शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
5
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
6
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
7
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
8
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
9
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
10
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
11
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
12
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
13
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
14
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
15
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
16
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
17
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
18
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
19
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
20
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !

विदेशवारीकरून परलेल्या 75 पैकी चौघे व्यक्ती अजूनही जिल्ह्याबाहेरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 05:00 IST

केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन या सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी करून त्यांना विलगीकरणात ठेवण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही करताना ७५ पैकी चार व्यक्ती वर्धा जिल्ह्यात परतल्याच नसल्याचे पुढे आले आहे. विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात न परलेल्यांपैकी दोन व्यक्ती सध्या नागपूर, तर प्रत्येकी एक व्यक्ती मुंबई आणि यवतमाळ जिल्ह्यात असल्याचे सांगण्यात आले.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोविडचा नवा प्रकार असलेल्या ओमायक्रॉन हा उत्परिवर्तीत विषाणू डेल्टा पेक्षाही झपाट्याने आपला प्रसार करीत असल्याने विदेशातून परतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ट्रेस करून त्याची आरटीपीसीआर कोविड चाचणी करून त्याला विलगीकरणात ठेवले जात आहे. परंतु, वर्धा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या व विदेशवारीकरून परतलेल्या ७५ पैकी तब्बल चार व्यक्ती अजूनही वर्धा जिल्ह्याबाहेरच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तशी नाेंद आरोग्य विभागाने घेतली आहे.वर्धा जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेले ७५ व्यक्ती आतापर्यंत विदेशवारी करून परतल्याची माहिती आरोग्य विभागाला प्राप्त झाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन या सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी करून त्यांना विलगीकरणात ठेवण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही करताना ७५ पैकी चार व्यक्ती वर्धा जिल्ह्यात परतल्याच नसल्याचे पुढे आले आहे. विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात न परलेल्यांपैकी दोन व्यक्ती सध्या नागपूर, तर प्रत्येकी एक व्यक्ती मुंबई आणि यवतमाळ जिल्ह्यात असल्याचे सांगण्यात आले. या सर्व व्यक्तींची कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे विदेशवारीकरून परतलेल्यांपैकी तब्बल १८ व्यक्तींचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्याने व त्यांच्यात कोविडची कुठलीही लक्षणे नसल्याने त्यांना मुक्त करण्यात आले.

२८ व्यक्तींचे घेतले दुसऱ्यांदा स्वॅब-    विदेशवारीकरून परतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची विमानतळावरच आरटीपीसीआर कोविड चाचणी केली जात आहे. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून विदेशवारी करून जिल्ह्यात परतलेल्या व्यक्तींचा २४ तासांच्या आता स्वॅब घेऊन तो आरटीपीसीआर कोविड चाचणीसाठी पाठविल्या जात आहे. आतापर्यंत विदेशवारीकरून परतलेल्या ७५ व्यक्तींचा पहिल्यांदा तर तब्बल २८ व्यक्तींचा दुसऱ्यांदा स्वॅब घेऊन कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आला आहे. या सर्व व्यक्तींचे कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आठव्या दिवशी घेतला जातो दुसरा स्वॅब-    केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांना केंद्र स्थानी ठेरून विदेशवारी करून परतलेल्या व विलगीकरणात असलेल्या व्यक्तींचा विलगीकरण कालावधीच्या आठव्या दिवशी दुसऱ्यांदा स्वॅब घेऊन तो आरटीपीसीआर कोविड चाचणीसाठी पाठविला जात आहे. आतापर्यंत तब्बल २८ व्यक्तींचे दुसऱ्यांदा स्वॅब घेऊन कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आले असून, या सर्व व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

विदेशवारीकरून परतलेल्यांपैकी दोघे नागपूर तर प्रत्येकी एक यवतमाळ व मुंबई जिल्ह्यात आहेत. त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली असली तरी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ओमायक्रॉनचे संकट मोठे असून, कोविड मृत्यू रोखण्यासाठी लस उपयुक्त असल्याने नागरिकांनी नजीकच्या केंद्रावर जाऊन कोविडची व्हॅक्सिन घ्यावी.- डॉ. प्रवीण वेदपाठक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या