शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

आधुनिकतेच्या गर्तेत गारुडी आणि मदारी झाले दिसेनासे

By admin | Updated: October 27, 2015 03:17 IST

कामाच्या धावपळीत विरंगुळा म्हणून मनोरंजन हा घटक मानवी जीवनात अविभाज्य राहिला आहे. कालानुरुप मनोरंजनाच्या

वर्धा : कामाच्या धावपळीत विरंगुळा म्हणून मनोरंजन हा घटक मानवी जीवनात अविभाज्य राहिला आहे. कालानुरुप मनोरंजनाच्या साधनात बदल होत गेले. याचा परिणाम म्हणून मनोरंजनाची पूर्वीची अनेक साधने पडद्याआड गेलेली पाहायला मिळतात. शहरातील चौकात होणारे मदारीचे खेळ आता दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे यावर उदरनिर्वाह करणारे कुटुंब उघड्यावर आले आहे. आधुनिक युगात सतत होणाऱ्या बदलाने अनेकांची पोट भरण्याची साधने हिरावली गेल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे त्यांना नवीन पर्याय शोधावा लागला आहे. शासनाकडून या घटकांकरिता विविध योजना आखण्यात आल्या आहे. वन्यप्राणी संरक्षण कायद्यान्वये माकडे, साप, अस्वले असे प्राणी बाळगणे गुन्हा असल्याने यावर आधारित पारंपरिक व्यवसाय करणारे गारुडी, मदारी आज दिसेनासे झाले आहेत.थ्रीजी, फोरजीच्या या काळात अगदी लहानपणापासून मोबाईल हाताळणाऱ्या बच्चे कंपनीस हे गारुडी, मदारी चित्रातच पाहावे लागत आहेत. काही वर्षापूर्वी गारुडी साप-मुंगसाच्या लढाईत पे्रक्षकांना खिळवून ठेवायचा. तद्वतच मदारी डमरुच्या डुबू-डुबूच्या तालावर ‘मै मयके नही जाऊंगी’ या गाण्यावर माकड-माकडीणीेंचे नृत्य निखळ मनोरंजन करायचे. पूर्वी गावखेड्यात मनोरंजनाकरिता रेडिओ, कृष्णधवल टीव्ही संचासह गावात अधुनमधून येणारे गारुडी, मदारी, बहुरुपी गावात येऊन ग्रामस्थांचे मनोरंजन करायचे. गारुडी आला की गावात एकच गर्दी जमायची. गारुडी त्याच्याकडे असलेले छोटे-मोठे साप, मुंगुस याचे खेळ दाखवित. एकंदरीत गारुडी, मदारी गावकऱ्यांच्या मनोरंजनाचे दुवे होते. मात्र हे खेळे आता ग्रामीण भागातून नामशेष होत असल्याचे दिसते.वर्षभर गावखेड्यात भटकंती करुन लोकांचे मनोरंजन करुन त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. वािर्षक जत्रेमध्ये मदारीची उपस्थिती असत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पूर्वींची मनोरंजनाची साधने कालबाह्य ठरली. या ही कुटुंब उघड्यावर आल्याचे दिसते.(स्थानिक प्रतिनिधी)