शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

शिवाजी चौकातील अतिक्रमणावर गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:57 IST

शहरातील मुख्य मार्गावर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. या दुकानमालकांना अतिक्रमण काढण्याच्या अनेकवार नोटिसी बजावल्या; मात्र त्याकडे दुकानमालकांनी दुर्लक्ष केले.

ठळक मुद्देअनेकांना जागा मोकळी करण्याच्या सूचना : कारंजा येथे नगरपंचायतच्या ठरावानंतर हटविले अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील मुख्य मार्गावर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. या दुकानमालकांना अतिक्रमण काढण्याच्या अनेकवार नोटिसी बजावल्या; मात्र त्याकडे दुकानमालकांनी दुर्लक्ष केले. यामुळे अखेर पालिकेच्यावतीने शनिवारी अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली.पालिकेच्यावतीने आज सकाळी १० वाजताच्या सुमारास ही मोहीम रबविणे सुरू केले. प्रारंभी शिवाजी चौकात कारागृहाच्या भिंतीलगत असलेले अतिक्रमण काढण्यात आले आहे. यानंतर ही मोहीम शहरातील मुख्य मार्गाने बजाज चौक परिसराकडे वळली. यात ठाकरे मार्केट परिसरातील पानटपऱ्यांची छते काढण्यात आली. तर त्यांना टपऱ्या तत्काळ उचलण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. पण त्यांनी दुर्लक्ष केले.अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. या अतिक्रमणाला प्रारंभी काही व्यावसायिकांकडून विरोध करण्यात आला. या विरोधाला पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून बगल देण्यात आल्यानंतर अतिक्रमण काढण्यात आले. ही मोहीम आणखी काही दिवस राबविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली.यावेळी प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, नगर अभियंता सुधीर फरसोले, निखिल लोहवे, निलेश नंदनवार, अनुप अग्रवाल, विपीन गोटेकर, अशोक ठाकूर, चेतन खंदारे यांच्या पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.छोट्यांवरच कारवाई, मोठ्यांना बगलनगर परिषदेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना नेहमीच छोट्या व्यापाऱ्यांवरच कार्यवाही केली जाते. रस्त्याच्या कडेला दुकान लावून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांवरच गजराज चालविला जातो. शहरात अनेक मोठ्या व्यापाऱ्यांकडून पक्के अतिक्रमण केले आहे. याकडे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. ते अतिक्रमण काढताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून वेळ टाळली जाते, असा आरोप छोट्या व्यवसायिकांकडून यावेळी करण्यात आला. पालिकेच्यावतीने मोठ्या व्यापाºयांच्या अतिक्रमणावरही गजराज चालवावा अशी मागणी आहे.नागरिकांची गर्दीवर्दळीचा चौक असलेल्या शिवाजी चौक परिसरात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या अनेकांकडून ती पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला असला तरी या चौकात बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.स्वच्छ शहराकरिता मोहीमपालिकेच्यावतीने स्वच्छ शहर अभियान राबविले जात आहे. अभियानात अनेक ठिकाणी सौदर्यीकरण करण्यात येत आहे. या सौदर्यीकरणात ही दुकाने अडसर ठरत असल्याने ती काढण्यात येत असल्याची माहिती मोहिमेत सहभागी असलेल्या पालिकेच्या कर्मचाºयांकडून देण्यात आली. रोजगारावर गजराज चालवून कोणते सौदर्यीकरण करण्यात येईल, असा प्रश्न विचारल्या जात आहे.