शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

‘त्या’ अतिक्रमणावर चालला गजराज

By admin | Updated: March 17, 2017 02:04 IST

श्री क्षेत्र भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा येथे जाणाऱ्या रस्त्याच्या रूंदीकरणाची योजना आखण्यात आली होती.

दोन वर्षांनंतर झाली कारवाई : तीन जेसीबीच्या साह्याने मोकळी केली रस्त्याची जागा तळेगाव (टालाटुले) : श्री क्षेत्र भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा येथे जाणाऱ्या रस्त्याच्या रूंदीकरणाची योजना आखण्यात आली होती. यासाठी दोन वर्षांपूर्वी तळेगाव येथील अतिक्रमण हटविण्यात आले; पण त्यानंतर कारवाई झाली नव्हती. नोटीस, दवंडीचा सोपस्कार झाला; पण अधिकारी आलेच नव्हते. गुरूवारी अखेर बांधकाम विभागाचे अधिकारी जेसीबीसह गावात दाखल झाले. तीन जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर आलेले अतिक्रमण सकाळी ११.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हटविण्यात आले. नागरिकांनी मुख्य रस्त्यावर वर्धा ते हिंगणघाट तथा वायगाव ते अल्लीपूर ते आजनसरा या मुख्य रस्त्यावरच अतिक्रमण केले होते. रस्त्यालगत इमारती बांधली व दुकाने थाटली होती. परिणामी, वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत होता. दोन वर्षांपूर्वी रस्ता रूंदीकरणासाठी जमिनीचे मोजमाप करण्यात आले. त्यावेळी अतिक्रमण धारकांना नोटीस देण्यात आल्या होत्या. शिवाय मार्किंगही करून ठेवण्यात आले होते. काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू झाल्याने अतिक्रमण हटविण्यात आले; पण ते अर्धवटच राहिले होते. यामुळे पुन्हा अतिक्रमण वाढले. यानंतर जानेवारी महिन्यात अतिक्रमण धारकांना नोटीस बजावल्या. शिवाय दवंडीही दिली होती. यामुळे काहींनी अतिक्रमण काढून दुसऱ्याकडे भाडेतत्वावर घर घेतले; पण पथक गावात दाखल झालेच नाही. अखेर गुरूवारी सकाळी ११.३० वाजता अतिक्रमण हटविण्यासाठी पथक दाखल झाले. तीन जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण हटविण्यात आले. साहित्य उचलून नेण्याकरिता तीन ट्रक वापरले गेले. महागाईच्या काळात घर व दुकान पडल्याने ग्रामस्थांचे डोळे पानावल्याचे दिसून आले.(वार्ताहर) राजकारणामुळे कारवाईला झाला विलंब दोन वर्षांपूर्वी बांधकाम विभागाकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी अर्धवट राहिलेली कारवाई राजकारण आडवे आल्याने रखडली होती, अखेर गुरूवारी प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली. तळेगाव ते आजनसरा मार्गाचे रूंदीकरण गरजेचे होते. तळेगाव येथे अतिक्रमणामुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता. यामुळे ही कारवाई योग्यच असल्याचे मत काही ग्रामस्थांनी व्यक्त केले. मुख्य मार्गावरच नागरिकांनी अतिक्रमण केल्याने वाहन चालकांना मनस्ताप सहन करवा लागत होता. आता अतिक्रमण हटल्याने रस्ता रूंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. रस्ता रूंदीकरणासाठी अतिक्रमण हटविणे गरजेचे होते. जागा मिळेल तेथे अतिक्रमण करण्यात आल्याने ही कारवाई योग्यच आहे, असे मत काही ग्रामस्थांनी व्यक्त केले. आपलेही अतिक्रमण हटणार, हे माहिती असल्याने दोन वर्षांपासून नागरिक प्रतीक्षा करीत होते; पण अतिक्रमण काढण्याऐवजी काहींनी दुकाने थाटली तर काहींनी घरे बांधली. असे असले तरी सर्वांत धास्ती होती.