शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

रखरखत्या उन्हात वितभर पोटासाठी तप्त लोखंडाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:07 IST

पाच अंकी पगार किंवा लाखो रुपयांचा वैध, अवैध व्यवसाय करून ऐशोआरामी जीवन जगणाऱ्या या समाजात पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हात परिश्रम करूनसुद्धा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, याची चणचण भासणाऱ्या कुटुंबाची कमी नाही.

ठळक मुद्देपावसाळा संपला की भटकंती सुरू : १४ कुटुंबांकरिता आकाशच झाले छत, उघड्यावरच करतात स्वयंपाक

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : पाच अंकी पगार किंवा लाखो रुपयांचा वैध, अवैध व्यवसाय करून ऐशोआरामी जीवन जगणाऱ्या या समाजात पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हात परिश्रम करूनसुद्धा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, याची चणचण भासणाऱ्या कुटुंबाची कमी नाही. एकीकडे फॅशन व शौक म्हणून अपुरे कपडे घालतात. तर काहींना आर्थिक अडचणीअभावी पुरेसे कपडे घालता येत नाही. एकीकडे फॅशन म्हणून आपल्या थाळीत उष्टे अन्न ठेवण्यात येते, तर अनेकांना खाण्यासाठी थाळीत अन्न मिळत नाही. अशा विराधाअभावी आणि मन पिळवटून टाकणारी अनेक उदाहरणे या समाजात पहायला मिळतात.अशाच अत्यंत काबाडकष्ट करून पोट भरण्यासाठी धडपड करणाºया का भटकी कुटुंबियांची भेट घेण्याचा आणि त्यांचे दुख: जाणून घेण्याचा योग आज सकाळी ७ वाजता फिरायला जाताना आला. कारंजा पंचायत समोरील मोकळ्या जागेत ८ मोठी बाया माणसं आणि ६ लहान मुले-मुली. लोहाराचा व्यवसाय करताना दिसून आली.महिला नाजूक हातात मोठा घन घेत तप्त लोखंडावर आदळून लोखंडाला आकार देत होत्या. तर माणसं तप्त लोखंड धरून त्यावर घाव घालून पाहिजे त्या आकाराची वस्तू बनवित होते. खेळण्याचे दिवस असलेली पाच ते सहा वर्षांची मुले भाता फुकून लोखंडाला तापविण्याचा प्रयत्न करीत होती. या कुटुंबीयांचा प्रमुख पप्पू चव्हाण (६०) यांची प्रतिनिधीने भेट घेत कुटुंबीय व व्यवसायाबद्दल जाणून घेतले. प्रत्येकी चार महिला आणि चार पुरूष, तीन छोट्या मुली व तीन छोटी मुले असे कुटुंब असून मध्य प्रदेशातील भोपाळ जिल्ह्यातील गिराम सुवाहा येथील रहिवासी असल्याचे सांगितले.पावसाळा संपला की आॅक्टोबर महिन्यामध्ये या व्यवसायासाठी ते निघतात. पावसाळा येईपर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यात फिरतात. उदरनिर्वाहासाठी सकाळी ६ वाजतापासून या काबाड कष्टाला ते सुरूवात करतात. रात्री ९ पर्यंत व्यवहार चालतो. रात्री येथेच स्वयंपाक करतात अन् झोपतो. सकाळी उठून परत कामाला सुरूवात करतो. महागाईमुळे या व्यवसायातून पोटापुरती मिळकत त्यांना मिळत नाही. पिढीजात म्हणून अनेक वर्षांपासून हा व्यवसाय सुरू असल्याचे सांगितले.मध्यप्रदेशात राहायला घर नाही. शेती नाही, प्लॉट नाही, स्थायी व्यवसाय नाही. सरकार लक्ष देत नाही. म्हणून देशोदेशी या लहान मुलांना घेऊन भटकावे लागते. या भटकंतीमुळे मुले शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षण न मिळाल्यामुळे नाईलाजास्तव याच कठीण व मेहनती व्यवसायात आमच्या मुलांना शिरावे लागते, असे गटप्रमुख बेतालसिंग चव्हाण यांनी बोलून दाखविले.कच्चे लोखंड विकत घेऊन त्यापासून कुºहाड, वासला, विळा, व फास अशी अवजारे ते तयार करतात. व्यवसायाला मदत म्हणून कढई, झारे, तवा, सराटे आणून विकतात. राहणीमानाचा खर्च कमी असल्यामुळे कसाबसा उदरनिर्वाह चालवितो. बरेचदा इकडे व्यवसायासाठी फिरत असताना मूळ गावात थांबलेले, आई-वडीलाचे देहानवसान होते, पण भेट होत नाही, अशी संवेदनासुद्धा मोहनसिंग सिसोदिया (२६) यांनी व्यक्त केली. शेती व घरगुती कामासाठी ते उपयुक्त अवजारे तयार करतात. पाच किलोचा घन उचलून घाव घालताना छाती, कंबर, पाठ दुखते, पण सांगायचे कुणाला? सगळे दुख अंगाला झेलावे लागते. माणसाला मदत म्हणून सगळं कराव लागतं.भाता फुकण्याचे काम लहान मुले करतात. त्यांना खेळायला मिळत नाही. इतकी थकतात की पटकन झोपतात आणि सकाळी परत आपल्या आई वडिलांसोबत उठतात आणि कामाला लागतात. झोपायला गादी नाही. कुलर नाही. निसर्गाच्या कुशीत आईवडिलांच्या प्रेमात सर्व विसरून गाढ झोपून जातात. आमच्या समस्या कुणीतही शासनाकडे मांडाव्यात, अशी तीव्र इच्छा सिसोदिया यांनी बोलून दाखविली.