शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

रस्ते घेताहेत मोकळा श्वास

By admin | Updated: April 5, 2015 02:01 IST

सध्या शहरातील काही रस्ते मोकळे, विस्तारलेले दिसत आहेत़ हे रस्ते खरच एवढे रूंद होते काय, यावर आता कुठे विश्वास बसायला लागला आहे.

हेमंत चंदनखेडे हिंगणघाटसध्या शहरातील काही रस्ते मोकळे, विस्तारलेले दिसत आहेत़ हे रस्ते खरच एवढे रूंद होते काय, यावर आता कुठे विश्वास बसायला लागला आहे. अतिक्रमण हटविल्याने रस्त्यालगतचा भाग मोकळा झाला आणि वाहतुकीला जागा उपलब्ध झाली. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील रस्ते मोकळा श्वास घेत आहे़ महानगराप्रमाणे हे रस्ते रूंद दिसत असले तरी हे क्षणिक तर राहणार नाही ना, अशी शंकाही व्यक्त होत आहे़शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली़ यात अतिक्रमण काढल्यानंतर त्यावर कुठलीही प्रतिबंधात्मक योजना, आराखडा नगर परिषदेने तयार केला नाही़ यामुळे नेहमीप्रमाणे यंदाही तेच घडणार असल्याची शक्यता बळावली आहे. नियमित देखरेख करणाऱ्या दक्षता पथकासारखी यंत्रणा कार्यान्वित करून यावर उपाययोजना करणे गरजेचे होते; पण तसे काहीही केल्याचे दिसून येत नाही़ शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी, विद्रुपीकरण कमी व्हावे, अरूंद रस्त्यांचे रूंदीकरण करून शहरातील वाहतूक व्यवस्थेला होणारा अडथळा दूर करता यावे, यासाठी म्हणत ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली; पण प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाही़ यामुळे दरवेळप्रमाणे यावेळीही गाजावाजाच मोठा झाला. अतिक्रमणात अनेकांचा रोजगार हिरावला गेला, दुकानांची मोडतोड झाली, अनेकांच्या संपत्तीचे नुकसान झाले़ पालिकेच्या नावावर मोहिमेचे यश जमा झाले; पण त्यापासून जनतेला काय फायदा व किती नुकसान झाले, हे तपासणे गरजेचे झाले आहे़ २४ ते २६ मार्च दरम्यान शहरात अतिक्रमणाची हटविण्याची मोहीम चालली. तीनच दिवसांचे पोलीस संरक्षण असल्याने पूढे मोहीम थांबली; पण ते सांणग्याचे धारिष्ठ्य पालिकेने दाखविले नाही़ यामुळे सारेच संभ्रमात होते. ही मोहीम मधेच थांबल्याने चर्चेला उधान आल्याचे दिसते़ अतिक्रमण हटविल्यानंतर पुढे काय?, नागरिक संभ्रमात२० ते २५ वर्षे जुने अतिक्रमण हटविले गेले असून शहरातील एक हजार लोकांची आस्थापने प्रभावित झाली़ रोजगार गेला, आर्थिक नुकसान झाले. कुटुंब कसे चालवावे या विंवचनेत दिवस जात असून पालिकेची कोणतीही योजना त्यांच्या मदतीला दिसत नाही़ शहरात अनेक ठिकाणी खुल्या जागा आहे़ तेथे झोन निर्माण करून त्यांना जागा उपलब्ध करता येते. वाहतुकीला बाधा पोहचणार नाही, अशा जागा निवडून नियोजन, आराखडा व थोडी तरतूद करून ही गरज पूर्ण होऊ शकते़ पालिकेचे दुकान गाळे बांधून तयार आहे; पण त्याचे वाटप झाले नाही. तेही यासाठी विचारात घेण्यासारखे निश्चित आहे; पण योजना नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे़शहरातील विकास कार्येशहरात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे सुरू आहे. पालिकेच्यावतीने विविध शासकीय योजनेंतर्गत कोट्यवधींची कामे होत आहे़ यात शहरातील प्रमुख रस्त्यांचे बांधकाम, रूंदीकरण, डांबरीकरण, दुतर्फा नाल्यांचे बांधकाम आदींचा समावेश आहे़ गत दहा वर्षांत प्रथमच विकास कामे दिसू लागलीत़ वाढीव लोकसंख्येनुसार शहर वाहतुकीचे योग्य नियोजन व व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा येथे आहे. पोलीस प्रशासन अपूऱ्या कर्मचाऱ्यांचे कारण देत गत कित्येक वर्षे वेळ काढत आहे. याची ठोस मागणीही दिसून येत नाही़आठवडी बाजारात वाहतूक समस्याभाजीबाजार तर आठवडी बाजाराचे मैदान सोडून थेट वाहतुकीच्या रस्त्यावर आला असून तेथे वाहतुकीची गंभीर समस्या उत्पन्न झाली आहे़ जुन्या वस्तीतील नागरिक दररोज तक्रारी घेऊन पालिकेकडे जातात; पण गत एक ते दीड वर्षांपासून त्यांना आश्वासनाशिवाय काही मिळत नाही. दररोज थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ काढली जात असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांनी तक्रार केली असता वाहतूक पोलीस केवळ एक-दोन दिवस येऊन थातूरमातूर कारवाई दाखवून पुन्हा पूढील तक्रार येईपर्यंत गायब होतात. ही तकलादू व्यवस्था किती दिवस चालणार, जनसामान्यांना ठोस कृती मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे़आमचा रस्ता कुठे आहेजुन्या वस्तीतील नागरिकांना श्रीराम टॉकीज ते अभ्यंकर शाळा या रस्त्याने ये-जा करावी लागते; पण या रस्त्यावर भाजीबाजार आल्याने त्यांना तेथे रस्ताच समस्या बनला आहे. आपली वाहने घरापर्यंत कशी न्यावी, ही समस्या वेळोवेळी निर्माण होत असून त्यांना आमचा रस्ता द्या हो, असे म्हणण्याची वेळ आली आहे. या भागातील विद्यमान नगरसेवकाने तर पालिकेला आमचा रस्ता आहे तरी कुठे, असा सवाल केला आहे़ त्याचे उत्तर पालिकेजवळ नाही.