शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

आश्रमातून गांधीजींनी देशाला रचनात्मक कार्यक्रम दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:32 IST

महात्मा गांधींनी जगाला सत्याग्रहाचे नवे शस्त्र दिले. शांती व अहिंसेवरून लोकांचा विश्वास उडाला होता; पण दांडीमार्चद्वारे गांधींची ताकद शांती, अहिंसा व सत्याग्रहातून दिसून आली. स्वातंत्र्य चळवळीसाठी देशाला नवा नेता मिळाला.

ठळक मुद्देरामचंद्र प्रधान : सेवाग्राम आश्रमाला अखिल भारतीय विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : महात्मा गांधींनी जगाला सत्याग्रहाचे नवे शस्त्र दिले. शांती व अहिंसेवरून लोकांचा विश्वास उडाला होता; पण दांडीमार्चद्वारे गांधींची ताकद शांती, अहिंसा व सत्याग्रहातून दिसून आली. स्वातंत्र्य चळवळीसाठी देशाला नवा नेता मिळाला. सत्याग्रहाची चळवळ शांती, अहिंसेच्या माध्यमातून अधिक प्रभावशाली झाल्याने देशातील लोकच नव्हे तर जगातील अभ्यासकांवर त्याचा प्रभाव झाला. स्वातंत्र्य आंदोलनासह याच आश्रमातून रचनात्मक कार्यक्रम देशासमोर ठेवले, असे मत प्रा. रामचंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. यात देशातील १६ राज्यातील तथा नेपाळ व अफगानिस्थानचे विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, गांधी विचार परिषदेचे संचालक भरत महोदय उपस्थित होते.प्रा. प्रधान पूढे म्हणाले की, गांधीजींनी इतिहास निर्माण केला. कदाचित इतिहास मिटू शकेल; पण बापूंनी अध्यात्म व संसार यांना जोडले. याच समाजात राहून तुम्ही अध्यात्मिक जीवन जगू शकता. समाज परिवर्तन करू शकता. ट्रस्टीशीपवर भर दिला. अन्यथा अंबानी व अदानीसारखे लोक तयार होतील. समाज व्यवस्था, परिवर्तन व रचनात्मक कार्य, ही महत्त्वपूर्ण दिशा गांधीजींनी देशाला, जगाला दिल्याचे सांगून गांधीजींबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी पसरविण्यात येत आहे. यात डॉ. आंबेडकर, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, पाकीस्तान निर्मिती यावर प्रकाश टाकून चुकीचा प्रचार खोडून काढला.भरत महोदय यांनी इतिहासाचे वाचन करून समजून घ्या. कुणी सांगितले, त्यावर विश्वास ठेवू नका. स्वयंअध्ययनातून ज्ञान वाढविण्याचे आवाहन केले. जयवंत मठकर यांनी आश्रमच्यावतीने सर्वांचे स्वागत करून सर्वधर्म प्रार्थना केली. महाराष्ट्र, गुजरात, मणीपूर, बिहार, तेलंगना, आंध्रप्रदेश, दिल्ली, पाँडेचेरी, ओडीसा, हरीयाणा, केरळ, तामिळनाडू, त्रिपूरा, कर्नाटक, राजस्थान, बंगाल आदी राज्यांतील तथा नेपाळ, अफगानिस्थान येथील ६१ मुली व महिला यात सहभागी होत्या. हे सर्व जन गांधी विचार परिषदेच्या शिबिराला आले आहे. याप्रसंगी प्रा. सी. ज्योत्सना सुरेंद्र कुमार, प्रवीण सातवकर उपस्थित होते.या ठिकाणी खरोखर शांती व सदाचार दिसून आला. मी हरियाणाचा असल्याने गांधीजींच्या विचारावर हरियाणांच्या लोकांनी विचार करावा. या ठिकाणी नक्कीच त्यांनी यावे.- सचिन कुमार व अंकित राणा, हरियाणा.आश्रमचा व गांधीजींचा इतिहास जाणून घेतला.- कल्पेश कोठावदे, महाराष्ट्र.आम्हाला या देशाचे नागरिकच समजत नाही, याचे दु:ख आहे. गांधीजी राष्ट्रपिता असून आम्ही त्यांचा सन्मान करतो. त्यांचे विचार महत्त्वपूर्ण आहेतच.- व्हिक्टोरिया, मणीपूर.