शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

अतिक्रमणावर पुन्हा चालला गजराज

By admin | Updated: January 21, 2016 02:00 IST

नगर परिषद प्रशासनाच्यावतीने वारंवार अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाते; पण ते पुन्हा जैसे थे होते. यामुळे आता अतिक्रमण हटविण्याकरिता पालिकेने पथकच तयार केले.

नगर परिषदेची धडक कारवाई : तीन दिवस चालणार मोहीम, फिरत्या पथकाचा वॉचवर्धा : नगर परिषद प्रशासनाच्यावतीने वारंवार अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाते; पण ते पुन्हा जैसे थे होते. यामुळे आता अतिक्रमण हटविण्याकरिता पालिकेने पथकच तयार केले. तीन दिवस ही अतिक्रमण हटाव मोहीम धकडपणे राबविली जाणार आहे. बुधवारी बजाज चौक ते रेल्वेस्थानक मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात आले.न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या उपस्थितीत नगर अभियंता सुधीर फरसोले, आरोग्य निरीक्षक रवींद्र टप्पे यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. बजाज चौक येथील भाजी बाजार परिसरात रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. फळ व अन्य विक्रेत्यांनी रस्त्यापर्यंत लावलेले शेड काढण्यात येऊन जेसीबीच्या साह्याने सदर परिसर खोदून काढला. बजाज चौकातील सुमारे दहा विक्रेत्यांची अतिक्रमणे काढण्यात आली. यापूढे अतिक्रमण केल्यास दंडात्मक तसेच जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.बजाज चौक ते रेल्वेस्थानक या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळ व भाजीविक्रेते रस्त्यापर्यंत हातगाड्या लावून व्यवसाय करतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. हे अतिक्रमण कित्येक वेळा हटविण्यात आले; पण सदर विक्रेते पुन्हा तेथेच बंड्या लावत असल्याने परिस्थिती जैसे थे होते. १९ ते २१ जानेवारीपर्यंत असेलली ही अतिक्रमण हटाव मोहीम मंगळवारी पोलीस ताफा उपलब्ध नसल्याने बुधवारपासून सुरू झाली. यात नगर परिषदेचे व पोलीस कर्मचारी अशा २५ जणांच्या ताफ्याने हा परिसर मोकळा केला. न.प. मुख्याधिकारी वाघमळे यांनी पालिकेत चार कर्मचाऱ्यांचे एक पथक अतिक्रमणावर देखरेख ठेवण्याकरिता नियुक्त केले. या पथकाद्वारे शहरातील काढलेले अतिक्रमण पुन्हा होणार नाही, याकडे लक्ष ठेवले जाणार आहे. शिवाय प्रत्येक सात दिवसांनी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी न.प. चे पाच व पोलीस विभागाचे दोन कर्मचारी असे सात लोकांचे फिरते पथक तयार केले. ९ फेबु्रवारीपासून बांधकाम विभाग, नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाद्वारे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये बुधवारी लिलाधर निखाडे, लोहवे, चहांदे, सोमवंशी यांच्यासह न.प. कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. ही मोहीम पूढे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)मोठ्या व्यावसायिकांच्याही हातगाड्याशहरात ठिकठिकाणी हातगाड्यांवर फळ, भाजी व अन्य वस्तूंची विक्री करणारे गरीब व्यावसायिक असावेत, असा बहुतांश नागरिकांचा समज असतो; पण तसे नाही. प्रत्यक्षात एक वा दोन मोठ्या व्यावसायिकांच्या या हातगाड्या असल्याचे नगर अभियंता फरसोले यांनी सांगितले. बजाज चौकात फळ, भाजीविक्री करणारे भाडेतत्वावर माल व बंडी घेतात. दिवसभर विक्री करून सायंकाळी संबंधित मालकास हिशेब देतात व मजुरी घेत असल्याचे समोर आले आहे. पालिकेकडून फेरीवाल्यांना ओळखपत्र दिले जात असताना ही बाब उघड झाली. यामुळे हा प्रकार आता बंद होणार आहे. शहरातील या हातगाड्यांचे अतिक्रमण हटविल्याने गरीबांच्या व्यवसायावर गदा येते, असे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते विक्रेते खरे विक्रेतेच नसल्याचेही फरसोले यांनी सांगितले.