शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
2
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
4
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
5
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
6
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
7
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
8
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
9
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
10
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
11
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
12
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
13
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
14
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
15
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू
16
नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर
17
VIDEO: रोहित शर्मा सुरक्षा रक्षकावर भडकला; मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेमकं काय घडलं? पाहा...
18
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
19
'मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात...', अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
20
गजकेसरीसह ३ राजयोगांचा वरदान काळ: ९ राशींचे मंगल, हाती पैसा खेळेल; सुख-समृद्धी, शुभ-भरभराट!

आश्रमातून गांधीजींनी देशाला रचनात्मक कार्यक्रम दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:32 IST

महात्मा गांधींनी जगाला सत्याग्रहाचे नवे शस्त्र दिले. शांती व अहिंसेवरून लोकांचा विश्वास उडाला होता; पण दांडीमार्चद्वारे गांधींची ताकद शांती, अहिंसा व सत्याग्रहातून दिसून आली. स्वातंत्र्य चळवळीसाठी देशाला नवा नेता मिळाला.

ठळक मुद्देरामचंद्र प्रधान : सेवाग्राम आश्रमाला अखिल भारतीय विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : महात्मा गांधींनी जगाला सत्याग्रहाचे नवे शस्त्र दिले. शांती व अहिंसेवरून लोकांचा विश्वास उडाला होता; पण दांडीमार्चद्वारे गांधींची ताकद शांती, अहिंसा व सत्याग्रहातून दिसून आली. स्वातंत्र्य चळवळीसाठी देशाला नवा नेता मिळाला. सत्याग्रहाची चळवळ शांती, अहिंसेच्या माध्यमातून अधिक प्रभावशाली झाल्याने देशातील लोकच नव्हे तर जगातील अभ्यासकांवर त्याचा प्रभाव झाला. स्वातंत्र्य आंदोलनासह याच आश्रमातून रचनात्मक कार्यक्रम देशासमोर ठेवले, असे मत प्रा. रामचंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. यात देशातील १६ राज्यातील तथा नेपाळ व अफगानिस्थानचे विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, गांधी विचार परिषदेचे संचालक भरत महोदय उपस्थित होते.प्रा. प्रधान पूढे म्हणाले की, गांधीजींनी इतिहास निर्माण केला. कदाचित इतिहास मिटू शकेल; पण बापूंनी अध्यात्म व संसार यांना जोडले. याच समाजात राहून तुम्ही अध्यात्मिक जीवन जगू शकता. समाज परिवर्तन करू शकता. ट्रस्टीशीपवर भर दिला. अन्यथा अंबानी व अदानीसारखे लोक तयार होतील. समाज व्यवस्था, परिवर्तन व रचनात्मक कार्य, ही महत्त्वपूर्ण दिशा गांधीजींनी देशाला, जगाला दिल्याचे सांगून गांधीजींबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी पसरविण्यात येत आहे. यात डॉ. आंबेडकर, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, पाकीस्तान निर्मिती यावर प्रकाश टाकून चुकीचा प्रचार खोडून काढला.भरत महोदय यांनी इतिहासाचे वाचन करून समजून घ्या. कुणी सांगितले, त्यावर विश्वास ठेवू नका. स्वयंअध्ययनातून ज्ञान वाढविण्याचे आवाहन केले. जयवंत मठकर यांनी आश्रमच्यावतीने सर्वांचे स्वागत करून सर्वधर्म प्रार्थना केली. महाराष्ट्र, गुजरात, मणीपूर, बिहार, तेलंगना, आंध्रप्रदेश, दिल्ली, पाँडेचेरी, ओडीसा, हरीयाणा, केरळ, तामिळनाडू, त्रिपूरा, कर्नाटक, राजस्थान, बंगाल आदी राज्यांतील तथा नेपाळ, अफगानिस्थान येथील ६१ मुली व महिला यात सहभागी होत्या. हे सर्व जन गांधी विचार परिषदेच्या शिबिराला आले आहे. याप्रसंगी प्रा. सी. ज्योत्सना सुरेंद्र कुमार, प्रवीण सातवकर उपस्थित होते.या ठिकाणी खरोखर शांती व सदाचार दिसून आला. मी हरियाणाचा असल्याने गांधीजींच्या विचारावर हरियाणांच्या लोकांनी विचार करावा. या ठिकाणी नक्कीच त्यांनी यावे.- सचिन कुमार व अंकित राणा, हरियाणा.आश्रमचा व गांधीजींचा इतिहास जाणून घेतला.- कल्पेश कोठावदे, महाराष्ट्र.आम्हाला या देशाचे नागरिकच समजत नाही, याचे दु:ख आहे. गांधीजी राष्ट्रपिता असून आम्ही त्यांचा सन्मान करतो. त्यांचे विचार महत्त्वपूर्ण आहेतच.- व्हिक्टोरिया, मणीपूर.