शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

गांधी विचारच सर्वोत्तमचा दिला संदेश; काँग्रेसची गांधी विचार यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:10 IST

. काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या गांधी विचार यात्रेचे नेतृत्त्व अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले.

ठळक मुद्देराहुल गांधींनी केले नेतृत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: महात्मा गांधी यांचे विचार सध्याच्या विज्ञान युगात अनेकांसाठी मार्गदर्शक असून ते सर्वोत्तम असल्याचा संदेश गांधी विचार यात्रेच्या माध्यमातून देण्यात आला. काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या या गांधी विचार यात्रेचे नेतृत्त्व अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले.स्थानिक सिव्हील लाईन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ही गांधी विचार यात्रा काढण्यात आली. या यात्रेत सहभागी होण्यासाठी मंगळवारी सकाळी १० वाजतापासूनच महात्मा गांधी पुतळा परिसरात एकत्र होण्यास सुरूवात केली होती. दुपारी २ वाजेपर्यंत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी तेथे एकच गर्दी केली होती. दुपारी २.४० वाजता महात्मा गांधी पुतळा परिसरातून सुरू झालेली ही पदयात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, इतवारा चौक, मुख्य बाजारपेठ, सोशालिस्ट चौक, वंजारी चौक मार्गक्रमण करीत स्थानिक रामनगर भागातील सर्कस मैदान येथे पोहोचली. तेथे पदयात्रेचे जाहीर सभेत रुपांतरण झाले. गांधी विचार यात्रेत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सूतमाला अर्पण करून केले राष्ट्रपित्याला अभिवादनखा. राहुल गांधी यांचा ताफा महात्मा गांधी पुतळा परिसरात दुपारी २.४० वाजताच्या सुमारास दाखल झाला. काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून खाली उतरलेल्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी सिव्हील लाईन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूणार्कृती पुतळ्याला दुपारी २.४६ वाजताच्या सुमारास सूतमाला अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर पदयात्रेला सुरूवात झाली.कार्यकर्त्यांशी केले हस्तांदोलनसेवाग्राम येथून वर्धा शहारातील सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी पुतळा परिसरात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी दुपारी २.४० वाजताच्या सुमारास आले. त्यांनी आपल्या वाहनातून उतरताच सुरूवातीला नागरिकांच्या गर्दीत जात काही नागरिकांशी हस्तांदोलन केले. शिवाय हात हालवून यात्रेत सहभागी होणाºया नागरिकांचे अभिवादन केले.पोलिसांची झाली दमछाककाँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी हे अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती पैकी एक आहेत. ते विविध कार्यक्रमानिमित्त सेवाग्राम व वर्धेत येत असल्याने कार्यक्रम स्थळी मंगळवारी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. सिव्हील लाईन भागातून गांधी विचार यात्रा काढण्यात आली. तेथेही पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. परंतु, अपेक्षेपेक्षा जास्त नागरिक सदर यात्रेत सहभागी होण्यासाठी येथे एकत्र झाल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्तव्य बजावताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी