शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

शेतकरी व पशुपालकांसाठी मोफत कार्यशाळा

By admin | Updated: May 28, 2017 00:31 IST

गौतीर्थचे शैलेश अग्रवाल यांच्यावतीने १ ते २५ मे या कालावधीत शेतकऱ्यांकरिता विशेष मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली.

चारा पिकांचे बेणे, थोम्बे व बियाण्यांचे मोफत वाटप : गौतीर्थ आर्वी येथील उपक्रम, शेतकऱ्यांना मार्गदर्शन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गौतीर्थचे शैलेश अग्रवाल यांच्यावतीने १ ते २५ मे या कालावधीत शेतकऱ्यांकरिता विशेष मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली. आर्वी, आष्टी, कारंजा, वरूड व मोर्शी येथील या शिबिरांत ४ हजार ३७२ पशुपालकांना गौतीर्थ येथील चाराबागेत डॉ. सानप व सहकाऱ्यांद्वारे उत्पादित चारा पिकांचे बेणे, थोम्बे व बियाण्यांचे मोफत वाटप केले. यावेळी पं.स. गटविकास अधिकारी मरबड आष्टी, पवार आर्वी तसेच रोहणा, आष्टी, कारंजा, अमरावती, पुणे व मुंबई येथील तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. पशुपालकाचे फायदे व त्यातून मिळणारा नफा शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून अग्रवाल यांनी गौतीर्थ या प्रकल्पाची स्थापना केली. तेथे संपूर्ण महाराष्ट्र, कोंकण व गोवा येथील शेतकरी व पशुपालक भेटी देत आहे. प्रकल्पाला भेट देणाऱ्या शेतकरी, पशुपालकांसाठी नियमित लघु कार्यशाळांचे आयोजन केले जाते. आगंतुकांना अग्रवाल यांच्याकडून सेंद्रीय शेती, पशुपालन अर्थशास्त्राची माहिती दिली जाते. शासकीय यंत्रणेतील अधिकारीही या कार्यशाळांत शेतकरी, पशुपालकांना मार्गदर्शन करतात. आर्वीच्या बीडीओ पवार शेती, पशुसंवर्धन, शैक्षणिक, महिला व शेतकरी सक्षमीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रगतीतील समस्या व उपाययोजना यावर मार्गदर्शन करीत आहे. पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सचिन सानप, सहकारी डॉ. दिवाकर काळे, डॉ. प्रशांत कदम कार्यशाळांत डेयरी फार्मिंग, पशुपालन यांचे फायदे, पशू आरोग्य व दैनंदिन पशू व्यवस्थापन आदींवर मार्गदर्शन करतात. शिवाय अनेक कृषी तज्ज्ञांनी कार्यशाळांत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीवर भर देणे काळाची गरज आहे. निसर्गात सर्व सजीवसृष्टी जगण्याची एक साखळी आहे. समृद्ध पोषणातून ही अन्नसाखळी जपली जाते; पण अधिक उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात ही साखळीच नष्ट झाली. माती हे पिकांना पोषणतत्व पुरविण्याचे माध्यम आहे. रासायनिक खताच्या अतिरेकी वापराने मातीतील हे पोषणत्वच कमी होत आहे. रोग, किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी निसर्गात मित्र व शत्रुकिडी उपलब्ध आहे; पण त्याचा शास्त्रशुद्ध वापर न केल्याने ही साखळी उद्ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांचे परावलंबित्व कमी करण्यासाठी धोरण निश्चित केले पाहिजे. सेंद्रीय शेती व पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेण्याची व्यवस्था अग्रवाल यांच्या गौतीर्थ प्रकल्पस्थळी केली आहे. जीवामृत, गांडूळ खत निर्मिती आदी शेतकऱ्यांच्या शेतात उपलब्ध साधन सामुग्रीचा कसा वापर करावा, याचे ज्ञान नव्याने सांगण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतपिकांच्या वाढ व उत्पन्नाचे प्रात्यक्षिक दाखविण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे. गौतीर्थ प्रकल्पात गीर, गवळाऊ, साहिवाल, हरियाणा, थारपारकर, राठी, होलस्टन, फ्रइसेन, आफ्रिकन फ्रइसेन व आईर्षाइर आदी प्रजातीच्या गायी आहे. हिरव्या वैरण बागेत मका, बरसीम, मेथी, शेवरी, नेपियर, बाजरी, मकचारी, ज्वारी, लसूणघास, पॅरागवत, ओट, चवळी, दीनानाथ गवत, गिनी गवत, न्यूट्रिफिड आदी हिरवा चारा तर सुबाभूळ, गिरीपुष्प व इतर झाडचारा आहे. औद्योगिक दृष्टीकोणातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीचे अग्रवाल यांच्या प्रयत्नाचे बीडीओ मरबड व उपस्थितांनी कौतुक केले.