शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

गांधी जिल्हा नामांतरणाची फाईल ३५ वर्षांपासून धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:47 IST

वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा व्हावा ही वर्धा जिल्ह्यातील थोर राष्ट्राय नेते स्व. विनोबा भावे यांची इच्छा होती. राज्य शासनाने ही योजना पुनरूज्जीवित केल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण विकास तर होईलच; पण त्याचबरोबर स्व. विनोबा भावेंना ही खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.

ठळक मुद्दे१९८३ ला झाली होती घोषणा सरकारला पडला विसर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासनाने २ आॅक्टोबर १९८३ रोजी वर्धा शहरात आयोजित केलेल्या एका भव्य समारंभात वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा म्हणून घोषित केला होता. या समारंभाला तत्कालीन केंद्रीय उद्योगमंत्री नारायणदत्त तिवारी, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि इतर मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पनेनुसार वर्धा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून हा जिल्हा जागतिक नकाशावर आणण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला होता.या घटनेला २ आॅक्टोबर २०१८ रोजी ३५ वर्षे पूर्ण होतील; पण या समारंभानंतर वर्धेला गांधी जिल्हा म्हणून विकसित करण्याची योजना आणि संकल्पना राज्यशासनाने आणि केंद्राने पूर्णत: बासनात गुंडाळून ठेवलेली आहे. आज घटकेला असा काही समारंभ झाला होता आणि अशी काही संकल्पना पूढे आली होती, हा मुद्दा जनसामान्य तर विसरलेच; पण शासकीय यंत्रणाही पूर्णत: विसरलेली आहे. सर्वांगीण विकासाचे मागील ७० वर्षांपासून स्वप्न बघणारा वर्धा जिल्हा आज जिथल्या तिथेच आहे, असे नाही तर अधिकच गर्तेत गेलेला दिसतो आहे.वर्धा जिल्ह्यात मागील ७० वर्षांत अनेक राजकीय दिग्गज कार्यरत राहिले. वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा व्हावा ही वर्धा जिल्ह्यातील थोर राष्ट्राय नेते स्व. विनोबा भावे यांची इच्छा होती. राज्य शासनाने ही योजना पुनरूज्जीवित केल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण विकास तर होईलच; पण त्याचबरोबर स्व. विनोबा भावेंना ही खरीखुरी श्रद्धांजली ठरेल. मागील ३५ वर्षांत या योजनेवर फारसे काहीही झाले नसल्याने या योजनेची कागदपत्रे २०१२ च्या मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळून गेली, असा खुलासाही मंत्रालयातील नोकरशाही करू शकेल. अशा परिस्थितीत या योजनेची कागदपत्रे आणि प्रस्ताव इतरत्रही उपलब्ध असू शकतात. या प्रकरणात शासनाने आवश्यक ती पावले उचलून येत्या २ आॅक्टोबर २०१८ पूर्वी याबाबत निश्चित घोषणा करणे गरजेचे झाले आहे.

राज्य शासनाने ही योजना आणि संकल्पनेच्या प्रस्तावावरील धूळ झटकून तो बाहेर काढावा. त्या योजनेत परिस्थितीजन्य सुधारणा करून वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा कालबद्ध कार्यक्रम प्रत्यक्ष कृती अहवालासह जाहीर करावा. त्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद त्वरित करावी.- सुबोध मोहिते पाटील, माजी केंद्रीय मंत्री तथा स्वाभिमानी पक्षाचे नेते, वर्धा.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी