शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

चार प्रकल्पांनी गाठला तळ

By admin | Updated: March 3, 2016 02:04 IST

जिल्ह्यात यंदाच्या सत्रात सरासरीच्या तुलनेत पुरेपूर पाऊस आला असला तरी पावसात सातत्याचा अभाव होता.

चाहुल पाणी संकटाची : लघु प्रकल्पाची स्थितीही नाजूकवर्धा : जिल्ह्यात यंदाच्या सत्रात सरासरीच्या तुलनेत पुरेपूर पाऊस आला असला तरी पावसात सातत्याचा अभाव होता. यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पूर्णत: भरले नसल्याचे दिसून येते. परिणामी, उन्हाळ्याच्या प्रारंभीच चार जलाशयांनी तळ गाठल्याचे समोर आले आहे. यात पोथरा, डोंगरगाव, पंचधारा व मदन उन्नई या चार जलसाठ्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त छोट्या प्रकल्पांची स्थितीही तशीच आहे.जिल्ह्यात एकूण १५ प्रकल्पांच्या जलाशयाची पातळी नोंदविली जाते. यातील मोजक्याच प्रकल्पाचे पाणी जिल्ह्याच्या उपयोगी पडत असल्याचे सांगण्यात येते. या १५ जलाशयांमध्ये आजच्या घडीला केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामुळे येत्या दिवसांत जिल्ह्यात पाण्याची समस्या अधिक तीव्र होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. १५ प्रकल्प व २० तलावांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांची तहाण भागविली जात असून सिंचन व औद्योगिक वापराकरिता पाणी दिले जाते. या धरणात असलेल्या जलसाठ्याच्या आधारावर जिल्ह्याचे सिंचन, पिण्याचे पाणी आणि कारखान्यांना मिळणारे पाणी अवलंबून आहे. या बाबींकरिता जलसाठा आरक्षित असल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले असले तरी तळाला जात असलेल्या जलसाठ्यामुळे चिंता वाढली आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर करताना सतर्क राहण्याची वेळ आली आहे. पाण्याचा अतिरिक्त होत असलेला वापर टाळण्याची गरज यातून निर्माण झाली आहे. याचा विचार नागरिकांनीच करण्याची वेळ आली आहे.(प्रतिनिधी)छोट्या प्रकल्पांत २३.४३ टक्के जलसाठाजिल्ह्यात एकूण २० लघुप्रकल्प आहेत. यातील पाणी यंदाच्या वर्षात मार्च महिन्याच्या प्रारंभीच खाली आल्याचे दिसून येत आहे. या २० प्रकल्पांत सरासरी २३.४३ टक्के जलसाठा असल्याचे सांगण्यात आले. यातील काही प्रकल्प तळाशी जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.