शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

झोपड्यांवर चालला बांधकामचा गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 23:30 IST

येथील बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे.

ठळक मुद्देअतिक्रमण हटाव मोहीम : आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाचे रूंदीकरण प्रकरण

ऑनलाईन लोकमतवर्धा : येथील बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. या रुंदीकरणाच्या कामात सुमारे ४० कुटुंबियांच्या झोपड्या अडथळा निर्माण करीत असल्याचे कारण पुढे करीत बुधवारी सा.बां. विभागाने विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. अतिक्रमण धारकांनी स्वत:च आपले अतिक्रम काढावे अशी दवंडी व नोटीस यापूर्वी सा.बां.विभागाच्यावतीने झोपडी मालकांना बजावला होता; पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही मोहीम राबविण्यात आली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता महेश मोकलकर यांच्या नेतृत्त्वात सा.बा.विभागाची चमु जेसीबीसह बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुल परिसरात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पोहोचली. सुरूवातीला अतिक्रमण धारक नागरिकांकडून पहिले राहण्यासाठी जागा द्या नंतरच अतिक्रमण काढा अशी विनंती करण्यात आली. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी तुम्हाला न.प.ने स्मशानभूमी परिसरात जागा उपलब्ध करून दिली असून तेथे तूम्ही जावे, असे सांगितले. त्यानंतर तणावपूर्ण शांततेत व पोलीस बंदोबस्तात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली. दुपारपर्यंत सुमारे २५ झोपड्या सा.बा.विभागाच्या अधिकाºयांनी जेसीबीच्या सहाय्याने पाडल्या. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्यामुळे ही कारवाई दुपारी २ वाजताच्या सुमारास थांबविण्यात आली.टायर जाळून केला कारवाईचा निषेधबजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डापुलावर बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास काही तरुणांनी एकत्र येत टायर व कापूस जाळून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारवाईचा निषेध केला. याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जळत असलेला टायर व कापूस विजवून तो रस्त्याच्या कडेला केला. शिवाय खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.स्मशानभूमीलगतची जागा पंतप्रधान आवास योजनेसाठीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंतीला मान देत स्मशानभूमी परिसरातील जागा अतिक्रमण धारकांना देण्यासाठी न.प.ने मौखिक होकार दर्शविला आहे. सदर जागेवर पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पक्क घर बांधून देण्यासाठी वर्धा न.प.ने ठराव घेतला असल्याचे नगर परिषदेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर मोहिमेला ब्रेकअतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना अतिक्रमण धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी व अतिक्रमण धारक यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. चर्चेअंती येत्या पाच दिवसात अतिक्रमण धारकांनी स्वत:च अतिक्रमण काढावे या मुद्द्यावर होकार दर्शविल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेवरून बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात आली.तर पाच दिवसानंतर पुन्हा मोहीम राबविणारजिल्हाधिकाºयांच्या सुचनेवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी अतिक्रमण हटाव मोहीम थांबविली. येत्या पाच दिवसात अतिक्रमण धारकांनी स्वत:च अतिक्रमण न काढल्यास सा. बा. विभागातर्फे पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान आचार्य विनोबा भावे उड्डाणपुल परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली होती.