शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

शिवाजी चौकातील अतिक्रमणावर गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:57 IST

शहरातील मुख्य मार्गावर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. या दुकानमालकांना अतिक्रमण काढण्याच्या अनेकवार नोटिसी बजावल्या; मात्र त्याकडे दुकानमालकांनी दुर्लक्ष केले.

ठळक मुद्देअनेकांना जागा मोकळी करण्याच्या सूचना : कारंजा येथे नगरपंचायतच्या ठरावानंतर हटविले अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील मुख्य मार्गावर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. या दुकानमालकांना अतिक्रमण काढण्याच्या अनेकवार नोटिसी बजावल्या; मात्र त्याकडे दुकानमालकांनी दुर्लक्ष केले. यामुळे अखेर पालिकेच्यावतीने शनिवारी अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली.पालिकेच्यावतीने आज सकाळी १० वाजताच्या सुमारास ही मोहीम रबविणे सुरू केले. प्रारंभी शिवाजी चौकात कारागृहाच्या भिंतीलगत असलेले अतिक्रमण काढण्यात आले आहे. यानंतर ही मोहीम शहरातील मुख्य मार्गाने बजाज चौक परिसराकडे वळली. यात ठाकरे मार्केट परिसरातील पानटपऱ्यांची छते काढण्यात आली. तर त्यांना टपऱ्या तत्काळ उचलण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. पण त्यांनी दुर्लक्ष केले.अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. या अतिक्रमणाला प्रारंभी काही व्यावसायिकांकडून विरोध करण्यात आला. या विरोधाला पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून बगल देण्यात आल्यानंतर अतिक्रमण काढण्यात आले. ही मोहीम आणखी काही दिवस राबविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली.यावेळी प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, नगर अभियंता सुधीर फरसोले, निखिल लोहवे, निलेश नंदनवार, अनुप अग्रवाल, विपीन गोटेकर, अशोक ठाकूर, चेतन खंदारे यांच्या पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.छोट्यांवरच कारवाई, मोठ्यांना बगलनगर परिषदेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना नेहमीच छोट्या व्यापाऱ्यांवरच कार्यवाही केली जाते. रस्त्याच्या कडेला दुकान लावून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांवरच गजराज चालविला जातो. शहरात अनेक मोठ्या व्यापाऱ्यांकडून पक्के अतिक्रमण केले आहे. याकडे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. ते अतिक्रमण काढताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून वेळ टाळली जाते, असा आरोप छोट्या व्यवसायिकांकडून यावेळी करण्यात आला. पालिकेच्यावतीने मोठ्या व्यापाºयांच्या अतिक्रमणावरही गजराज चालवावा अशी मागणी आहे.नागरिकांची गर्दीवर्दळीचा चौक असलेल्या शिवाजी चौक परिसरात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या अनेकांकडून ती पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला असला तरी या चौकात बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.स्वच्छ शहराकरिता मोहीमपालिकेच्यावतीने स्वच्छ शहर अभियान राबविले जात आहे. अभियानात अनेक ठिकाणी सौदर्यीकरण करण्यात येत आहे. या सौदर्यीकरणात ही दुकाने अडसर ठरत असल्याने ती काढण्यात येत असल्याची माहिती मोहिमेत सहभागी असलेल्या पालिकेच्या कर्मचाºयांकडून देण्यात आली. रोजगारावर गजराज चालवून कोणते सौदर्यीकरण करण्यात येईल, असा प्रश्न विचारल्या जात आहे.