शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

गांधी मूल्यांची संपूर्ण जगाकडून दखल

By admin | Updated: October 7, 2014 23:39 IST

२१ व्या शतकाची वाटचाल औद्योगिक क्रांतीतून उत्तर औद्योगिक काळाकडे होत आहे. या प्रक्रियेत जुने मुल्य मागे पडत आहे. संस्थांचे प्रारुप बदलत आहे, कार्यपद्धती बदलली आहे, या सर्व प्रक्रियेत गांधीजींना

यशवंत सुमंत : गांधीजींच्या विषयाची प्रासंगिकता यावर चर्चासत्रवर्धा : २१ व्या शतकाची वाटचाल औद्योगिक क्रांतीतून उत्तर औद्योगिक काळाकडे होत आहे. या प्रक्रियेत जुने मुल्य मागे पडत आहे. संस्थांचे प्रारुप बदलत आहे, कार्यपद्धती बदलली आहे, या सर्व प्रक्रियेत गांधीजींना जगाला दिलेल्या मुल्यांची शिकवण जोपासली जात आहे. त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या आहे आणि या मुल्यांची गरज संपूर्ण जगाला असल्याने त्याचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे विचार पुणे विद्यापीठाचे राजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. यशवंत सुमंत यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी हिंदी विद्यापीठात २१ व्या शतकात गांधी विचारांचे महत्त्व या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. त्यांनी राष्ट्रराज्याच्या प्राथमिक संस्था, घटक यांचे विवेचन केले. तसेच राष्ट्रराज्याला बळकटी देण्यासाठी गांधी मुल्यांची जपणूक करण्याची गरज व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती प्रा. गिरीश्वर मिश्र होते. तसेच विभाग प्रमुख डॉ. नृपेंद्र सिंह यांची उपस्थिती होती यानंतर बोलताना मिश्र यांनी समाजात वाढती हिंसा, मानवी संहार याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच गांधी मुल्यांचा गाभा मनुष्य असल्याचे सांगितले. गांधीजींच्या कल्पनेतील मानव हा सामंजस्य, पे्रम आणि नियमांचे पालन करणारा होता. प्रास्ताविक डॉ. सिंह यांनी केले तर आभार विभाग सहाय्यक प्रा. राकेश मिश्र यांनी मानले. यावेळी प्रा. अनिल राय, प्रा. शंभु गुप्त, डॉ. डी. एन. प्रसाद, डॉ. चित्रा माली, डॉ. सुरजीत कुमार सिंह, डॉ. अमित राय, डॉ. शंभु जोशी, डॉ. अवंतिका शुक्ला, डॉ. सुप्रिया पाठक, रविशंकर सिंह, जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे, संदीप सपकाळे व प्राध्यापकांची उपस्थिती होती. आयोजनाला विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)