शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

आधुनिकतेच्या गर्तेत गारुडी आणि मदारी झाले दिसेनासे

By admin | Updated: October 27, 2015 03:17 IST

कामाच्या धावपळीत विरंगुळा म्हणून मनोरंजन हा घटक मानवी जीवनात अविभाज्य राहिला आहे. कालानुरुप मनोरंजनाच्या

वर्धा : कामाच्या धावपळीत विरंगुळा म्हणून मनोरंजन हा घटक मानवी जीवनात अविभाज्य राहिला आहे. कालानुरुप मनोरंजनाच्या साधनात बदल होत गेले. याचा परिणाम म्हणून मनोरंजनाची पूर्वीची अनेक साधने पडद्याआड गेलेली पाहायला मिळतात. शहरातील चौकात होणारे मदारीचे खेळ आता दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे यावर उदरनिर्वाह करणारे कुटुंब उघड्यावर आले आहे. आधुनिक युगात सतत होणाऱ्या बदलाने अनेकांची पोट भरण्याची साधने हिरावली गेल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे त्यांना नवीन पर्याय शोधावा लागला आहे. शासनाकडून या घटकांकरिता विविध योजना आखण्यात आल्या आहे. वन्यप्राणी संरक्षण कायद्यान्वये माकडे, साप, अस्वले असे प्राणी बाळगणे गुन्हा असल्याने यावर आधारित पारंपरिक व्यवसाय करणारे गारुडी, मदारी आज दिसेनासे झाले आहेत.थ्रीजी, फोरजीच्या या काळात अगदी लहानपणापासून मोबाईल हाताळणाऱ्या बच्चे कंपनीस हे गारुडी, मदारी चित्रातच पाहावे लागत आहेत. काही वर्षापूर्वी गारुडी साप-मुंगसाच्या लढाईत पे्रक्षकांना खिळवून ठेवायचा. तद्वतच मदारी डमरुच्या डुबू-डुबूच्या तालावर ‘मै मयके नही जाऊंगी’ या गाण्यावर माकड-माकडीणीेंचे नृत्य निखळ मनोरंजन करायचे. पूर्वी गावखेड्यात मनोरंजनाकरिता रेडिओ, कृष्णधवल टीव्ही संचासह गावात अधुनमधून येणारे गारुडी, मदारी, बहुरुपी गावात येऊन ग्रामस्थांचे मनोरंजन करायचे. गारुडी आला की गावात एकच गर्दी जमायची. गारुडी त्याच्याकडे असलेले छोटे-मोठे साप, मुंगुस याचे खेळ दाखवित. एकंदरीत गारुडी, मदारी गावकऱ्यांच्या मनोरंजनाचे दुवे होते. मात्र हे खेळे आता ग्रामीण भागातून नामशेष होत असल्याचे दिसते.वर्षभर गावखेड्यात भटकंती करुन लोकांचे मनोरंजन करुन त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. वािर्षक जत्रेमध्ये मदारीची उपस्थिती असत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पूर्वींची मनोरंजनाची साधने कालबाह्य ठरली. या ही कुटुंब उघड्यावर आल्याचे दिसते.(स्थानिक प्रतिनिधी)