शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गांधी जयंतीदिनी विविध आंदोलने

By admin | Updated: October 3, 2015 01:50 IST

येथील महात्मा साखर कारखाना पूर्ती उद्योग समूहाने विकत घेतला.

कर्मचाऱ्यांचा आत्मक्लेष वर्धा : येथील महात्मा साखर कारखाना पूर्ती उद्योग समूहाने विकत घेतला. हा व्यवहार झाला त्यावेळी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्यासंदर्भात करार करण्यात आला होता. मात्र तसे झाले नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांच्या कृती समिती व किसान अधिकार अभियानच्यावतीने शुक्रवारी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आत्मक्लेष आंदोलन केले सकाळी १० वाजतापासून गांधी पुतळ्यापासून या आंदोलनाला प्रारंभ झाला. यावेळी भाऊरावजी काकडे, बाळासाहेब मिसाळ, गजेंद्र सुरकार, मंगेश शेंडे, सु०उाम पवार यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनात ३५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदविली होती. येथे हा कारखाना नागपूर येथील पूर्ती उद्योग समूहाने विकत घेतला. सन २००९ मधील या व्यवहारात येथील कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन व भविष्य निर्वाह निधी देण्यासंदर्भात कंपनीकडून टोलवाटोलवीचे उत्तर मिळाले. यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी आज किसान अधिकार अभियानच्या मार्गदर्शनात महत्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केले. यावेळी अभियानचे अविनाश काकडे यांच्यासह अभियानच्या सदस्यांसह कारखान्यातील कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी) कृषी पंपाकरिता आंदोलनवर्धा : जिल्ह्यामधील पाच हजार शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने रितसर डिमांड भरूनही पाच वर्षांपासून वीज जोडणी दिली नाही. ती मिळावी म्हणून गांधी आश्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देत ३१ डिसेंबर पर्यंत वीज जोडण्या दिल्या नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेवून महात्मा फुले समता परिषद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फासी लटको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. शेतकऱ्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यासाठी ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत देण्याबाबत नियोजनपुर्वक त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा १ जानेवारी २०१६ ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेवून, फासी लटको आंदोलन करू, असे निवेदन सेवाग्राम आश्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले. जून २०१५ अखेरपर्यंत वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट विभागात १, ६६७, आर्वी विभागात, १,६९५ तर वर्धा विभागातत १,९९४ वीज जोडण्या अशा जोडण्या देणे बाकी आहे. या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यासाठी शासनाने ६५ कोटी रुपयांची तरतुदही केली आहे. तरी शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली जात नाही, ही शोकांतिका आहे. ना. मुनगंटीवार यांना निवेदन देतांना परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, विनय डहाके, विजय मुळे, निळकंठ राऊत, निळकंठ पिसे, केशव तितरे, सुरेश सातोकर उपस्थित होते.(प्रतिनिधी)