शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गांधी मूल्यांची संपूर्ण जगाकडून दखल

By admin | Updated: October 7, 2014 23:39 IST

२१ व्या शतकाची वाटचाल औद्योगिक क्रांतीतून उत्तर औद्योगिक काळाकडे होत आहे. या प्रक्रियेत जुने मुल्य मागे पडत आहे. संस्थांचे प्रारुप बदलत आहे, कार्यपद्धती बदलली आहे, या सर्व प्रक्रियेत गांधीजींना

यशवंत सुमंत : गांधीजींच्या विषयाची प्रासंगिकता यावर चर्चासत्रवर्धा : २१ व्या शतकाची वाटचाल औद्योगिक क्रांतीतून उत्तर औद्योगिक काळाकडे होत आहे. या प्रक्रियेत जुने मुल्य मागे पडत आहे. संस्थांचे प्रारुप बदलत आहे, कार्यपद्धती बदलली आहे, या सर्व प्रक्रियेत गांधीजींना जगाला दिलेल्या मुल्यांची शिकवण जोपासली जात आहे. त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या आहे आणि या मुल्यांची गरज संपूर्ण जगाला असल्याने त्याचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे विचार पुणे विद्यापीठाचे राजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. यशवंत सुमंत यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी हिंदी विद्यापीठात २१ व्या शतकात गांधी विचारांचे महत्त्व या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. त्यांनी राष्ट्रराज्याच्या प्राथमिक संस्था, घटक यांचे विवेचन केले. तसेच राष्ट्रराज्याला बळकटी देण्यासाठी गांधी मुल्यांची जपणूक करण्याची गरज व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती प्रा. गिरीश्वर मिश्र होते. तसेच विभाग प्रमुख डॉ. नृपेंद्र सिंह यांची उपस्थिती होती यानंतर बोलताना मिश्र यांनी समाजात वाढती हिंसा, मानवी संहार याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच गांधी मुल्यांचा गाभा मनुष्य असल्याचे सांगितले. गांधीजींच्या कल्पनेतील मानव हा सामंजस्य, पे्रम आणि नियमांचे पालन करणारा होता. प्रास्ताविक डॉ. सिंह यांनी केले तर आभार विभाग सहाय्यक प्रा. राकेश मिश्र यांनी मानले. यावेळी प्रा. अनिल राय, प्रा. शंभु गुप्त, डॉ. डी. एन. प्रसाद, डॉ. चित्रा माली, डॉ. सुरजीत कुमार सिंह, डॉ. अमित राय, डॉ. शंभु जोशी, डॉ. अवंतिका शुक्ला, डॉ. सुप्रिया पाठक, रविशंकर सिंह, जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे, संदीप सपकाळे व प्राध्यापकांची उपस्थिती होती. आयोजनाला विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)