजे. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे संधी मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे. आपण सतत गांधीजींच्या विचार व कार्यावर बोलतो; पण गांधीजींनी महिलांना पुढे करून नेतृत्व करण्याची संधी दिल्याने स्वातंत्र्य आंदोलनाला वेगळीच दिशा व धार मिळाली. यामुळे महिला, युवतींना स्थान व संधी दिली पाहिजे, असे मत शोभा शिराढोणकर यांनी व्यक्त केले.सेवाग्राम आश्रम परिसरात गांधीजींच्या १५० व्या जयंती अभियानांतर्गत ४७ वे अखिल भारतीय सर्वोदय समाज संमेलन सुरू आहे. यात शनिवारी सकाळी ‘स्त्री व युवा शक्ती, समस्या व समाधान’ यावर चर्चासत्र पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या.आशा यांनी गांधी विचार पूढे न्यायचा असेल तर याची सुरुवात स्वत:पासून करावी लागेल. तरच जग बदलेल. उत्तराखंडात विकासाच्या नावावर आमच्या गावात आमचे सरकार याची प्रकर्षाने गरज आहे. ओरियाचे मधुसूदन म्हणाले की, चांगली कविता, पोवाडे शिकून शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद वाढविण्यासाठी उपयोगी पडेल. आपण राष्ट्रवादांची चर्चा करतो; पण शेजाºयांशी आपली वागणूक व संबंध कसे आहेत यावर विचार, कृती करण्याची गरज आहे. उषा संतकन्या म्हणाल्या की, आपण ध्येय बाळगून पूढे गेलो पाहिजे. ‘माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी’ हे घोषवाक्य मनात बाळगावे, असे सांगितले.सारंग रघाटाटे म्हणाले की, आजच्या परिस्थितीत प्रत्येकाच्या हातात मोबाईल नसून प्रत्येक मोबाईलच्या हातात माणूस आहे. अदिती पटनायक यांनी भारत युवकांचा देश आहे. लोकसंख्येचे रूपांतर शक्तीमध्ये व्हावे. युवक, युवतींना कागदी शिक्षणापेक्षा रोजगाराभिमूख शिक्षण मिळावे. गांधीजींचे तत्वज्ञान जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगात आणावे, असे सांगितले. नयनताराचे बसंत पांडे यांनीही चर्चासत्रामध्ये सहभाग नोंदविला.१५० कार्यक्रमत्रिपुरामध्ये गांधी १५० अभियान अंतर्गत १५० कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. गांधी विचारांचा प्रसार व प्रचार करण्यात येणार आहे. तेथील लोकांना विकास काय आहे, हे माहिती नाही. इतका तो भाग मागास आहे, असे त्रिपुराचे देवाशिष यांनी सांगितले.