शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शहरातील दोन प्रमुख मार्गांचे होणार चौपदरीकरण

By admin | Updated: March 23, 2017 00:34 IST

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था तोकडी पडत आहे. यामुळे रस्त्यांचे रूंदीकरण गरजेचे आहे.

आमदारांची माहिती : अर्थसंकल्पात ५२.८० कोटींची तरतूद वर्धा : वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था तोकडी पडत आहे. यामुळे रस्त्यांचे रूंदीकरण गरजेचे आहे. या बाबीचा पाठपुरावा करीत निधी प्राप्त केला असून शिवाजी चौक ते जुनापाणी व धुनिवाले मठ चौकापर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. यात रस्ता सौंदर्यीकरणावरही भर दिला जाणार असल्याची माहिती आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिली. राज्याच्या अर्थसंकल्पात या रस्त्यांसाठी ५२ कोटी ८० लाखांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यातील शिवाजी चौक ते जुनापाणी चौकाच्या चौपदरी सिमेंटीकरणासाठी ३५ कोटी तर शिवाजी चौक ते धुनिवाले मठ चौकापर्यंतच्या रस्त्याला पाच कोटींचा निधी देण्यात आला आहे. आ.डॉ. भोयर यांनी पाठपुरावा करून हा मंजूर करून घेतला. शिवाजी चौक ते जुनापाणी चौक या तीन किमी अंतरात सिमेंटीकरण, नाली, फुटपाथ, पथदिवे व दुभाजक ही कामे होणार ओह. शिवाजी चौक ते धुनिवाले मठापर्यंत डांबरीकरण व मजबुतीकरण, फुटपाथ निर्मिती, नाली बांधकाम, पथदिवे, दुभाजक ही कामे होत आहे. सेलू तालुक्यातील झडशी येथील रस्त्याचे सिमेंटीकरण, नाली, फुटपाथ, पथदिवे या कामांना एक कोटी मंजूर करण्यात आले आहे. येळाकेळी येथील पुलापासून गावापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण, नाली, पथदिवे या कामांकरिता एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महाकाळ-येळाकेळी रस्त्याचे सिमेंटीकरण, नाली व फुटपाथ यासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले. सुरगाव येथील रस्त्याचे सिमेंटीकरण, नाली, पथदिव्यांना एक कोटी रुपये, रिधोरा-झडशी रस्ता मजबुतीकरण व गावातील रस्त्यांचे सिमेंटीकरणासाठी दीड कोटी, गरमसूर-धोतीवाडा रस्ता व पुलाचे बांधकाम ७५ लाख रुपये, खैरी (मेणखत) ते नानबर्डी रस्ता दुरूस्ती ७५ लाख रुपये अशा एकूण ४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सेलू-धोंडगाव रस्ता बांधकामासाठी ६९ लाख ९२ हजार रुपये, वर्धा-सिंदी (मेघे)-उमरी रस्त्याच्या बांधकामाला १ कोटी २२ लाख ६५ हजार रुपये, झडशी-गरमसूर रस्ता बांधकामासाठी १ कोटी २१ लाख ८० हजार रुपये, राष्ट्रीय महामार्ग ३६१ कान्हापूर ते वाहितपूर रस्त्याच्या बांधकामासाठी १ कोटी ९ लाख ४६ हजार रुपये, राज्य महामार्ग ३६१ ते ब्राह्मणी रस्ता बांधकामाकरिता ५६ लाख २ हजार रुपये अशा एकूण ४ कोटी ७९ लाख ८५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)