शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

शेतकरी व पशुपालकांसाठी मोफत कार्यशाळा

By admin | Updated: May 28, 2017 00:31 IST

गौतीर्थचे शैलेश अग्रवाल यांच्यावतीने १ ते २५ मे या कालावधीत शेतकऱ्यांकरिता विशेष मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली.

चारा पिकांचे बेणे, थोम्बे व बियाण्यांचे मोफत वाटप : गौतीर्थ आर्वी येथील उपक्रम, शेतकऱ्यांना मार्गदर्शन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गौतीर्थचे शैलेश अग्रवाल यांच्यावतीने १ ते २५ मे या कालावधीत शेतकऱ्यांकरिता विशेष मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली. आर्वी, आष्टी, कारंजा, वरूड व मोर्शी येथील या शिबिरांत ४ हजार ३७२ पशुपालकांना गौतीर्थ येथील चाराबागेत डॉ. सानप व सहकाऱ्यांद्वारे उत्पादित चारा पिकांचे बेणे, थोम्बे व बियाण्यांचे मोफत वाटप केले. यावेळी पं.स. गटविकास अधिकारी मरबड आष्टी, पवार आर्वी तसेच रोहणा, आष्टी, कारंजा, अमरावती, पुणे व मुंबई येथील तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. पशुपालकाचे फायदे व त्यातून मिळणारा नफा शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून अग्रवाल यांनी गौतीर्थ या प्रकल्पाची स्थापना केली. तेथे संपूर्ण महाराष्ट्र, कोंकण व गोवा येथील शेतकरी व पशुपालक भेटी देत आहे. प्रकल्पाला भेट देणाऱ्या शेतकरी, पशुपालकांसाठी नियमित लघु कार्यशाळांचे आयोजन केले जाते. आगंतुकांना अग्रवाल यांच्याकडून सेंद्रीय शेती, पशुपालन अर्थशास्त्राची माहिती दिली जाते. शासकीय यंत्रणेतील अधिकारीही या कार्यशाळांत शेतकरी, पशुपालकांना मार्गदर्शन करतात. आर्वीच्या बीडीओ पवार शेती, पशुसंवर्धन, शैक्षणिक, महिला व शेतकरी सक्षमीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रगतीतील समस्या व उपाययोजना यावर मार्गदर्शन करीत आहे. पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सचिन सानप, सहकारी डॉ. दिवाकर काळे, डॉ. प्रशांत कदम कार्यशाळांत डेयरी फार्मिंग, पशुपालन यांचे फायदे, पशू आरोग्य व दैनंदिन पशू व्यवस्थापन आदींवर मार्गदर्शन करतात. शिवाय अनेक कृषी तज्ज्ञांनी कार्यशाळांत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीवर भर देणे काळाची गरज आहे. निसर्गात सर्व सजीवसृष्टी जगण्याची एक साखळी आहे. समृद्ध पोषणातून ही अन्नसाखळी जपली जाते; पण अधिक उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात ही साखळीच नष्ट झाली. माती हे पिकांना पोषणतत्व पुरविण्याचे माध्यम आहे. रासायनिक खताच्या अतिरेकी वापराने मातीतील हे पोषणत्वच कमी होत आहे. रोग, किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी निसर्गात मित्र व शत्रुकिडी उपलब्ध आहे; पण त्याचा शास्त्रशुद्ध वापर न केल्याने ही साखळी उद्ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांचे परावलंबित्व कमी करण्यासाठी धोरण निश्चित केले पाहिजे. सेंद्रीय शेती व पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेण्याची व्यवस्था अग्रवाल यांच्या गौतीर्थ प्रकल्पस्थळी केली आहे. जीवामृत, गांडूळ खत निर्मिती आदी शेतकऱ्यांच्या शेतात उपलब्ध साधन सामुग्रीचा कसा वापर करावा, याचे ज्ञान नव्याने सांगण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतपिकांच्या वाढ व उत्पन्नाचे प्रात्यक्षिक दाखविण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे. गौतीर्थ प्रकल्पात गीर, गवळाऊ, साहिवाल, हरियाणा, थारपारकर, राठी, होलस्टन, फ्रइसेन, आफ्रिकन फ्रइसेन व आईर्षाइर आदी प्रजातीच्या गायी आहे. हिरव्या वैरण बागेत मका, बरसीम, मेथी, शेवरी, नेपियर, बाजरी, मकचारी, ज्वारी, लसूणघास, पॅरागवत, ओट, चवळी, दीनानाथ गवत, गिनी गवत, न्यूट्रिफिड आदी हिरवा चारा तर सुबाभूळ, गिरीपुष्प व इतर झाडचारा आहे. औद्योगिक दृष्टीकोणातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीचे अग्रवाल यांच्या प्रयत्नाचे बीडीओ मरबड व उपस्थितांनी कौतुक केले.