शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी चौकातील अतिक्रमणावर गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:57 IST

शहरातील मुख्य मार्गावर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. या दुकानमालकांना अतिक्रमण काढण्याच्या अनेकवार नोटिसी बजावल्या; मात्र त्याकडे दुकानमालकांनी दुर्लक्ष केले.

ठळक मुद्देअनेकांना जागा मोकळी करण्याच्या सूचना : कारंजा येथे नगरपंचायतच्या ठरावानंतर हटविले अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील मुख्य मार्गावर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. या दुकानमालकांना अतिक्रमण काढण्याच्या अनेकवार नोटिसी बजावल्या; मात्र त्याकडे दुकानमालकांनी दुर्लक्ष केले. यामुळे अखेर पालिकेच्यावतीने शनिवारी अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली.पालिकेच्यावतीने आज सकाळी १० वाजताच्या सुमारास ही मोहीम रबविणे सुरू केले. प्रारंभी शिवाजी चौकात कारागृहाच्या भिंतीलगत असलेले अतिक्रमण काढण्यात आले आहे. यानंतर ही मोहीम शहरातील मुख्य मार्गाने बजाज चौक परिसराकडे वळली. यात ठाकरे मार्केट परिसरातील पानटपऱ्यांची छते काढण्यात आली. तर त्यांना टपऱ्या तत्काळ उचलण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. पण त्यांनी दुर्लक्ष केले.अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. या अतिक्रमणाला प्रारंभी काही व्यावसायिकांकडून विरोध करण्यात आला. या विरोधाला पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून बगल देण्यात आल्यानंतर अतिक्रमण काढण्यात आले. ही मोहीम आणखी काही दिवस राबविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली.यावेळी प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, नगर अभियंता सुधीर फरसोले, निखिल लोहवे, निलेश नंदनवार, अनुप अग्रवाल, विपीन गोटेकर, अशोक ठाकूर, चेतन खंदारे यांच्या पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.छोट्यांवरच कारवाई, मोठ्यांना बगलनगर परिषदेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना नेहमीच छोट्या व्यापाऱ्यांवरच कार्यवाही केली जाते. रस्त्याच्या कडेला दुकान लावून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांवरच गजराज चालविला जातो. शहरात अनेक मोठ्या व्यापाऱ्यांकडून पक्के अतिक्रमण केले आहे. याकडे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. ते अतिक्रमण काढताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून वेळ टाळली जाते, असा आरोप छोट्या व्यवसायिकांकडून यावेळी करण्यात आला. पालिकेच्यावतीने मोठ्या व्यापाºयांच्या अतिक्रमणावरही गजराज चालवावा अशी मागणी आहे.नागरिकांची गर्दीवर्दळीचा चौक असलेल्या शिवाजी चौक परिसरात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या अनेकांकडून ती पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला असला तरी या चौकात बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.स्वच्छ शहराकरिता मोहीमपालिकेच्यावतीने स्वच्छ शहर अभियान राबविले जात आहे. अभियानात अनेक ठिकाणी सौदर्यीकरण करण्यात येत आहे. या सौदर्यीकरणात ही दुकाने अडसर ठरत असल्याने ती काढण्यात येत असल्याची माहिती मोहिमेत सहभागी असलेल्या पालिकेच्या कर्मचाºयांकडून देण्यात आली. रोजगारावर गजराज चालवून कोणते सौदर्यीकरण करण्यात येईल, असा प्रश्न विचारल्या जात आहे.