शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
4
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
5
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
6
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
7
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
8
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
9
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
10
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
11
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
12
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
13
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
14
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
15
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
16
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
17
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
18
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
19
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?

रखरखत्या उन्हात वितभर पोटासाठी तप्त लोखंडाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:07 IST

पाच अंकी पगार किंवा लाखो रुपयांचा वैध, अवैध व्यवसाय करून ऐशोआरामी जीवन जगणाऱ्या या समाजात पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हात परिश्रम करूनसुद्धा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, याची चणचण भासणाऱ्या कुटुंबाची कमी नाही.

ठळक मुद्देपावसाळा संपला की भटकंती सुरू : १४ कुटुंबांकरिता आकाशच झाले छत, उघड्यावरच करतात स्वयंपाक

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : पाच अंकी पगार किंवा लाखो रुपयांचा वैध, अवैध व्यवसाय करून ऐशोआरामी जीवन जगणाऱ्या या समाजात पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हात परिश्रम करूनसुद्धा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, याची चणचण भासणाऱ्या कुटुंबाची कमी नाही. एकीकडे फॅशन व शौक म्हणून अपुरे कपडे घालतात. तर काहींना आर्थिक अडचणीअभावी पुरेसे कपडे घालता येत नाही. एकीकडे फॅशन म्हणून आपल्या थाळीत उष्टे अन्न ठेवण्यात येते, तर अनेकांना खाण्यासाठी थाळीत अन्न मिळत नाही. अशा विराधाअभावी आणि मन पिळवटून टाकणारी अनेक उदाहरणे या समाजात पहायला मिळतात.अशाच अत्यंत काबाडकष्ट करून पोट भरण्यासाठी धडपड करणाºया का भटकी कुटुंबियांची भेट घेण्याचा आणि त्यांचे दुख: जाणून घेण्याचा योग आज सकाळी ७ वाजता फिरायला जाताना आला. कारंजा पंचायत समोरील मोकळ्या जागेत ८ मोठी बाया माणसं आणि ६ लहान मुले-मुली. लोहाराचा व्यवसाय करताना दिसून आली.महिला नाजूक हातात मोठा घन घेत तप्त लोखंडावर आदळून लोखंडाला आकार देत होत्या. तर माणसं तप्त लोखंड धरून त्यावर घाव घालून पाहिजे त्या आकाराची वस्तू बनवित होते. खेळण्याचे दिवस असलेली पाच ते सहा वर्षांची मुले भाता फुकून लोखंडाला तापविण्याचा प्रयत्न करीत होती. या कुटुंबीयांचा प्रमुख पप्पू चव्हाण (६०) यांची प्रतिनिधीने भेट घेत कुटुंबीय व व्यवसायाबद्दल जाणून घेतले. प्रत्येकी चार महिला आणि चार पुरूष, तीन छोट्या मुली व तीन छोटी मुले असे कुटुंब असून मध्य प्रदेशातील भोपाळ जिल्ह्यातील गिराम सुवाहा येथील रहिवासी असल्याचे सांगितले.पावसाळा संपला की आॅक्टोबर महिन्यामध्ये या व्यवसायासाठी ते निघतात. पावसाळा येईपर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यात फिरतात. उदरनिर्वाहासाठी सकाळी ६ वाजतापासून या काबाड कष्टाला ते सुरूवात करतात. रात्री ९ पर्यंत व्यवहार चालतो. रात्री येथेच स्वयंपाक करतात अन् झोपतो. सकाळी उठून परत कामाला सुरूवात करतो. महागाईमुळे या व्यवसायातून पोटापुरती मिळकत त्यांना मिळत नाही. पिढीजात म्हणून अनेक वर्षांपासून हा व्यवसाय सुरू असल्याचे सांगितले.मध्यप्रदेशात राहायला घर नाही. शेती नाही, प्लॉट नाही, स्थायी व्यवसाय नाही. सरकार लक्ष देत नाही. म्हणून देशोदेशी या लहान मुलांना घेऊन भटकावे लागते. या भटकंतीमुळे मुले शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षण न मिळाल्यामुळे नाईलाजास्तव याच कठीण व मेहनती व्यवसायात आमच्या मुलांना शिरावे लागते, असे गटप्रमुख बेतालसिंग चव्हाण यांनी बोलून दाखविले.कच्चे लोखंड विकत घेऊन त्यापासून कुºहाड, वासला, विळा, व फास अशी अवजारे ते तयार करतात. व्यवसायाला मदत म्हणून कढई, झारे, तवा, सराटे आणून विकतात. राहणीमानाचा खर्च कमी असल्यामुळे कसाबसा उदरनिर्वाह चालवितो. बरेचदा इकडे व्यवसायासाठी फिरत असताना मूळ गावात थांबलेले, आई-वडीलाचे देहानवसान होते, पण भेट होत नाही, अशी संवेदनासुद्धा मोहनसिंग सिसोदिया (२६) यांनी व्यक्त केली. शेती व घरगुती कामासाठी ते उपयुक्त अवजारे तयार करतात. पाच किलोचा घन उचलून घाव घालताना छाती, कंबर, पाठ दुखते, पण सांगायचे कुणाला? सगळे दुख अंगाला झेलावे लागते. माणसाला मदत म्हणून सगळं कराव लागतं.भाता फुकण्याचे काम लहान मुले करतात. त्यांना खेळायला मिळत नाही. इतकी थकतात की पटकन झोपतात आणि सकाळी परत आपल्या आई वडिलांसोबत उठतात आणि कामाला लागतात. झोपायला गादी नाही. कुलर नाही. निसर्गाच्या कुशीत आईवडिलांच्या प्रेमात सर्व विसरून गाढ झोपून जातात. आमच्या समस्या कुणीतही शासनाकडे मांडाव्यात, अशी तीव्र इच्छा सिसोदिया यांनी बोलून दाखविली.