शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

झोपड्यांवर चालला बांधकामचा गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 23:30 IST

येथील बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे.

ठळक मुद्देअतिक्रमण हटाव मोहीम : आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाचे रूंदीकरण प्रकरण

ऑनलाईन लोकमतवर्धा : येथील बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. या रुंदीकरणाच्या कामात सुमारे ४० कुटुंबियांच्या झोपड्या अडथळा निर्माण करीत असल्याचे कारण पुढे करीत बुधवारी सा.बां. विभागाने विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. अतिक्रमण धारकांनी स्वत:च आपले अतिक्रम काढावे अशी दवंडी व नोटीस यापूर्वी सा.बां.विभागाच्यावतीने झोपडी मालकांना बजावला होता; पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही मोहीम राबविण्यात आली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता महेश मोकलकर यांच्या नेतृत्त्वात सा.बा.विभागाची चमु जेसीबीसह बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुल परिसरात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पोहोचली. सुरूवातीला अतिक्रमण धारक नागरिकांकडून पहिले राहण्यासाठी जागा द्या नंतरच अतिक्रमण काढा अशी विनंती करण्यात आली. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी तुम्हाला न.प.ने स्मशानभूमी परिसरात जागा उपलब्ध करून दिली असून तेथे तूम्ही जावे, असे सांगितले. त्यानंतर तणावपूर्ण शांततेत व पोलीस बंदोबस्तात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली. दुपारपर्यंत सुमारे २५ झोपड्या सा.बा.विभागाच्या अधिकाºयांनी जेसीबीच्या सहाय्याने पाडल्या. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्यामुळे ही कारवाई दुपारी २ वाजताच्या सुमारास थांबविण्यात आली.टायर जाळून केला कारवाईचा निषेधबजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डापुलावर बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास काही तरुणांनी एकत्र येत टायर व कापूस जाळून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारवाईचा निषेध केला. याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जळत असलेला टायर व कापूस विजवून तो रस्त्याच्या कडेला केला. शिवाय खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.स्मशानभूमीलगतची जागा पंतप्रधान आवास योजनेसाठीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंतीला मान देत स्मशानभूमी परिसरातील जागा अतिक्रमण धारकांना देण्यासाठी न.प.ने मौखिक होकार दर्शविला आहे. सदर जागेवर पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पक्क घर बांधून देण्यासाठी वर्धा न.प.ने ठराव घेतला असल्याचे नगर परिषदेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर मोहिमेला ब्रेकअतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना अतिक्रमण धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी व अतिक्रमण धारक यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. चर्चेअंती येत्या पाच दिवसात अतिक्रमण धारकांनी स्वत:च अतिक्रमण काढावे या मुद्द्यावर होकार दर्शविल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेवरून बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात आली.तर पाच दिवसानंतर पुन्हा मोहीम राबविणारजिल्हाधिकाºयांच्या सुचनेवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी अतिक्रमण हटाव मोहीम थांबविली. येत्या पाच दिवसात अतिक्रमण धारकांनी स्वत:च अतिक्रमण न काढल्यास सा. बा. विभागातर्फे पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान आचार्य विनोबा भावे उड्डाणपुल परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली होती.