शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील गाळामुळे शेतशिवार होतेय सुपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 21:51 IST

येथील मत्स्यबीज केंद्राच्या तलावाला गाळमुक्त केले जात आहे. हे काम गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून होत आहे. या भागातील शेतकरी सदर उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तलावातील गाळ शेतात टाकून शेतजमीन सुपीक करीत आहेत.

ठळक मुद्देशेणखतावरील खर्चाची बचत : ‘गाळयुक्त’ला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संघर्ष जाधव।लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : येथील मत्स्यबीज केंद्राच्या तलावाला गाळमुक्त केले जात आहे. हे काम गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून होत आहे. या भागातील शेतकरी सदर उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तलावातील गाळ शेतात टाकून शेतजमीन सुपीक करीत आहेत. तलावातील गाळ शेतात टाकल्या जात असल्याने शेणखतावर होणाऱ्या चर्चाची बचत होत आहे.तलाव आणि धरण आदी जलाशयांमधील गाळ शेतजमिनीची पोत वाढविण्यासाठी फायद्याचा ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तलाव गाळमुक्त होत त्याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ व्हावी तसेच तलावातील गाळ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात टाकून शेतजमिनीची पोत सुधारावी या उद्देशाने शासनाच्यावतीने गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. याच योजनेच्या माध्यमातून यंदा येथील मत्स्यबिज केंद्राचा तलाव गाळमुक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या तलाव गाळमुक्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून सदर गाळ या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात वाहून नेत आहेत. या तलावातून काढण्यात येणार गाळ परिसरातील शेतकऱ्यांनी न्यावा असे आवाहन तहसीलदारांसह इतर बड्या अधिकाऱ्यांनी सुरूवातीला केले होते. त्याच्या आवाहनाला केळझर व परिसरातील शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या मिळत आहे.पैशाची होतेय बचतसध्या शेणखताचे भाव प्रति ट्रॅक्टर दोन ते अडीच हजार रुपये आहे. तर या तलावातील गाळ वाहून नेण्यासाठी ५०० ते ६०० रुपये खर्च येत आहे. त्यामुळे तलावातील गाळ टाकण्याला शेतकरी प्राधान्य देत असून त्यामुळे त्यांच्या पैशाची बचत होत आहे. तलावातील गाळामुळे परिसरातील शेतशिवार गाळयुक्त होत आहे.सकाळपासून लागते मालवाहूच्या रांगातलावातील गाळ सध्या युद्धपातळीवर काढल्या जात आहे. तलाव गाळमुक्त झाल्यास त्यांच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार आहे. असे असले तरी तलावातील गाळ नेण्यासाठी येथे दररोज सकाळपासूनच ट्रक, ट्रॅक्टर या मालवाहू वाहनांच्या रांगात लागत असल्याचे बघावयास मिळते. विशेष म्हणजे जेसीबीच्या साहाय्याने सध्या गाळ काढला जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती