शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आधुनिकतेच्या गर्तेत गारुडी आणि मदारी झाले दिसेनासे

By admin | Updated: October 27, 2015 03:17 IST

कामाच्या धावपळीत विरंगुळा म्हणून मनोरंजन हा घटक मानवी जीवनात अविभाज्य राहिला आहे. कालानुरुप मनोरंजनाच्या

वर्धा : कामाच्या धावपळीत विरंगुळा म्हणून मनोरंजन हा घटक मानवी जीवनात अविभाज्य राहिला आहे. कालानुरुप मनोरंजनाच्या साधनात बदल होत गेले. याचा परिणाम म्हणून मनोरंजनाची पूर्वीची अनेक साधने पडद्याआड गेलेली पाहायला मिळतात. शहरातील चौकात होणारे मदारीचे खेळ आता दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे यावर उदरनिर्वाह करणारे कुटुंब उघड्यावर आले आहे. आधुनिक युगात सतत होणाऱ्या बदलाने अनेकांची पोट भरण्याची साधने हिरावली गेल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे त्यांना नवीन पर्याय शोधावा लागला आहे. शासनाकडून या घटकांकरिता विविध योजना आखण्यात आल्या आहे. वन्यप्राणी संरक्षण कायद्यान्वये माकडे, साप, अस्वले असे प्राणी बाळगणे गुन्हा असल्याने यावर आधारित पारंपरिक व्यवसाय करणारे गारुडी, मदारी आज दिसेनासे झाले आहेत.थ्रीजी, फोरजीच्या या काळात अगदी लहानपणापासून मोबाईल हाताळणाऱ्या बच्चे कंपनीस हे गारुडी, मदारी चित्रातच पाहावे लागत आहेत. काही वर्षापूर्वी गारुडी साप-मुंगसाच्या लढाईत पे्रक्षकांना खिळवून ठेवायचा. तद्वतच मदारी डमरुच्या डुबू-डुबूच्या तालावर ‘मै मयके नही जाऊंगी’ या गाण्यावर माकड-माकडीणीेंचे नृत्य निखळ मनोरंजन करायचे. पूर्वी गावखेड्यात मनोरंजनाकरिता रेडिओ, कृष्णधवल टीव्ही संचासह गावात अधुनमधून येणारे गारुडी, मदारी, बहुरुपी गावात येऊन ग्रामस्थांचे मनोरंजन करायचे. गारुडी आला की गावात एकच गर्दी जमायची. गारुडी त्याच्याकडे असलेले छोटे-मोठे साप, मुंगुस याचे खेळ दाखवित. एकंदरीत गारुडी, मदारी गावकऱ्यांच्या मनोरंजनाचे दुवे होते. मात्र हे खेळे आता ग्रामीण भागातून नामशेष होत असल्याचे दिसते.वर्षभर गावखेड्यात भटकंती करुन लोकांचे मनोरंजन करुन त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. वािर्षक जत्रेमध्ये मदारीची उपस्थिती असत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पूर्वींची मनोरंजनाची साधने कालबाह्य ठरली. या ही कुटुंब उघड्यावर आल्याचे दिसते.(स्थानिक प्रतिनिधी)