शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

चार महिन्यांत ३५ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

By admin | Updated: May 18, 2017 00:30 IST

कर्जमाफीवरून सरकारचे सुरू असलेले घुमजाव आणि शेतमालाला मिळणारा अल्प भाव यासारख्या सुल्तानी संकटांचा सामना करून

१५ प्रकरणेच ठरली पात्र : कर्जाला कंटाळून आत्महत्या श्रेया केने। लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कर्जमाफीवरून सरकारचे सुरू असलेले घुमजाव आणि शेतमालाला मिळणारा अल्प भाव यासारख्या सुल्तानी संकटांचा सामना करून शेतकरी त्रस्त झाला आहे. एकीकडे कर्जाचा डोंगर वाढत असताना शेतकऱ्याचा माल खरेदी करण्याकडे शासनाने पाठ फिरविली आहे. याच विवंचनेत चार महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल ३५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांतच ३५ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली असून यातील १५ प्रकरणेच शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत. १० शेतकरी आत्महत्येची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली असून उर्वरित प्रकरणे चौकशीकरिता प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. शासनाचे शेतकरी विरोधी धोरण शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरत असल्याचा आरोप सर्वस्तरातून होत आहे. यंदा तुरीचे भरघोस उत्पन्न झाले; पण शासकीय नाट्यमयरित्या सुरू असलेली तूर खरेदी मधेच बंद करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना तूर विकावी लागत आहे. कवडीमोल भावात तूर विकताना उत्पादन खर्चही निघेल ही नाही, याची हमी नाही. शासनाने शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी, अशी मागणी होत असली तरी अद्याप शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी तुरीचा पेरा वाढविला. त्यानुसार उत्पन्न झाले; पण शेतकऱ्यांची तूर बाजारात येताच तुरीचे भाव पडले. तुरीला चांगले भाव मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी तूर घरीच भरून ठेवली. थकित कर्जाची रक्कम भरून पुढील हंगामासाठी नव्याने कर्ज घेता येईल, या बेताल बळीराजा होता; पण शासनाने मधेच तूर खरेदी बंद करून आशेवर पाणी फेरले. सोयाबीनने दगा दिल्याने बहुतांश शेतकऱ्यांची मदार तुरीवर होती. अस्मानी संकटाचा सामना केल्यावर तूर खरेदी बंद केल्याने तथा कर्जमाफीला बगल दिल्याने शेतकऱ्यांना संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कपाशीतून जेमतेम खर्च निघाला, तुरी अत्यल्प भावात व्यापाऱ्यांना विकावे लागत असल्याने कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न कायम आहे. यंदा सावकाराचे वाढेल कर्ज मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांच्या जुन्या कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले. त्यामुळे नवीन कर्ज घेण्यासाठी जुन्या कर्जाची व्याजासह परतफेड तसेच पुनर्गठणातील हप्ते भरावे लागणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, अशी आशा होती. उत्तरप्रदेश सरकारने हा निर्णय जाहीर केला; पण महाराष्ट्रात कर्जमाफीला बगल दिली जात आहे. बॅँकेकडून शेतकऱ्यांना नवीन कर्ज देताना अनेक अडचणी आहेत. यामुळे यंदा शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावे लागणार असल्याचेच चित्र आहे. शेतकऱ्यांकरिता अनेक योजना राबवित असल्याचे सांगितले जात असले तरी त्या शेतकरी आत्महत्या थांबविण्यास समर्थ ठरलेल्या नाही. यामुळे कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे.