शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी व पशुपालकांसाठी मोफत कार्यशाळा

By admin | Updated: May 28, 2017 00:31 IST

गौतीर्थचे शैलेश अग्रवाल यांच्यावतीने १ ते २५ मे या कालावधीत शेतकऱ्यांकरिता विशेष मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली.

चारा पिकांचे बेणे, थोम्बे व बियाण्यांचे मोफत वाटप : गौतीर्थ आर्वी येथील उपक्रम, शेतकऱ्यांना मार्गदर्शन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गौतीर्थचे शैलेश अग्रवाल यांच्यावतीने १ ते २५ मे या कालावधीत शेतकऱ्यांकरिता विशेष मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली. आर्वी, आष्टी, कारंजा, वरूड व मोर्शी येथील या शिबिरांत ४ हजार ३७२ पशुपालकांना गौतीर्थ येथील चाराबागेत डॉ. सानप व सहकाऱ्यांद्वारे उत्पादित चारा पिकांचे बेणे, थोम्बे व बियाण्यांचे मोफत वाटप केले. यावेळी पं.स. गटविकास अधिकारी मरबड आष्टी, पवार आर्वी तसेच रोहणा, आष्टी, कारंजा, अमरावती, पुणे व मुंबई येथील तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. पशुपालकाचे फायदे व त्यातून मिळणारा नफा शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून अग्रवाल यांनी गौतीर्थ या प्रकल्पाची स्थापना केली. तेथे संपूर्ण महाराष्ट्र, कोंकण व गोवा येथील शेतकरी व पशुपालक भेटी देत आहे. प्रकल्पाला भेट देणाऱ्या शेतकरी, पशुपालकांसाठी नियमित लघु कार्यशाळांचे आयोजन केले जाते. आगंतुकांना अग्रवाल यांच्याकडून सेंद्रीय शेती, पशुपालन अर्थशास्त्राची माहिती दिली जाते. शासकीय यंत्रणेतील अधिकारीही या कार्यशाळांत शेतकरी, पशुपालकांना मार्गदर्शन करतात. आर्वीच्या बीडीओ पवार शेती, पशुसंवर्धन, शैक्षणिक, महिला व शेतकरी सक्षमीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रगतीतील समस्या व उपाययोजना यावर मार्गदर्शन करीत आहे. पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सचिन सानप, सहकारी डॉ. दिवाकर काळे, डॉ. प्रशांत कदम कार्यशाळांत डेयरी फार्मिंग, पशुपालन यांचे फायदे, पशू आरोग्य व दैनंदिन पशू व्यवस्थापन आदींवर मार्गदर्शन करतात. शिवाय अनेक कृषी तज्ज्ञांनी कार्यशाळांत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीवर भर देणे काळाची गरज आहे. निसर्गात सर्व सजीवसृष्टी जगण्याची एक साखळी आहे. समृद्ध पोषणातून ही अन्नसाखळी जपली जाते; पण अधिक उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात ही साखळीच नष्ट झाली. माती हे पिकांना पोषणतत्व पुरविण्याचे माध्यम आहे. रासायनिक खताच्या अतिरेकी वापराने मातीतील हे पोषणत्वच कमी होत आहे. रोग, किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी निसर्गात मित्र व शत्रुकिडी उपलब्ध आहे; पण त्याचा शास्त्रशुद्ध वापर न केल्याने ही साखळी उद्ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांचे परावलंबित्व कमी करण्यासाठी धोरण निश्चित केले पाहिजे. सेंद्रीय शेती व पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेण्याची व्यवस्था अग्रवाल यांच्या गौतीर्थ प्रकल्पस्थळी केली आहे. जीवामृत, गांडूळ खत निर्मिती आदी शेतकऱ्यांच्या शेतात उपलब्ध साधन सामुग्रीचा कसा वापर करावा, याचे ज्ञान नव्याने सांगण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतपिकांच्या वाढ व उत्पन्नाचे प्रात्यक्षिक दाखविण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे. गौतीर्थ प्रकल्पात गीर, गवळाऊ, साहिवाल, हरियाणा, थारपारकर, राठी, होलस्टन, फ्रइसेन, आफ्रिकन फ्रइसेन व आईर्षाइर आदी प्रजातीच्या गायी आहे. हिरव्या वैरण बागेत मका, बरसीम, मेथी, शेवरी, नेपियर, बाजरी, मकचारी, ज्वारी, लसूणघास, पॅरागवत, ओट, चवळी, दीनानाथ गवत, गिनी गवत, न्यूट्रिफिड आदी हिरवा चारा तर सुबाभूळ, गिरीपुष्प व इतर झाडचारा आहे. औद्योगिक दृष्टीकोणातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीचे अग्रवाल यांच्या प्रयत्नाचे बीडीओ मरबड व उपस्थितांनी कौतुक केले.