शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

रखरखत्या उन्हात वितभर पोटासाठी तप्त लोखंडाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:07 IST

पाच अंकी पगार किंवा लाखो रुपयांचा वैध, अवैध व्यवसाय करून ऐशोआरामी जीवन जगणाऱ्या या समाजात पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हात परिश्रम करूनसुद्धा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, याची चणचण भासणाऱ्या कुटुंबाची कमी नाही.

ठळक मुद्देपावसाळा संपला की भटकंती सुरू : १४ कुटुंबांकरिता आकाशच झाले छत, उघड्यावरच करतात स्वयंपाक

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : पाच अंकी पगार किंवा लाखो रुपयांचा वैध, अवैध व्यवसाय करून ऐशोआरामी जीवन जगणाऱ्या या समाजात पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हात परिश्रम करूनसुद्धा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, याची चणचण भासणाऱ्या कुटुंबाची कमी नाही. एकीकडे फॅशन व शौक म्हणून अपुरे कपडे घालतात. तर काहींना आर्थिक अडचणीअभावी पुरेसे कपडे घालता येत नाही. एकीकडे फॅशन म्हणून आपल्या थाळीत उष्टे अन्न ठेवण्यात येते, तर अनेकांना खाण्यासाठी थाळीत अन्न मिळत नाही. अशा विराधाअभावी आणि मन पिळवटून टाकणारी अनेक उदाहरणे या समाजात पहायला मिळतात.अशाच अत्यंत काबाडकष्ट करून पोट भरण्यासाठी धडपड करणाºया का भटकी कुटुंबियांची भेट घेण्याचा आणि त्यांचे दुख: जाणून घेण्याचा योग आज सकाळी ७ वाजता फिरायला जाताना आला. कारंजा पंचायत समोरील मोकळ्या जागेत ८ मोठी बाया माणसं आणि ६ लहान मुले-मुली. लोहाराचा व्यवसाय करताना दिसून आली.महिला नाजूक हातात मोठा घन घेत तप्त लोखंडावर आदळून लोखंडाला आकार देत होत्या. तर माणसं तप्त लोखंड धरून त्यावर घाव घालून पाहिजे त्या आकाराची वस्तू बनवित होते. खेळण्याचे दिवस असलेली पाच ते सहा वर्षांची मुले भाता फुकून लोखंडाला तापविण्याचा प्रयत्न करीत होती. या कुटुंबीयांचा प्रमुख पप्पू चव्हाण (६०) यांची प्रतिनिधीने भेट घेत कुटुंबीय व व्यवसायाबद्दल जाणून घेतले. प्रत्येकी चार महिला आणि चार पुरूष, तीन छोट्या मुली व तीन छोटी मुले असे कुटुंब असून मध्य प्रदेशातील भोपाळ जिल्ह्यातील गिराम सुवाहा येथील रहिवासी असल्याचे सांगितले.पावसाळा संपला की आॅक्टोबर महिन्यामध्ये या व्यवसायासाठी ते निघतात. पावसाळा येईपर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यात फिरतात. उदरनिर्वाहासाठी सकाळी ६ वाजतापासून या काबाड कष्टाला ते सुरूवात करतात. रात्री ९ पर्यंत व्यवहार चालतो. रात्री येथेच स्वयंपाक करतात अन् झोपतो. सकाळी उठून परत कामाला सुरूवात करतो. महागाईमुळे या व्यवसायातून पोटापुरती मिळकत त्यांना मिळत नाही. पिढीजात म्हणून अनेक वर्षांपासून हा व्यवसाय सुरू असल्याचे सांगितले.मध्यप्रदेशात राहायला घर नाही. शेती नाही, प्लॉट नाही, स्थायी व्यवसाय नाही. सरकार लक्ष देत नाही. म्हणून देशोदेशी या लहान मुलांना घेऊन भटकावे लागते. या भटकंतीमुळे मुले शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षण न मिळाल्यामुळे नाईलाजास्तव याच कठीण व मेहनती व्यवसायात आमच्या मुलांना शिरावे लागते, असे गटप्रमुख बेतालसिंग चव्हाण यांनी बोलून दाखविले.कच्चे लोखंड विकत घेऊन त्यापासून कुºहाड, वासला, विळा, व फास अशी अवजारे ते तयार करतात. व्यवसायाला मदत म्हणून कढई, झारे, तवा, सराटे आणून विकतात. राहणीमानाचा खर्च कमी असल्यामुळे कसाबसा उदरनिर्वाह चालवितो. बरेचदा इकडे व्यवसायासाठी फिरत असताना मूळ गावात थांबलेले, आई-वडीलाचे देहानवसान होते, पण भेट होत नाही, अशी संवेदनासुद्धा मोहनसिंग सिसोदिया (२६) यांनी व्यक्त केली. शेती व घरगुती कामासाठी ते उपयुक्त अवजारे तयार करतात. पाच किलोचा घन उचलून घाव घालताना छाती, कंबर, पाठ दुखते, पण सांगायचे कुणाला? सगळे दुख अंगाला झेलावे लागते. माणसाला मदत म्हणून सगळं कराव लागतं.भाता फुकण्याचे काम लहान मुले करतात. त्यांना खेळायला मिळत नाही. इतकी थकतात की पटकन झोपतात आणि सकाळी परत आपल्या आई वडिलांसोबत उठतात आणि कामाला लागतात. झोपायला गादी नाही. कुलर नाही. निसर्गाच्या कुशीत आईवडिलांच्या प्रेमात सर्व विसरून गाढ झोपून जातात. आमच्या समस्या कुणीतही शासनाकडे मांडाव्यात, अशी तीव्र इच्छा सिसोदिया यांनी बोलून दाखविली.