शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांत ३५ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

By admin | Updated: May 18, 2017 00:30 IST

कर्जमाफीवरून सरकारचे सुरू असलेले घुमजाव आणि शेतमालाला मिळणारा अल्प भाव यासारख्या सुल्तानी संकटांचा सामना करून

१५ प्रकरणेच ठरली पात्र : कर्जाला कंटाळून आत्महत्या श्रेया केने। लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कर्जमाफीवरून सरकारचे सुरू असलेले घुमजाव आणि शेतमालाला मिळणारा अल्प भाव यासारख्या सुल्तानी संकटांचा सामना करून शेतकरी त्रस्त झाला आहे. एकीकडे कर्जाचा डोंगर वाढत असताना शेतकऱ्याचा माल खरेदी करण्याकडे शासनाने पाठ फिरविली आहे. याच विवंचनेत चार महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल ३५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांतच ३५ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली असून यातील १५ प्रकरणेच शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत. १० शेतकरी आत्महत्येची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली असून उर्वरित प्रकरणे चौकशीकरिता प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. शासनाचे शेतकरी विरोधी धोरण शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरत असल्याचा आरोप सर्वस्तरातून होत आहे. यंदा तुरीचे भरघोस उत्पन्न झाले; पण शासकीय नाट्यमयरित्या सुरू असलेली तूर खरेदी मधेच बंद करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना तूर विकावी लागत आहे. कवडीमोल भावात तूर विकताना उत्पादन खर्चही निघेल ही नाही, याची हमी नाही. शासनाने शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी, अशी मागणी होत असली तरी अद्याप शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी तुरीचा पेरा वाढविला. त्यानुसार उत्पन्न झाले; पण शेतकऱ्यांची तूर बाजारात येताच तुरीचे भाव पडले. तुरीला चांगले भाव मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी तूर घरीच भरून ठेवली. थकित कर्जाची रक्कम भरून पुढील हंगामासाठी नव्याने कर्ज घेता येईल, या बेताल बळीराजा होता; पण शासनाने मधेच तूर खरेदी बंद करून आशेवर पाणी फेरले. सोयाबीनने दगा दिल्याने बहुतांश शेतकऱ्यांची मदार तुरीवर होती. अस्मानी संकटाचा सामना केल्यावर तूर खरेदी बंद केल्याने तथा कर्जमाफीला बगल दिल्याने शेतकऱ्यांना संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कपाशीतून जेमतेम खर्च निघाला, तुरी अत्यल्प भावात व्यापाऱ्यांना विकावे लागत असल्याने कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न कायम आहे. यंदा सावकाराचे वाढेल कर्ज मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांच्या जुन्या कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले. त्यामुळे नवीन कर्ज घेण्यासाठी जुन्या कर्जाची व्याजासह परतफेड तसेच पुनर्गठणातील हप्ते भरावे लागणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, अशी आशा होती. उत्तरप्रदेश सरकारने हा निर्णय जाहीर केला; पण महाराष्ट्रात कर्जमाफीला बगल दिली जात आहे. बॅँकेकडून शेतकऱ्यांना नवीन कर्ज देताना अनेक अडचणी आहेत. यामुळे यंदा शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावे लागणार असल्याचेच चित्र आहे. शेतकऱ्यांकरिता अनेक योजना राबवित असल्याचे सांगितले जात असले तरी त्या शेतकरी आत्महत्या थांबविण्यास समर्थ ठरलेल्या नाही. यामुळे कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे.