शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गांधी विचारच सर्वोत्तमचा दिला संदेश; काँग्रेसची गांधी विचार यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:10 IST

. काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या गांधी विचार यात्रेचे नेतृत्त्व अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले.

ठळक मुद्देराहुल गांधींनी केले नेतृत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: महात्मा गांधी यांचे विचार सध्याच्या विज्ञान युगात अनेकांसाठी मार्गदर्शक असून ते सर्वोत्तम असल्याचा संदेश गांधी विचार यात्रेच्या माध्यमातून देण्यात आला. काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या या गांधी विचार यात्रेचे नेतृत्त्व अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले.स्थानिक सिव्हील लाईन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ही गांधी विचार यात्रा काढण्यात आली. या यात्रेत सहभागी होण्यासाठी मंगळवारी सकाळी १० वाजतापासूनच महात्मा गांधी पुतळा परिसरात एकत्र होण्यास सुरूवात केली होती. दुपारी २ वाजेपर्यंत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी तेथे एकच गर्दी केली होती. दुपारी २.४० वाजता महात्मा गांधी पुतळा परिसरातून सुरू झालेली ही पदयात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, इतवारा चौक, मुख्य बाजारपेठ, सोशालिस्ट चौक, वंजारी चौक मार्गक्रमण करीत स्थानिक रामनगर भागातील सर्कस मैदान येथे पोहोचली. तेथे पदयात्रेचे जाहीर सभेत रुपांतरण झाले. गांधी विचार यात्रेत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सूतमाला अर्पण करून केले राष्ट्रपित्याला अभिवादनखा. राहुल गांधी यांचा ताफा महात्मा गांधी पुतळा परिसरात दुपारी २.४० वाजताच्या सुमारास दाखल झाला. काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून खाली उतरलेल्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी सिव्हील लाईन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूणार्कृती पुतळ्याला दुपारी २.४६ वाजताच्या सुमारास सूतमाला अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर पदयात्रेला सुरूवात झाली.कार्यकर्त्यांशी केले हस्तांदोलनसेवाग्राम येथून वर्धा शहारातील सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी पुतळा परिसरात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी दुपारी २.४० वाजताच्या सुमारास आले. त्यांनी आपल्या वाहनातून उतरताच सुरूवातीला नागरिकांच्या गर्दीत जात काही नागरिकांशी हस्तांदोलन केले. शिवाय हात हालवून यात्रेत सहभागी होणाºया नागरिकांचे अभिवादन केले.पोलिसांची झाली दमछाककाँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी हे अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती पैकी एक आहेत. ते विविध कार्यक्रमानिमित्त सेवाग्राम व वर्धेत येत असल्याने कार्यक्रम स्थळी मंगळवारी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. सिव्हील लाईन भागातून गांधी विचार यात्रा काढण्यात आली. तेथेही पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. परंतु, अपेक्षेपेक्षा जास्त नागरिक सदर यात्रेत सहभागी होण्यासाठी येथे एकत्र झाल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्तव्य बजावताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी